शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

सलग दुसऱ्या वर्षीही बारावीचा टक्का घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 6:40 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८५.८८ टक्के लागला.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८५.८८ टक्के लागला. सलग दुसºया वर्षी निकालाचा टक्का घसरला आहे. त्याचबरोबर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येतही २० टक्क्यांनी घट झाली आहे.बारावीच्या निकालात मुंबई विभागीय मंडळातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचीही संख्या घटली आहे. यंदा मुंबईचा एकूण निकाल ८३.८५ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी तो ८७.४४ टक्के इतका होता. मात्र मुंबईतील सर्वाधिक तब्बल २,२१० विद्यार्थी हे नव्वदीपार असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील नव्वदीपार असलेल्या एकूण ४,४७० विद्यार्थ्यांपैकी जवळपास ५० टक्के विद्यार्थी मुंबईतील आहेत.सीबीएसई, आयसीएसई व इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांना मिळणाºया गुणांचा टक्का वेगाने वाढत असताना एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचा टक्का घटत आहे. त्यामुळे बारावीच्या गुणांवर प्रवेश मिळणाºया अभ्यासक्रमांसाठी एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मोठी स्पर्धा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यभरातून कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाचे एकूण १४,२१,९३६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी १२,२१,१५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीचा निकाल २०१७ मध्ये ८९.५० टक्के लागला होता. २०१८ मध्ये त्यात घट होऊन ८८.४१ टक्के इतका लागला, त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा निकाल ३ टक्क्यांनी घट झाली. २०१८ मध्ये राज्यभरात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाºयांची संख्या ५,४८६ इतकी होती, यंदा ४,४७० विद्यार्थ्यांना ही मजल मारता आली. तसेच यंदा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्याही केवळ १,०२,५५२ इतकी आहे. निकालात मुलींनी बाजी मारण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. विद्यार्थिनींचा ९०.२५ टक्के तर विद्यार्थ्यांचा निकाल ८२.४० टक्के इतका आहे. विभागनिहाय निकालामध्ये यंदाही कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर नागपूर विभाग शेवटच्या क्रमांकावर राहिले आहे. पुणे विभागाचा निकाल ८७.८८ टक्के इतका लागला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता निकाल घोषित केला. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता आॅनलाइन निकाल उपलब्ध करून देण्यात आला.> कोकणची बाजी१. निकालात मुलींनी बाजीमारण्याची परंपरा यंदाही कायम२. कोकण पुन्हा अव्वल तर नागपूर विभाग शेवटच्या क्रमांकावर३. दिव्यांग विद्यार्थ्यांचानिकाल ९२.६० टक्के५. एकूण १५१ विषयांपैकी २२ विषयांचा निकाल १०० टक्के६. आयपॅडवर परीक्षा देण्याची प्रथमच संधी दिलेल्या मुंबईची दिव्यांग निशिकाला ७३ टक्के>लक्ष ‘नीट’, ‘जेईई’कडेबारावी विज्ञानच्या प्रश्नपत्रिकांचे बदललेले स्वरूप, काठिण्य पातळीतील वाढ आणि विद्यार्थ्यांचे नीट, जईईकडेच असलेले लक्ष यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेचा निकाल ३.२५ टक्क्यांनी कमी लागला आहे. तुलनेने कला, वाणिज्यची घसरण कमी आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल