शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

शिवसैनिकांना स्थैर्य मिळावे, यासाठी एकनाथ शिंदे गटात; आढळराव पाटलांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:36 IST

मी असा काय गुन्हा केला होता...?

मंचर (पुणे) : ज्या पक्षाने शिवसेना संपवण्याचा घाट घातला आहे, त्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी करणे तसेच जुळवून घेणे मला मान्य नाही. मी असा काय गुन्हा केला होता की, माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. जखमेवर मीठ चोळण्यासाठी मला पुण्यातून लढण्याचा आग्रह करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेससोबत नको, विकासासाठी तसेच शिवसैनिकांना स्थैर्य मिळावे, यासाठी शिंदे गटात सामील झालो आहे, असे प्रतिपादन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. २००९ सालीच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

आज लांडेवाडी येथे समर्थकांच्या मेळाव्यात बोलताना आढळराव पाटील यांनी शिंदे गटात जाण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून ३ जुलैला माझी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे मनाला वेदना झाल्या. मी असा काय गुन्हा केला होता? नूतन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणे चुकीचे नव्हते. हकालपट्टी झाल्यापासून मी अस्वस्थ होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढली. मनाला बरे वाटले. मात्र त्या बैठकीत जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला. पुणे लोकसभा मतदारसंघाची तयारी करण्याची सूचना करण्यात आली. तुम्ही राष्ट्रवादी बरोबर जुळवून घ्या, असे सांगण्यात आले. मात्र मागील २० वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर संघर्ष केला. ज्या पक्षाने शिवसेना संपवण्याचा घाट घातला आहे, त्यांच्या बरोबर हातमिळवणी करणे व जुळवून घेणे मान्य नाही. आढळराव पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वत्र अडवणूक केली. शिवसेनेला डोके वर काढून दिले नाही. स्वतःला काही हवे म्हणून शिंदे गटात गेलो नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत नको, विकासकामे होण्यासाठी तसेच शिवसैनिकांना स्थैर्य मिळावे म्हणून शिंदे गटात प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघातील सर्व शिवसैनिक माझ्याबरोबर असल्याचेही ते म्हणाले.

माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एका शब्दाने अनादर करणार नाही. आम्ही पक्ष बदललेला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आयुष्यात जाणार नाही. शिरूरवर भगवा फडकविण्याचा निर्धार सोनवणे यांनी केला. त्यासाठी उद्यापासून मतदारसंघात दौरा करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान लांडेवाडी येथील मेळाव्याला पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२००९ साली राष्ट्रवादी व शिवसेना यांची आघाडी होणार होती, असा गौप्यस्फोट आढळराव पाटील यांनी केला. मात्र शिरूरच्या जागेवरून आघाडी अडली होती. राष्ट्रवादीचे बहुसंख्य खासदार निवडून पाठवण्याचा प्लॅन करण्यात आला होता. शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक लढवणार होते. त्यावेळी मला सुरुवातीला मावळमधून लढा, असे सांगण्यात आले. शिक्रापूर येथील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली. मात्र मला गृहीत धरू नका, असा इशारा दिल्यानंतर ती सभा झाली. एका उद्योगपतीच्या मध्यस्थीने मुंबई येथील एका हॉटेलमध्ये पवार यांच्याबरोबर बैठक झाली. त्यावेळी तुम्ही शिरूरमधून लढू नका. तुम्हाला दोन वेळा राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवतो, असा शब्द त्यांनी दिला होता. यासंदर्भात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कानावर हा विषय घातल्यानंतर आघाडीचा डाव मोडल्याचे आढळराव पाटील म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMancharमंचरShiv Senaशिवसेना