शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

प्रबोधनाचा वसा जपणा-या शारदाताई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 03:03 IST

क्रांतिज्योती सावित्रीबाईंची भूमिका साकारायची...तर कधी माता रमाई, राजमाता जिजाऊ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची माता वेलुबाई... एवढेच नव्हे तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील अशा समाजसुधारक, राष्टÑ उद्धारक कर्तृत्ववान महिलांचा जीवनपट एकपात्री प्रयोगातून उलगडून दाखविण्याचे कार्य शारदाताई मुंढे अविरतपणे करीत आहेत.

पिंपरी  - क्रांतिज्योती सावित्रीबाईंची भूमिका साकारायची...तर कधी माता रमाई, राजमाता जिजाऊ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची माता वेलुबाई... एवढेच नव्हे तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील अशा समाजसुधारक, राष्टÑ उद्धारक कर्तृत्ववान महिलांचा जीवनपट एकपात्री प्रयोगातून उलगडून दाखविण्याचे कार्य शारदाताई मुंढे अविरतपणे करीत आहेत. राज्यभर सुमारे पाच हजारांहून अधिक प्रयोगांचे सादरीकरण करून शारदातार्इंनी प्रबोधनाचा यज्ञ अखंड तेवत ठेवला आहे.‘साधी राहणी, उच्च विचार’ या तत्त्वाचा जीवनात अंगिकार करून दोन दशकांहून अधिक काळ शारदातार्इंचे प्रबोधनाचे कार्य सुरू आहे.पिंपरीगावात राहाणाºया शारदातार्इंचे रहाणीमान अगदी साधे आहे. अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत असताना, त्यांनी कलेची आवड जोपासली आहे. छोट्या मोठ्या समारंभामध्ये त्या ‘व्हयं मी सावित्री बोलतेय’, तसेच ‘मी साहेबांची रमा’, ‘अहिल्याबाई होळकर’, ‘राजमाता जिजाऊ’ या कर्तृत्ववान महिलांचा जीवनपट त्या एकपात्रीतून उलगडून दाखवतात. अगदी भूमिकेशी एकरूप होऊन त्या प्रयोगाचे सादरीकरण करतात.१९९० ला व्हयं मी सावित्री बोलतेय हा पहिला प्रयोग सादर केला. त्यानंतर शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती व अन्य सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात वेळोवेळी प्रयोग सादर करून त्यांनी आतापर्यंत पाच हजार एकपात्री प्रयोग केले आहेत. मानधन मिळविणे हा एकपात्री प्रयोग सादर करण्यामागील उद्देश नाही.पथनाट्याच्या माध्यमातूनकारकिर्दीला केली सुरू वातपथनाट्याच्या माध्यमातून कलाकार म्हणून शारदातार्इंनी कारकीर्द सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांची प्रबोधनाची वाटचाल सुरूच आहे. पिंपरीतून सुरू केलेली प्रबोधनवारी आता महाराष्टÑाच्या कानाकोपºयात पोहोचली आहे. विविध ठिकाणी जाऊन त्या एकपात्री प्रयोग सादर करतात. अंगणवाडी सेविका असल्याने शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचेही काम त्या तळमळीने करतात. सामाजिक जाणिवेची त्यांनी जपणूक केली आहे. बचत गटांना प्रशिक्षण, अशिक्षित महिलांना साक्षरतेचे धडे देण्यापासून ते अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक मदत करण्यापर्यंत त्यांनी वैयक्तिक योगदान दिले आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध संघटनांच्यावतीने पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.समाजाचे प्रबोधन व्हावे, हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंतची वाटचाल केली असल्याचे शारदाताई सांगतात. सुरुवातीला जेमतेम शिक्षण असलेल्या शारदातार्इंनी विवाहानंतर विविध जबाबदाºया पेलत,दहावी आणि बारावी, पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. अखेरच्या श्वासापर्यंत प्रबोधनाचा हा वारसा जपण्याचा त्यांचा मनोदय आहे.

टॅग्स :PuneपुणेWomen's Day 2018महिला दिन २०१८