शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 21:17 IST

केवळ नोकरीमध्ये गुंतून न राहता क्षमतांचा व बुध्दीचा वापर केल्यास विद्यार्थी देशासाठी मोठे कार्य करू शकतील..

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ

पुणे:  पदवी मिळाल्यानंतर पुढे काय? असा विचार न करता,विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निश्चित करावे. तसेच केवळ नोकरीमध्ये गुंतून न राहता क्षमतांचा व बुध्दीचा वापर केल्यास विद्यार्थी देशासाठी मोठे कार्य करू शकतील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल व सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी बुधवारी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११६ वा पदवीप्रदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते.या कार्यक्रमाला हरियाणामधील फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक डॉ. गगनदीप कंग ,विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अरविंद शाळिग्राम, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते. या प्रसंगी आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील काजल पंडित महाजन या विद्यार्थीनीला शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासेतर उपक्रम, सामाजिक कार्य, खेळ व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय सहभागासाठी ‘दी प्रेसिडेंट आॅफ इंडिया शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक ’ प्रदान करण्यात आले.  भगतसिंह कोश्यारी म्हणाले, देशात नोक-या नाहीत असे मानणे चूकीचे आहे. आपण जगातून अनेक गोष्टी आयात करतो.त्यामुळे देशातील श्रमशक्तीचा आपण व्यवस्थित उपयोग करू शकलो नाही. मन्युष्यबळाचा व बुध्दीचा योग्य उपयोग केला तर आपण काहीही करू शकतो. गगनदीप कंग म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी बदलत्या भारतात यशस्वी होण्यासाठी  शूर बनावे, उत्तरदायी बनावे आणि अकस्मिक योजना तयार ठेवावी. समाज आपल्याकडून यशाची अपेक्षा करतो आहे. नवी नाती, नवे ज्ञान, नवी उत्पादने, नवे दृष्टिकोन हे चमत्कार झाल्याप्रमाणे प्राप्त होणार नाहीत. तुम्ही अपयशामुळे खचून गेलात तर संभाव्य संधींपासून वंचित राहाल. धैर्य आणि धोका पत्करणा-या व्यक्तिंसाठी लोक जे.के. रोलिंग, स्टीव्ह जॉब्ज यांची उदाहरणे देतात.परंतु,क्रांतिज्योती सावित्रीबाईं फुले यांचेही कार्य मोठे आहे. समाज शिक्षणासाठी सातत्याने घेतलेल्या कष्टामुळे त्या समाजात परिवर्तन घडवू शकल्या.यावेळी कुलगुरू डॉ. करमळकर यांनी विद्यापीठातर्फे राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि योजनांचा आढावा मांडला.पदवी प्रदान समारंभात एक लाख 9 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना पीएच.डी.,पदव्युत्तर पदवी व पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.---------------------------जीवन जगताना प्रत्येक मार्गात धोके आणि संकटे असतातच.त्यामुळे भविष्यातील संकटे समजून घेऊन त्यातून मार्गही शोधायला हवा. या सर्वांच्या जोडीनेच आपण भविष्यासाठी तयार रहायला हवे, त्यासाठी अकस्मिक योजनाही तयार ठेवायला हव्यात,असेही गगनदीप कंग म्हणाल्या.-------------------विद्यापीठातील सुवर्णपद विजेत्या विद्यार्थ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सुवर्ण पदक मिळू शकले नाही. त्यामुळे काही विद्यार्थी हिरमुसले होते. मात्र, स्वत: राज्यपाल यांनी सर्व सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना राज्यभवन येथे चहापानासाठी निमंत्रित केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हास्य फुलले.------------ कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका अंतर्गत उत्कृष्ठ विद्यार्थिनींसाठी दिले जाणारे निलिमाताई पवार सुवर्णपदक  सुप्रिया गोडसे व हर्षदा बारवकर यांना देण्यात आले.त्याचप्रमाणे माजी कुलपती पी.सी. अलेक्झांडर आंतरविद्यापीठिय मराठी वक्तृत्व स्पर्धेतील विजेता स्नेहल अमृतकर हिला प्रथम क्रमांकांचे तर सारांश सोनार आणि पूजा काटकर यांना विभागून द्वितीय क्रमांकाचे पारितिषिक देण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीuniversityविद्यापीठ