शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

Sharad Pawar: लूट करणाऱ्या सत्ताधारी भाजप सरकारला खड्यासारखे बाजूला करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 20:37 IST

(bjp) भाजपरुपी संकटातून मुक्त करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत केवळ लूट करण्याचे काम सुरू आहे. लुट करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करावे

ठळक मुद्देगॅस, पेट्रोल दरवाढीने सर्वसामान्य नागरिक हैराण

पिंपरी : केंद्राकडून (central government) कारखानदारी वाढविण्याचे धोरण दिसत नाही. कामगारांचे अधिकार संपवण्याची नवी निती येत आहे. इंधनाच्या किंमती दररोज वाढताहेत, महागाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. कारखानदारी अडचणीत सापडली आहे. शेतकरी, कामगारविरोधी धोरण आखणाऱ्या केंद्रातील भाजप (bjp)  सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजपरुपी संकटातून मुक्त करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत केवळ लूट करण्याचे काम सुरू आहे. लुट करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

रहाटणी काळेवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ अमोल कोल्हे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आमदार अण्णा बनसोडे, महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, वैशाली काळभोर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या विविध भागात जाण्याची आणि येथे येण्याची काही कारण होती. मी लोकांची सुख दु:ख समजून घेण्यासाठी आणि त्यांवर उपाय काढण्यासाठी आलो आहे. देशातील नागरिकांवर विविध संकटे आली आहे. गॅस, पेट्रोल दरवाढीने सर्वसामान्य नागरिक हैराण आहे. केंद्राचे सरकार हे महागाईचे सरकार आहे. कामगारहितविरोधी सरकार आहे. बेरोजगारी वाढत असून कामगारांना नोकरीची शाश्वती राहिली नाही. जीएसटीचे ३० हजार कोटी केंदा्रकडे पडून आहेत. राज्य सरकारला कोणतीही मदत करण्याची भूमिका दिसत नाही. राज्याला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम केंद्राकडून सुरू आहे. ’’

''शहराची लूट करत आत्ता सत्ता त्यांच्याकडे आहे म्हणून ते काहीही गोष्टी करू शकतील. मात्र, हे फार काळ चालणार नाही. ते न चालण्याची परिस्थिती जनमाणसात निर्माण करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सत्तेचा दुरुपयोग कसा होतोय हे घराघरात सांगण्याची वेळ आली आहे. त्यासाठी कार्यकत्र्यांनी जागृत व्हायला हवे असेही त्यांनी यावेळी सांगितले.'' 

भ्रष्टाचारमुक्त असणारी दहा कामे दाखवा

अमोल कोल्हे म्हणाले, ''देशातील परिस्थिती पहिली, तर शेतकरी, कामगार वर्गांचा आवाज दडपला जात आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये भाजपाने भ्रष्टाचारमुक्त असणारी दहा कामे दाखवा, आम्ही पुन्हा शहरात येणार नाही. शहराचे दोन हिस्से कोणी केले. नक्की मक्तेदारी कुणाची आहे. २०१७ च्या  महापालिका निवडणूकीपूर्वी आश्वासनांचा पाऊस पडला होता. ती गाजराची शेती होती, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.’’

पदे देऊनही अपयश आले, याचे आत्मपरिक्षण करा

दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘‘मोदींनी भ्रष्टाचार मुक्त, महागाई मुक्त स्वप्नांना दाखवलं होते, आता देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. कोरोनाच्या संकटात, वादळात केंद्राने मदतीचा हात आखडता घेतला. या शहरातील अनेकांना मंत्री, महापौर केले, संधी दिली तरीही गेल्या वेळी महापालिका का हातातून गेली. याचे आत्मपरीक्षण करायला हवं.’’

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार