शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

शिवाजीराव आढळरावांनी बोलावली महत्त्वाची बैठक; आजच मोठा राजकीय निर्णय जाहीर करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 11:24 IST

शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे.

Shivajirao Adhalrao Patil ( Marathi News ) : शिरूर लोकसभा मतदारसंघावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी विजय मिळवला असला तरी सध्या ते महाविकास आघाडीसोबत आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राहिलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. असं असलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवार ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडायला तयार नसून शिरूरमधून राष्ट्रवादीचाच उमेदवार लढेल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी आज सायंकाळी आपल्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत ते आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

शिरूर लोकसभेच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नुकतीच महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी जागावाटपात ही जागा आपल्याकडेच हवी, याबाबत ठामपणे भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांनीही अजित पवारांच्या या भूमिकेला सहमती दर्शवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळरावांना महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढवायची असल्यास त्यांना अजित पवारांच्या राष्ट्र्वादीत प्रवेश करावा लागणार आहे. अन्यथा अजित पवार हे सध्या भाजपमध्ये असणाऱ्या प्रदीप कंद यांना आपल्याकडे खेचत उमदेवारी देऊ शकतात.

दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील हे आज होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत काय घडलं?

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत राज्यभरातील बहुसंख्य मतदारसंघांवर भाजप-शिवसेना या युतीने वर्चस्व गाजवलं होतं. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ज्या मोजक्या जागांवर यश मिळवता आलं, त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. शिरूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सलग तीन वेळा खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून लाभलेली लोकप्रियता आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या ताकदीच्या जोरावर अमोल कोल्हे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र पराभवानंतर मागील पाच वर्षांत आढळराव पाटील यांनी वारंवार मतदारसंघ पिंजून काढला असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही अमोल कोल्हे यांना शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :shirur-pcशिरूरShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस