शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 20:15 IST

१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अ‍ॅड. जयंत रामभाऊ म्हाळगी आणि सुजाता जयंत म्हाळगी यांच्याविरुद्ध पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : ‘गिरीवन प्रोजेक्ट’ ही कंपनी सरकारमान्य असल्याचा दावा करून खोटी प्रलोभने देऊन प्लॉटधारकांना आकर्षित करून मुळशी तालुक्यातील डोंगरगाव व होतले येथील विविध जमीन गटांची बेकायदेशीरपणे विक्री करून, १४ खातेदारांची सुमारे १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अ‍ॅड. जयंत रामभाऊ म्हाळगी आणि सुजाता जयंत म्हाळगी यांच्याविरुद्ध पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी जयंत प्रभाकर बहिरट (वय ५७, रा. वूडलँड अपार्टमेंट, कोथरूड) यांनी पौड पोलिसांकडे फिर्याद दिली असून, त्यांच्याबरोबर इतर १४ जणांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश अलिकडेच दिला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयंत म्हाळगी व सुजाता म्हाळगी यांनी २५ वर्षांपूर्वी सुजाता फार्म प्रा. लिमिटेड स्थापन करून त्यांनी  ‘गिरीवन प्रोजेक्ट’ या कंपनीची स्थापना केली. त्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे अध्यक्ष आहेत. हा प्रोजेक्ट सरकारमान्य असल्याचा दावा करून त्यांनी खोटी प्रलोभने देऊन प्लॉटधारकांना आकर्षित केले. २०१६ मध्ये जयंत म्हाळगी व सुुजाता म्हाळगी यांनी फिर्यादींनी खरेदी केलेला प्लॉट सरकारी मोजणी करून देत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला. त्यांच्याकडून विना हरकत मोजण्या करून घ्याव्यात, असा आदेश असताना संचालक वेळोवेळी हरकत घेत आहेत. त्या वेळी प्लॉटधारकांनी मोजणी करून घेतल्यावर त्यांना फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. तसेच ‘गिरीवन प्रोजेक्ट हा प्रायव्हेट हिल स्टेशन आहे,’ असे सांगून फसविले आहे असे फिर्यादीचे म्हणणे आहे. तक्रारदार असलेल्या १४ जणांना जाणूनबुजून चुकीच्या गटात खरेदीखत देणे, खरेदीखतात दिलेल्या गटापेक्षा जवळ जवळ दीड किमी लांब पझेशन देणे, खरेदी खतात दिलेला गट व पझेशन दिलेला गटसारखा नसणे, काहींना आजपर्यंत पझेशन घेऊ दिले नाही. पैसे घेऊन खरेदीखताप्रमाणे क्षेत्र न देणे, खरेदी केलेल्या प्लॉटवर जाऊ न देणे, अशी विविध प्रकारे या प्लॉटधारकांची फसवणूक केली आहे. या प्लॉटधारकांची एकूण ९६ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूकझाली असल्याचा दावा केला आहे . या सर्वांवर ४२०, ४६५, ४६८, ३४१, ४४७, ४२७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...........

* याप्रकरणी ' गिरीवन ' कडून खुलासा.... 

गिरीवन संस्था गेली ३० वर्ष व्यवस्थित सुरु आहे. तेथील काही  जमीन मालकांनी त्यांच्या जमिनीची मोजणी करून घेतली असता त्यांना त्यांचा सात बारा उतारा व वहिवाट यात फरक असल्याचे आढळून आले. जमिनीची मालकी आणि वहिवाट या दिवाणी स्वरूपाच्या विषयांमधील फरकांची विसंगती कशी दूर करता येईल याबाबत संबंधित जमीन मालकांच्या बरोबर बोलणी सुरु आहे. कोणाचीही फसवणूक करण्याचा गिरीवनचा हेतू कधीही नव्हता आणि नाही. परंतु काही मालकांनी याबाबत फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. त्याचा अद्याप तपास चालू आहे. गिरीवनची कायदेशीर बाजू आम्ही त्यात मांडत आहोत. - गिरीवन प्रकल्प 

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखले