शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

नुसतेच फिरणे काय कामाचे ? संवेदनशीलता महत्वाची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:26 IST

दर शनिवार-रविवारी एखाद्या मॉलमध्ये पूर्ण दिवस घालविणारी तरूणाई आता घराचा उंबरा ओलांडून निसर्गात जाऊ लागली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून ‘टूरिझम’ची क्रेझ वाढली.

पुणे : दर शनिवार-रविवारी एखाद्या मॉलमध्ये पूर्ण दिवस घालविणारी तरूणाई आता घराचा उंबरा ओलांडून निसर्गात जाऊ लागली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून ‘टूरिझम’ची क्रेझ वाढली असून वेगवेगळ्या माध्यमातून निसर्गाच्या सहवासात राहण्याची संधी पर्यटक घेत आहेत. वरकरणी हे चित्र जरी सुखावणारे असले तरी पर्यटनाच्या निमित्ताने अति व्यावसायिकवृत्तीमुळे त्या पर्यटनस्थळाची हानी होत असल्याचे दिसून येत आहे.दैनंदिन कामाच्या व्यापातून वेळ काढून दोन घटका निसर्गाच्या सानिध्यात जाण्यास तरुणाई प्राधान्य देत आहे. हल्ली लहान मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता, निसर्गाच्या अभ्यासाकरिता, याबरोबरच टेÑकिंगसाठी पर्यटन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये टुरिझमची क्रेझ असली तरी त्याबरोबरच काही महत्वकांक्षी व्यावसायिकांच्या धोरणाचा फटका निसर्गाला बसत आहे.याविषयी पुरातत्व व पर्यावरण विषयाच्या अभ्यासक तसेच संशोधनाकरिता नेहमीच भटकंती करणाºया साईली पलांडे-दातार यांनी सांगितले, इतिहासाचा वारसा समजून घेण्याकरिता, विविध महोत्सव अभ्यासण्याच्या निमित्ताने आणि वेगवेगळ्ता गावांमधील यात्रा उत्सवाचा आनंद घेण्याच्या औचित्याने भटकंती करणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.यावेळी त्या पर्यटनस्थळी स्थानिकांना रोजगार मिळणे हे जरी स्वाभाविक असले तरी दुसरीकडे अतिव्यावसायिक दृष्टीकोनातून पर्यटकांची लूट होताना दिसते. विषय केवळ व्यावसायिकतेचा नसून पर्यटकांच्या बदलत्या मानसिकतेचा देखील आहे. आजकाल वाढत्या माध्यमांमुळे संबंधित पर्यटनस्थळांविषयीची माहिती तात्काळ उपलब्ध होते.पध्दतशीर नियोजन करुन तिथे भेट दिली जाते. परंतु पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेण्यापेक्षा इतर गोष्टींमध्येच अधिक रमताना दिसतात. यात सर्वाधिक वेळ ते ‘सेल्फी’मध्ये घालवतात. स्वयंशिस्तीच्या अभावामुळे त्यांना अनेकदा विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.शासकीय यंत्रणेने काही संस्था स्थापन करुन आपली जबाबदारी झटकल्याचे पाहवयास मिळते. शासनाच्या त्या पर्यटन संस्थांकडून केवळ हॉटेलिंगचीच माहिती मिळते असा अनुभव पर्यटकांचा आहे.‘कास’चा अट्टाहास कशाला ?सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुलांचा महोत्सव पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. गेल्या काही वर्षांपासून कासचा बºयापैकी प्रचार-प्रसार झाल्याने त्याविषयी पर्यटकांना कुतूहल असते. मात्र त्याठिकाणी सध्या वाढत जाणाºया पर्यटकांच्या संख्येमुळे दहा वर्षांपूर्वी फुलणारी फुले आता फुलताना दिसत नाही. नाशिक-गोवा दरम्यान असणाºया पठारांवर देखील वेगवेगळी फुलं फुलतात. मात्र त्याविषयी पर्यटकांना माहिती नसल्याचे साईली सांगतात.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या