शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शिवसैनिकांना स्थैर्य मिळावे, यासाठी एकनाथ शिंदे गटात; आढळराव पाटलांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:36 IST

मी असा काय गुन्हा केला होता...?

मंचर (पुणे) : ज्या पक्षाने शिवसेना संपवण्याचा घाट घातला आहे, त्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी करणे तसेच जुळवून घेणे मला मान्य नाही. मी असा काय गुन्हा केला होता की, माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. जखमेवर मीठ चोळण्यासाठी मला पुण्यातून लढण्याचा आग्रह करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेससोबत नको, विकासासाठी तसेच शिवसैनिकांना स्थैर्य मिळावे, यासाठी शिंदे गटात सामील झालो आहे, असे प्रतिपादन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. २००९ सालीच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

आज लांडेवाडी येथे समर्थकांच्या मेळाव्यात बोलताना आढळराव पाटील यांनी शिंदे गटात जाण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून ३ जुलैला माझी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे मनाला वेदना झाल्या. मी असा काय गुन्हा केला होता? नूतन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणे चुकीचे नव्हते. हकालपट्टी झाल्यापासून मी अस्वस्थ होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढली. मनाला बरे वाटले. मात्र त्या बैठकीत जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला. पुणे लोकसभा मतदारसंघाची तयारी करण्याची सूचना करण्यात आली. तुम्ही राष्ट्रवादी बरोबर जुळवून घ्या, असे सांगण्यात आले. मात्र मागील २० वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर संघर्ष केला. ज्या पक्षाने शिवसेना संपवण्याचा घाट घातला आहे, त्यांच्या बरोबर हातमिळवणी करणे व जुळवून घेणे मान्य नाही. आढळराव पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वत्र अडवणूक केली. शिवसेनेला डोके वर काढून दिले नाही. स्वतःला काही हवे म्हणून शिंदे गटात गेलो नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत नको, विकासकामे होण्यासाठी तसेच शिवसैनिकांना स्थैर्य मिळावे म्हणून शिंदे गटात प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघातील सर्व शिवसैनिक माझ्याबरोबर असल्याचेही ते म्हणाले.

माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एका शब्दाने अनादर करणार नाही. आम्ही पक्ष बदललेला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आयुष्यात जाणार नाही. शिरूरवर भगवा फडकविण्याचा निर्धार सोनवणे यांनी केला. त्यासाठी उद्यापासून मतदारसंघात दौरा करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान लांडेवाडी येथील मेळाव्याला पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२००९ साली राष्ट्रवादी व शिवसेना यांची आघाडी होणार होती, असा गौप्यस्फोट आढळराव पाटील यांनी केला. मात्र शिरूरच्या जागेवरून आघाडी अडली होती. राष्ट्रवादीचे बहुसंख्य खासदार निवडून पाठवण्याचा प्लॅन करण्यात आला होता. शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक लढवणार होते. त्यावेळी मला सुरुवातीला मावळमधून लढा, असे सांगण्यात आले. शिक्रापूर येथील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली. मात्र मला गृहीत धरू नका, असा इशारा दिल्यानंतर ती सभा झाली. एका उद्योगपतीच्या मध्यस्थीने मुंबई येथील एका हॉटेलमध्ये पवार यांच्याबरोबर बैठक झाली. त्यावेळी तुम्ही शिरूरमधून लढू नका. तुम्हाला दोन वेळा राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवतो, असा शब्द त्यांनी दिला होता. यासंदर्भात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कानावर हा विषय घातल्यानंतर आघाडीचा डाव मोडल्याचे आढळराव पाटील म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMancharमंचरShiv Senaशिवसेना