शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

काळाची पावले ओळखून व्यावसायिकता स्वीकारायला हवी : दिलीप माजगावकर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 8:00 AM

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा 'मसाप जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ लेखक, संपादक आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना जाहीर झाला आहे...

ठळक मुद्देयेत्या २७ मे रोजी तो प्रदान केला जाणार

- प्रज्ञा केळकर-सिंग- 

* प्रकाशनाच्या सद्यस्थितीबाबत काय सांगाल?- तूर्तास काही प्रमाणात वाचकवर्ग कमी झाल्यासारखा वाटत असला तरी ही स्थिती कायमस्वरूपी राहणार नाही. अशा पद्धतीने चढ-उतार येतच असतात. त्यामागील काही कारणे तात्कालिक, तर काही कायमस्वरूपी असतात. तंत्रज्ञान हे सध्याचे सर्वात प्रभावी कारण आहे. तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या बदलामुळे वाचनाची माध्यमे बदलत आहेत. ऑडिओ बूक, ई बूक अशी माध्यमे वाचकांना उपलब्ध झाली आहेत. या माध्यमांचा लक्षणीय परिणाम मूळ वाचकवर्गावर मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी पुढील काळात या माध्यमांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे पुरेसे संकेत आता मिळू लागले आहेत. वाचक वगार्तील ही स्थित्यंतरे कमी-जास्त प्रमाणात सुरू असतात. त्यामुळे भविष्यात पुस्तकांचा वाचक आणि या नवीन माध्यमांचा वाचक अशी आशादायी परिस्थिती नक्कीच पहायला मिळेल.

 * रॉयल्टी, कॉपी राईट अशांतून बरेचदा प्रकाशक-लेखक यांच्यात वाद उदभवतात. यावर उपाय काय?- प्रकाशक-लेखक संबंध कायम चांगलेच असतात. परस्पर संबंधात ज्या ५-१० टक्के अडचणी येतात, त्या टाळण्यासाठी सर्वांनी काळाची पावले ओळखून याकडे व्यावसायिक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. पारदर्शक पद्धतीने व्यवहार करणे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर गोष्टींचा आधार घेतल्यास भविष्यातील अडचणी टाळता येऊ शकतात. आजवर प्रकाशन व्यवसायातील काम केवळ विश्वासावर सुरू होते. मात्र, आता व्यवसायिक दृष्टीकोन स्वीकारून कागदपत्रे तयार करणे, नव्या कॉपी राईटचे नियम समजावून घेणे दोन्ही बाजुंनी गरजेचे बनले आहे.

* एकीकडे शहरी भागातील वाचकांना मुबलक साहित्य उपलब्ध होत असताना, ग्रामीण भागातील वाचकांची साहित्यिक भूक भागवण्यात प्रकाशक कमी पडतात, असे वाटते का?- गेल्या दहा वर्षांमध्ये शहरातील पुस्तक प्रदर्शनांचा प्रतिसाद कमी झाला आहे. त्यामुळे पुस्तकांची प्रदर्शने भरवणा-या संस्थानी हे प्रमाण कमी केले आहे. ग्रामीण भागातील वाचकांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी महत्वाच्या चार-पाच प्रकाशकांनी एकत्र येऊन नवीन वाचकवर्ग मिळवण्यासाठी खेडेगावापर्यंत पोहोचले पाहिजे. ऐंशीच्या दशकामध्ये अशा पद्धतीची लाट पहायला मिळाली होती. ग्रंथमेळे, ग्रंथजत्रा, लेखक-वाचक संवाद, अभिवाचन यांसारख्या उपक्रमांमधून ग्रामीण भागात साहित्य चळवळ रुजवता येईल. वाढते खर्च पाहता आता एकेक दोन-दोन प्रकाशकांना ग्रामीण भागात पोहोचणे अवघड होते आहे. त्यामुळे फिरत्या पुस्तक जत्रा, फिरते प्रदर्शने यासाठी प्रकाशकांना सामूहिक प्रयत्न करावे लागतील.

* दुर्मिळ साहित्याच्या संवर्धनासाठी प्रकाशकांच्या पातळीवर कोणते प्रयत्न आवश्यक आहेत?- साहित्य अजरामर असते. काळाच्या ओघात काही साहित्य प्रकार मागे पडतात. वाचकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन चांगल्या दुर्मिळ पुस्तकांचे पुर्नमुद्रण विविध योजनांच्या माध्यमातून प्रकाशक हाती घेऊ शकतात. डिजिटायझेशनच्या माध्यमातून साहित्याच्या जतन आणि संवर्धन प्रक्रियेला हातभार लागू शकतो. त्यादृष्टीने प्रकाशकांच्या पातळीवर प्रयत्न सुरूच आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषद