शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

शिवसैनिकांना स्थैर्य मिळावे, यासाठी एकनाथ शिंदे गटात; आढळराव पाटलांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:36 IST

मी असा काय गुन्हा केला होता...?

मंचर (पुणे) : ज्या पक्षाने शिवसेना संपवण्याचा घाट घातला आहे, त्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी करणे तसेच जुळवून घेणे मला मान्य नाही. मी असा काय गुन्हा केला होता की, माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. जखमेवर मीठ चोळण्यासाठी मला पुण्यातून लढण्याचा आग्रह करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेससोबत नको, विकासासाठी तसेच शिवसैनिकांना स्थैर्य मिळावे, यासाठी शिंदे गटात सामील झालो आहे, असे प्रतिपादन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. २००९ सालीच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

आज लांडेवाडी येथे समर्थकांच्या मेळाव्यात बोलताना आढळराव पाटील यांनी शिंदे गटात जाण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून ३ जुलैला माझी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे मनाला वेदना झाल्या. मी असा काय गुन्हा केला होता? नूतन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणे चुकीचे नव्हते. हकालपट्टी झाल्यापासून मी अस्वस्थ होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढली. मनाला बरे वाटले. मात्र त्या बैठकीत जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला. पुणे लोकसभा मतदारसंघाची तयारी करण्याची सूचना करण्यात आली. तुम्ही राष्ट्रवादी बरोबर जुळवून घ्या, असे सांगण्यात आले. मात्र मागील २० वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर संघर्ष केला. ज्या पक्षाने शिवसेना संपवण्याचा घाट घातला आहे, त्यांच्या बरोबर हातमिळवणी करणे व जुळवून घेणे मान्य नाही. आढळराव पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वत्र अडवणूक केली. शिवसेनेला डोके वर काढून दिले नाही. स्वतःला काही हवे म्हणून शिंदे गटात गेलो नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत नको, विकासकामे होण्यासाठी तसेच शिवसैनिकांना स्थैर्य मिळावे म्हणून शिंदे गटात प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघातील सर्व शिवसैनिक माझ्याबरोबर असल्याचेही ते म्हणाले.

माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एका शब्दाने अनादर करणार नाही. आम्ही पक्ष बदललेला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आयुष्यात जाणार नाही. शिरूरवर भगवा फडकविण्याचा निर्धार सोनवणे यांनी केला. त्यासाठी उद्यापासून मतदारसंघात दौरा करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान लांडेवाडी येथील मेळाव्याला पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२००९ साली राष्ट्रवादी व शिवसेना यांची आघाडी होणार होती, असा गौप्यस्फोट आढळराव पाटील यांनी केला. मात्र शिरूरच्या जागेवरून आघाडी अडली होती. राष्ट्रवादीचे बहुसंख्य खासदार निवडून पाठवण्याचा प्लॅन करण्यात आला होता. शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक लढवणार होते. त्यावेळी मला सुरुवातीला मावळमधून लढा, असे सांगण्यात आले. शिक्रापूर येथील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली. मात्र मला गृहीत धरू नका, असा इशारा दिल्यानंतर ती सभा झाली. एका उद्योगपतीच्या मध्यस्थीने मुंबई येथील एका हॉटेलमध्ये पवार यांच्याबरोबर बैठक झाली. त्यावेळी तुम्ही शिरूरमधून लढू नका. तुम्हाला दोन वेळा राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवतो, असा शब्द त्यांनी दिला होता. यासंदर्भात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कानावर हा विषय घातल्यानंतर आघाडीचा डाव मोडल्याचे आढळराव पाटील म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMancharमंचरShiv Senaशिवसेना