शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीराव आढळरावांनी बोलावली महत्त्वाची बैठक; आजच मोठा राजकीय निर्णय जाहीर करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 11:24 IST

शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे.

Shivajirao Adhalrao Patil ( Marathi News ) : शिरूर लोकसभा मतदारसंघावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी विजय मिळवला असला तरी सध्या ते महाविकास आघाडीसोबत आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राहिलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. असं असलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवार ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडायला तयार नसून शिरूरमधून राष्ट्रवादीचाच उमेदवार लढेल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी आज सायंकाळी आपल्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत ते आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

शिरूर लोकसभेच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नुकतीच महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी जागावाटपात ही जागा आपल्याकडेच हवी, याबाबत ठामपणे भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांनीही अजित पवारांच्या या भूमिकेला सहमती दर्शवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळरावांना महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढवायची असल्यास त्यांना अजित पवारांच्या राष्ट्र्वादीत प्रवेश करावा लागणार आहे. अन्यथा अजित पवार हे सध्या भाजपमध्ये असणाऱ्या प्रदीप कंद यांना आपल्याकडे खेचत उमदेवारी देऊ शकतात.

दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील हे आज होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत काय घडलं?

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत राज्यभरातील बहुसंख्य मतदारसंघांवर भाजप-शिवसेना या युतीने वर्चस्व गाजवलं होतं. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ज्या मोजक्या जागांवर यश मिळवता आलं, त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. शिरूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सलग तीन वेळा खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून लाभलेली लोकप्रियता आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या ताकदीच्या जोरावर अमोल कोल्हे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र पराभवानंतर मागील पाच वर्षांत आढळराव पाटील यांनी वारंवार मतदारसंघ पिंजून काढला असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही अमोल कोल्हे यांना शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :shirur-pcशिरूरShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस