शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

‘ त्या’ पतसंस्थेच्या संचालकांची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे द्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 4:31 PM

तब्बल १६०० कोटी रुपयांच्या बेनामी ठेवींच्या गैरव्यवहारामुळे भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्था अडचणीत आली आहेत.

ठळक मुद्देजनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या वतीने गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे मागणी 

पुणे : तब्बल १६०० कोटी रुपयांच्या बेनामी ठेवींच्या गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या संचालकांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षक कायद्याने (एमपीआयडी) गुन्हा दाखल होऊन चार वर्षे उलटूनही कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. कायद्यानुसार संचालकांच्या मालमत्ता विक्रीची तत्काळ कार्यवाही करुन ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत कराव्यात अशी मागणी जनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या वतीने राज्याचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे. बीएचआर संस्थेच्या संचालकांवर ५३ पोलिस ठाण्यांत एमपीआयडी कायदयानुसार गुन्हे दाखल आहेत. संस्थेचे संस्थापक प्रमोद रायसोनी यांच्यासह १४ संशयीत आरोपी असलेले संचालक गेल्या ४ वर्षांपासून अटकेत आहेत. एमपीआयडी कायद्यात वित्तीय संस्थेच्या संचालकांच्या खाजगी मालमत्ता जप्त करुन त्याच्या विक्रीतून ठेवीदारांना ३ महिन्यात ठेवींचा परतावा करण्याची तरतूद आहे. सरकारच्या गृह विभागाकडे या वित्तीय संस्थेच्या संचालकांच्या मालमत्ता विक्रीची अधिसूचना काढण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याचा दावा संघटनेने केला आहे. जनसंग्राम संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे यांनी मंगळवारी (दि. २९) गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांची मुंबईत भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. बीएचआरच्या मालमत्ता विक्रीचे अधिकार बँकेचे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधकांना देण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या गृह विभागाकडे (अपील व सुरक्षा शाखा) एमपीअयडी कायद्यांतर्गत परिपूर्ण प्रस्ताव सादर करुनही बँकेच्या संचालकांची मालमत्ता विक्रीची अधिसूचना प्रसिद्ध होण्यास विलंब होत आहे. ही कार्यवाही शीघ्र व्हावी म्हणून या गुन्ह्यातील सर्व तपासाधिकारी, सीआयडीचे तपास पथक, संस्थेचे अवसायक, लोकायुक्त यांच्याकडे देखील तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी गृह विभागानेच ठेवीदार व यासाठी नियुक्त सर्व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून मालमत्ता विक्रीची तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसbankबँक