शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मेंढपाळ समाजाने जमीनमोजणी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 5:48 AM

जेजुरी औद्योगिक वसाहत टप्पा क्र. ५ च्या विस्तारीकरणासाठी शासनाने नावळी, कोळविहीरे व मावडी येथील शेतीवर दि. १३ एप्रिल २०११ रोजी आरक्षण टाकले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना धनगर समाजातील शेकडो महिला, पुरुष व तरुणांनी रोखले.

जेजुरी - जेजुरी औद्योगिक वसाहत टप्पा क्र. ५ च्या विस्तारीकरणासाठी शासनाने नावळी, कोळविहीरे व मावडी येथील शेतीवर दि. १३ एप्रिल २०११ रोजी आरक्षण टाकले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना धनगर समाजातील शेकडो महिला, पुरुष व तरुणांनी रोखले. ‘आमच्या जमिनी विस्तारीकरणासाठी द्यायच्या नाहीत. आम्ही त्या देणार नाही,’ अशा घोषणा देत त्यांनी अधिकाºयांना मोजणी करण्यास मज्जाव केला. सुमारे ६५१ एकर मेंढपाळ समाजाची शेतजमीन न मोजण्याचा शासकीय अधिकाºयांना निर्णय घ्यावा लागला. या वेळी येत्या १५ दिवसांत मुंबई येथे अथवा याच ठिकाणी अधिकारी व बाधित शेतकºयांची बैठक घेऊन अधिकृत निर्णय घेण्याचे ठरले.पुरंदर तालुक्यातील नावळी येथील १०६६.४० हेक्टर क्षेत्रावर शासनाने औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी आरक्षण टाकले आहे. समाजबांधवांचा मोठा विरोध आहे. त्यांचा विरोध झुगारून गुरुवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पोलीस अधिकारी, ५० पोलीस कर्मचारी, एक दंगल प्रतिबंधक तुकडी यांच्यासह एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संतोष देशमुख, भूसंपादन क्र. २२चे उपजिल्हाधिकारी गाडे, प्रांताधिकारी संजय असवले, तहसीलदार सचिन गिरी तसेच मोजणी कर्मचाºयांसह जमिनीची मोजणी करण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, मोजणीसाठी अधिकारी मोठ्या बंदोबस्तात येणार असल्याने येथील बाधित शेतकरी तसेच एमआयडीसी विस्तारीकरणाला विरोध करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकºयांचा आक्रमकपणा पाहून अधिकाºयांनी त्यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला.या वेळी बाधित शेतकºयांच्या वतीने जयराम थोरवे, धनंजय थोरवे, पुना रामा महानवर, रवा महादू थोरवे, मावडीचे माजी सरपंच चंद्रकांत भामे, प्रकाश भामे, भाजपाचे जिल्हा चिटणीस राजेंद्र जगताप, युवा मोर्चाचे अविनाश वाईकर, प्रसाद अत्रे यांनी शेतकºयांची बाजू मांडली. बैठकीत, येत्या १५ दिवसांत राज्याचे या विभागाचे सचिव, तसेच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह बैठक घेऊन यावर निर्णय घेण्याचे ठरले.आज धनंजय पुनाजी महानवर, महेंद्र दादासाहेब थोरवे, सुमीत लालसाहेब महानवर यांनी उपोषण सुरू केले आहे. या वेळी शेतकरी जयराम तोरवे, बाळू तोरवे, रावा तोरवे, पुना महानवर, राजू तोरवे, धनंजय तोरवे, भिका कारंडे, सुनील कारंडे, मुक्ता थोरवे, हौसाबाई थोरवे, कलावती महानवर, शकुंतला दौंड, राधाबाई करंडी आदी उपस्थित होते़या जमिनीचे भूसंपादन झाल्यास या शेतकºयांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. जमिनी बागायती असूनही शासन त्या संपादित का करते, हेच आम्हाला समजत नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या जमिनी देणार नाही. ज्यांना जमिनी द्यायच्या आहेत त्यांच्या जरूर घ्या, आम्ही विरोध करणार नाही. शासनाने जबरदस्ती केली तर आम्ही आत्महत्या करू; मात्र जमीन संपादित करू देणार नसल्याचे जयराम थोरवे, पुना रामा महानवर व शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे