शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

शिवसेनेला हव्यात पुण्यातील तीन जागा : पक्षप्रमुखांना सांगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 20:09 IST

लोकसभेसाठी काम करण्याच्या बदल्यात शिवसेनेला भारतीय जनता पार्टीकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या तीन जागा हव्या आहेत.

ठळक मुद्देआपले किमान तीन विधानसभा मतदारसंघ धोक्यात येणार पक्षप्रमुखांना सांगणार : भाजपाच्या भूमिकेबाबत शिवसैनिक साशंक

पुणे : लोकसभेसाठी काम करण्याच्या बदल्यात शिवसेनेला भारतीय जनता पार्टीकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या तीन जागा हव्या आहेत. पक्षप्रमुखांकडे तशी मागणीच करण्यात येणार असून त्यासाठी संयुक्त बैठकीचा मुहुर्त पुण्यातील प्रमुख शिवसैनिकांनी धरला असल्याची माहिती मिळाली. आधी तसा शब्द घ्यावा असे सांगण्यात येणार असल्याचे समजते. लोकसभेची सन २०१४ ची निवडणूक भाजपासेनेने संयुक्तपणे लढली. त्यात भाजपाला मोठा विजय मिळाला. सव्वातीन लाखांच्या फरकाने भाजपाने काँग्रेसवर विजय मिळवला. त्यात शिवसेनेचाही मोठा वाटा होता. मात्र त्यानंतर विधानसभेला भाजपाने युती तोडली. त्यामुळे शिवसेनेला स्वतंत्रपणे लढावे लागले. त्यात पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघावर भाजपाने वर्चस्व मिळवले. मात्र हडपसर, कोथरूड, वडगावशेरी, पर्वती या चार विधानसभा मतदारसंघात शिवसेना दुसºया क्रमाकांवर होती. त्यामुळेच आता लोकसभेला युती आहे तर त्याचवेळी विधानसभांचे वाटपही निश्चित करून घ्यावे असे बहुसंख्य शिवसैनिकांचे मत आहे. कोणते मतदार संघ मागायचे यावर सध्या एकमत नसले तरी तो आपला प्रश्न आहे, आपल्या स्तरावर मिटवता येईल, पण त्यांच्याकडून तीन विधानसभा मतदारसंघांचा शब्द घ्यावा अशी मागणी करण्यात येणार आहे. त्यातही कोथरूड व शिवाजीनगरबाबत शिवसैनिक आग्रही आहेत, कारण या दोन्ही मतदारसंघावर त्यांच्याच झेंडा होता. मात्र संघाने तिथे मुसंडी मारल्यामुळे अनेक शिवसैनिक दुखावले गेले आहेत. त्यानंतर गिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी असेल तर कसबा किंवा वडगाव शेरी मतदारसंघ मागावा असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. भाजपाकडून त्यांच्या निवडणूकीच्या वेळेस काम करून घेतले जाते, त्यानंतर शिवसेनेची वेळ असेल त्यावेळी मात्र फसवले जाते अशी तक्रारही शिवसेनेत कायम करण्यात येत असते. शिवसेनेचा उमेदवार असेल त्या मतदारसंघातील भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तिथेच काम करणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात मात्र ते जिथे भाजपाचा उमेदवार असेल तिथे जाऊन काम करतात व त्याचा फटका मतदानाला बसतो असे काही शिवसैनिकांनी सांगितले. संयुक्त बैठकीत हाही मुद्दा उपस्थित करण्याबाबत स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे शिवसैनिक आग्रह धरत आहेत.  ................आपले किमान तीन विधानसभा मतदारसंघ धोक्यात येणार आहेत, याची भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही जाणीव आहे. कोणते मतदारसंघ याबाबत मात्र ते अनभिज्ञ आहेत. त्यामुळेच लोकसभा मतदारसंघातील सहाही आमदार चिंतीत आहेत. त्यातही शहराच्या मध्यभागातील आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळेल किंवा नाही याची धास्ती वाटते आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणBJPभाजपा