शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 21:17 IST

केवळ नोकरीमध्ये गुंतून न राहता क्षमतांचा व बुध्दीचा वापर केल्यास विद्यार्थी देशासाठी मोठे कार्य करू शकतील..

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ

पुणे:  पदवी मिळाल्यानंतर पुढे काय? असा विचार न करता,विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निश्चित करावे. तसेच केवळ नोकरीमध्ये गुंतून न राहता क्षमतांचा व बुध्दीचा वापर केल्यास विद्यार्थी देशासाठी मोठे कार्य करू शकतील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल व सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी बुधवारी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११६ वा पदवीप्रदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते.या कार्यक्रमाला हरियाणामधील फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक डॉ. गगनदीप कंग ,विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अरविंद शाळिग्राम, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते. या प्रसंगी आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील काजल पंडित महाजन या विद्यार्थीनीला शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासेतर उपक्रम, सामाजिक कार्य, खेळ व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय सहभागासाठी ‘दी प्रेसिडेंट आॅफ इंडिया शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक ’ प्रदान करण्यात आले.  भगतसिंह कोश्यारी म्हणाले, देशात नोक-या नाहीत असे मानणे चूकीचे आहे. आपण जगातून अनेक गोष्टी आयात करतो.त्यामुळे देशातील श्रमशक्तीचा आपण व्यवस्थित उपयोग करू शकलो नाही. मन्युष्यबळाचा व बुध्दीचा योग्य उपयोग केला तर आपण काहीही करू शकतो. गगनदीप कंग म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी बदलत्या भारतात यशस्वी होण्यासाठी  शूर बनावे, उत्तरदायी बनावे आणि अकस्मिक योजना तयार ठेवावी. समाज आपल्याकडून यशाची अपेक्षा करतो आहे. नवी नाती, नवे ज्ञान, नवी उत्पादने, नवे दृष्टिकोन हे चमत्कार झाल्याप्रमाणे प्राप्त होणार नाहीत. तुम्ही अपयशामुळे खचून गेलात तर संभाव्य संधींपासून वंचित राहाल. धैर्य आणि धोका पत्करणा-या व्यक्तिंसाठी लोक जे.के. रोलिंग, स्टीव्ह जॉब्ज यांची उदाहरणे देतात.परंतु,क्रांतिज्योती सावित्रीबाईं फुले यांचेही कार्य मोठे आहे. समाज शिक्षणासाठी सातत्याने घेतलेल्या कष्टामुळे त्या समाजात परिवर्तन घडवू शकल्या.यावेळी कुलगुरू डॉ. करमळकर यांनी विद्यापीठातर्फे राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि योजनांचा आढावा मांडला.पदवी प्रदान समारंभात एक लाख 9 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना पीएच.डी.,पदव्युत्तर पदवी व पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.---------------------------जीवन जगताना प्रत्येक मार्गात धोके आणि संकटे असतातच.त्यामुळे भविष्यातील संकटे समजून घेऊन त्यातून मार्गही शोधायला हवा. या सर्वांच्या जोडीनेच आपण भविष्यासाठी तयार रहायला हवे, त्यासाठी अकस्मिक योजनाही तयार ठेवायला हव्यात,असेही गगनदीप कंग म्हणाल्या.-------------------विद्यापीठातील सुवर्णपद विजेत्या विद्यार्थ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सुवर्ण पदक मिळू शकले नाही. त्यामुळे काही विद्यार्थी हिरमुसले होते. मात्र, स्वत: राज्यपाल यांनी सर्व सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना राज्यभवन येथे चहापानासाठी निमंत्रित केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हास्य फुलले.------------ कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका अंतर्गत उत्कृष्ठ विद्यार्थिनींसाठी दिले जाणारे निलिमाताई पवार सुवर्णपदक  सुप्रिया गोडसे व हर्षदा बारवकर यांना देण्यात आले.त्याचप्रमाणे माजी कुलपती पी.सी. अलेक्झांडर आंतरविद्यापीठिय मराठी वक्तृत्व स्पर्धेतील विजेता स्नेहल अमृतकर हिला प्रथम क्रमांकांचे तर सारांश सोनार आणि पूजा काटकर यांना विभागून द्वितीय क्रमांकाचे पारितिषिक देण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीuniversityविद्यापीठ