शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

पासपोर्ट कार्यालयात सर्व्हर डाऊन ! हजारो नागरिकांची तब्बल ५ तास प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 21:03 IST

ई-मेल, एसएमएस किंवा मोबाइल ॲपवरून तत्काळ संदेश दिला असता, तर नागरिकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचले असते, असे एका महिला नागरिकाने सांगितले.

पुणे : मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयात वेळेवर पोहोचलेल्या नागरिकांना ना नंबर, ना प्रक्रिया फक्त वाट पाहत बसावे लागल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. कारण, होते संपूर्ण यंत्रणा ठप्प... सर्व्हर डाऊनचे. या गोष्टी वारंवार घडत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.

गुरुवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट घेतलेले अनेक नागरिक वेळेआधीच उपस्थित होते. मात्र, त्यांचा नंबर येण्याआधी सर्व्हर डाऊन झाला. तासागणिक गर्दी वाढत गेली आणि गेटबाहेर २००-३०० नागरिक रांगेत उभे राहिले, तर गेटच्या आत २०० नागरिक अडकले. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत केवळ वाट पाहत रांगेत थांबावे लागले. त्यात अनेक लहान मुले, वृद्ध मंडळी, महिलांना नाहक त्रास सहन करावा लागला. दर १५-२० मिनिटांनी नवीन अर्जदार असलेली ८० लोकांची नोंद येत होती. पण, अधिकाऱ्यांकडून कुठलाही समन्वय, माहिती किंवा घोषणा नव्हती, असा अनुभव एका नागरिकाने सांगितला.

पुण्यासारख्या प्रगत शहरात केवळ एकच पासपोर्ट कार्यालय हेच मुळात धक्कादायक आहे. संपूर्ण पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच जवळच्या जिल्ह्यांतून नागरिक इथे येतात आणि एकाच कार्यालयावर ताण पडतो. परिणामी, तांत्रिक अडचण झाली की, संपूर्ण यंत्रणा ढेपाळते. नागरिकांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे आधीपासूनच उपलब्ध असते. अशा वेळी ई-मेल, एसएमएस किंवा मोबाइल ॲपवरून तत्काळ संदेश दिला असता, तर नागरिकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचले असते, असे एका महिला नागरिकाने सांगितले.

कोणतीही पूर्वसूचना न देता हजारो लोकांना गेटबाहेर उभे ठेवणे, याला केवळ हलगर्जीपणा नव्हे, तर सार्वजनिक व्यवस्थापनातील अपयशच म्हणावे लागेल. या संपूर्ण गोंधळाची जबाबदारी कोण घेणार? एक दिवस वाया घालवलेले, पैसे खर्चलेले, अपॉइंटमेंट गमावलेले नागरिक आता संबंधित अधिकाऱ्यांकडून उत्तर आणि कारवाईची अपेक्षा करत आहेत. दरम्यान, संबंधित घटनेची माहिती घेण्यासाठी पासपोर्ट कार्यालय अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क झालेला नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpassportपासपोर्ट