शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या उमेदवारीसाठी ‘अजितदादा’ घेणार तोंडी परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 19:06 IST

पवार,भरणे,जाचक यांच्या उपस्थितीत गुरुवारी होणार मुलाखत

बारामती - भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची २०२५-२६ ते २०३०-३१ कालावधीसाठी संचालकपदाची निवडणुक होत आहे.कोट्यावधींचे कर्ज असलेल्या या कारखान्याची यंदा राजकीय समीकरणे बदलल्याने इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती येथे गुरवारी(दि २४) नामनिर्दिष्ठ सर्वपक्षीय उमेदवारांची मुलाखत /,चर्चा गट निहाय आयोजित केली आहे .

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे उपस्थित राहणार आहेत,याबाबत निवडणुक समन्वयक किरण गुजर,सर्वपक्षीय पॅनल प्रमुख पृथवीराज जाचक यांनी माहिती दिली.गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.भवानीनगर येथे झालेल्या सर्वपक्षीय कार्यकर्ता सभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी आदर्श संचालकपदाबाबतच्या त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.त्यामुळे कारखाना पुर्वपदावर आणण्यासाठी क्षमता असणार्या संबंधित उमेदवारांनाच पवार संधी देणार आहेत.लोकसभा,विधानसभा निवडणुकी सह स`थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये वेगळे लोक निवडुन गेल्यास विकासकामांवर परीणाम होतो.मात्र,दुध संघ,साखर कारखाना निवडणुकीत चुकीच्या लोकांना निवडुन दिल्यास त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते.त्याचा थेट आपल्या प्रपंचावर परीणाम होाते.ज्यांचा राजकारणाचा संबंध नाही,अशा नवीन चेहर्यांना यंदा संधी देणार आहे,जे चांगले काम करतीलं.कारखान्यात ऊसवाहतुकीला ट्रॅक्टर असणार्यांना आजिबात उमेदवारी अर्ज भरु नये.

तसेच विविध पदे भुषविलेल्यांनी देखील अर्ज भरु नये.जनमाणसंात स्वच्छ प्रतिमा असणार्यांनीच अर्ज करावेत,ज्याचा व्यवसाय,धंदा चांगला आहे,अशा लोकांना अर्ज भरायला सांगा,अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी निवडणुक लढणार्या चेहर्याबद्दल व्यक्त केली आहे.त्यामुळे पवार यांच्या अपेक्षेला खर्या ठरणार्या इच्छुकाच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडणार आहे.यामध्ये मंत्री भरणे यांच्यासह जाचक यांंची भुमिका देखील निर्णायक ठरणार आहे. यंदा राजकारण बाजुला ठेवुन ‘छत्रपती’ला पुर्ववैभव प्राप्त करुन देण्याचा निर्धार व्यक्त करीत पवार यांनी राजकीय रणनीती आखल्याचे चित्र आहे.कुठले नशीब घेवून जन्माला आले होते.....मागील संचालक मंडळाला विविध कारणांमुळे जवळपास दहा वर्ष काम करण्याची संधी मिळाली. गेल्या १० वर्षांपासुन सत्तेवर असणार्या संचालक मंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्याच्या भर सभेत इशारा दिला आहे.कुठले नशीब घेवून जन्माला आले होते,काय माहिती? त्यांना १० वर्ष मिळाले.आता बास त्यांनी थांबावे,अशा शब्दात पवार यांनी जुन्या संचालक मंडळात काम केलेल्या संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा सुचित केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवार