शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या उमेदवारीसाठी ‘अजितदादा’ घेणार तोंडी परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 19:06 IST

पवार,भरणे,जाचक यांच्या उपस्थितीत गुरुवारी होणार मुलाखत

बारामती - भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची २०२५-२६ ते २०३०-३१ कालावधीसाठी संचालकपदाची निवडणुक होत आहे.कोट्यावधींचे कर्ज असलेल्या या कारखान्याची यंदा राजकीय समीकरणे बदलल्याने इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती येथे गुरवारी(दि २४) नामनिर्दिष्ठ सर्वपक्षीय उमेदवारांची मुलाखत /,चर्चा गट निहाय आयोजित केली आहे .

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे उपस्थित राहणार आहेत,याबाबत निवडणुक समन्वयक किरण गुजर,सर्वपक्षीय पॅनल प्रमुख पृथवीराज जाचक यांनी माहिती दिली.गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.भवानीनगर येथे झालेल्या सर्वपक्षीय कार्यकर्ता सभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी आदर्श संचालकपदाबाबतच्या त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.त्यामुळे कारखाना पुर्वपदावर आणण्यासाठी क्षमता असणार्या संबंधित उमेदवारांनाच पवार संधी देणार आहेत.लोकसभा,विधानसभा निवडणुकी सह स`थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये वेगळे लोक निवडुन गेल्यास विकासकामांवर परीणाम होतो.मात्र,दुध संघ,साखर कारखाना निवडणुकीत चुकीच्या लोकांना निवडुन दिल्यास त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते.त्याचा थेट आपल्या प्रपंचावर परीणाम होाते.ज्यांचा राजकारणाचा संबंध नाही,अशा नवीन चेहर्यांना यंदा संधी देणार आहे,जे चांगले काम करतीलं.कारखान्यात ऊसवाहतुकीला ट्रॅक्टर असणार्यांना आजिबात उमेदवारी अर्ज भरु नये.

तसेच विविध पदे भुषविलेल्यांनी देखील अर्ज भरु नये.जनमाणसंात स्वच्छ प्रतिमा असणार्यांनीच अर्ज करावेत,ज्याचा व्यवसाय,धंदा चांगला आहे,अशा लोकांना अर्ज भरायला सांगा,अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी निवडणुक लढणार्या चेहर्याबद्दल व्यक्त केली आहे.त्यामुळे पवार यांच्या अपेक्षेला खर्या ठरणार्या इच्छुकाच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडणार आहे.यामध्ये मंत्री भरणे यांच्यासह जाचक यांंची भुमिका देखील निर्णायक ठरणार आहे. यंदा राजकारण बाजुला ठेवुन ‘छत्रपती’ला पुर्ववैभव प्राप्त करुन देण्याचा निर्धार व्यक्त करीत पवार यांनी राजकीय रणनीती आखल्याचे चित्र आहे.कुठले नशीब घेवून जन्माला आले होते.....मागील संचालक मंडळाला विविध कारणांमुळे जवळपास दहा वर्ष काम करण्याची संधी मिळाली. गेल्या १० वर्षांपासुन सत्तेवर असणार्या संचालक मंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्याच्या भर सभेत इशारा दिला आहे.कुठले नशीब घेवून जन्माला आले होते,काय माहिती? त्यांना १० वर्ष मिळाले.आता बास त्यांनी थांबावे,अशा शब्दात पवार यांनी जुन्या संचालक मंडळात काम केलेल्या संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा सुचित केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवार