शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

राजकारणात सक्रिय राहण्याचे दिले आढळराव पाटलांनी दिले संकेत;२०२९ ची लोकसभा निवडणूक लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 15:22 IST

मागील वीस वर्षाच्या राजकारणात एक रुपया खाल्ल्याचा आरोप माझ्यावर झाला नाही.

मंचर : लोकसभेतील पराभवानंतर ही मी राजकारणात व सामाजिक जीवनात सक्रिय आहे. सर्वसामान्य लोकांना भेटतो, जनता दरबारात समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. गावागावांमध्ये विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. मी पुन्हा येणार असून २०२९ साली लोकांना वाटले तर लोकसभा निवडणूक लढवू त्यात चुकीचे काय आहे असे प्रतिपादन म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

लांडेवाडी येथे पत्रकारांशी बोलताना आढळराव पाटील यांनी विविध विषयांना स्पर्श केला. मागील वीस वर्षाच्या राजकारणात एक रुपया खाल्ल्याचा आरोप माझ्यावर झाला नाही. खासदार नसताना सुद्धा मंचर नगरपंचायतीसाठी शंभर कोटींचा निधी आणला आहे. शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १३६ कोटी मंजूर केले. मात्र काहीजण मंचर नगरपंचायतीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताहेत. या कामांची टेंडर निघून ती पूर्ण होत आली आहेत. मग आताच भ्रष्टाचाराचा आरोप कसा होतो असा सवाल करून ते म्हणाले निवडणुका लवकरच होणार आहेत. काम करणाऱ्या एका ठेकेदाराने मला सांगितले की संबंधितांनी त्याच्याकडे दहा लाख रुपयाची मागणी केली होती. ते न दिल्यानेच भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत अशा बोलण्याला मी किंमत देत नाही असे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले. मी राजकारणात सक्रिय आहे दररोज लोकांना भेटतो, रविवारी जनता दरबार नित्यनेमाने सुरू आहे.गावागावात विकास कामांसाठी निधी दिला जातोय. मी सक्रिय राहणार व पुन्हा येणार २०२९ मधील लोकसभा निवडणूक लोकांना वाटले तर लढवणार असून त्यात चुकीचे काय असा सवाल त्यांनी केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांचा पाठपुरावा केला जात नाही. विशेषता २०१९ सालापासून पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे असे सांगून पाठपुरावा का होत नाही हे जनतेला समजले पाहिजे असे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याची आमची भूमिका आहे.युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल मात्र ग्रामीण भागात युती होईल असे वाटत नाही. वरिष्ठ जो निर्णय देतील त्यानुसार काम करणार असल्याचे ते म्हणाले. म्हाडाच्या मार्फत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात सदनिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. जे काम चालू आहे ते सुरू ठेवण्याचा संकल्प वाढदिवसाच्या निमित्ताने केला असल्याचे आढळराव पाटील म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड