शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

एकमेकांचं तोंडही न पाहण्याच्या शपथेचा विसर पडला; गोळीबारात जखमी मित्राचा जीव 'दादा'मुळेच वाचला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 23:43 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे पत्नी समवेत वडापाव आणण्यासाठी आले असताना त्यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार करण्यात आला.

माळेगाव : माळेगाव येथील संभाजीनगर येथे जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई तावरे व त्यांचे पती रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेला सोमवारी (दि ७) आठवडा पुर्ण झाला आहे. तावरे यांच्यावर पुणे शहरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र,या दरम्यान गोळीबाराच्या घटनेची चर्चा सुरुच आहे.आता जखमी झालेल्या तावरे यांना तत्परतेने दवाखान्यात दाखल करणाऱ्या त्यांच्या ‘दादा’ मित्राची चर्चा रंगली आहे,त्याचे कौतुक होत आहे. वेळेत उपचार मिळालेले उपचार ही तावरे यांची जमेची बाजू ठरली आहे.

तावरे पत्नी समवेत वडापाव नेण्यासाठी आले असताना  त्यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार करण्यात आला. यावेळी गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील अनेकजण गोळा झाले. परंतु कोणीही तत्परतेने मदत न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली. अशावेळी दादा जराड, आदेश डोंबाळे, मयूर भापकर, सौरभ गायकवाड, युवराज जेधे,सुमित घोरपडे यांनी रविराज यांना बारामती येथे दवाखान्यात दाखल केले.

२०१५ साली माळेगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक, पुणे जिल्हा परिषदची २०१७ साली झालेली निवडणूक असो किंवा कुठलीही निवडणूक म्हणा, रविराज यांच्या प्रत्येक सुखात दु:खात सावली प्रमाणे दादा जराड असत. शोले चित्रपटातील जय-विरुची जोडी अशी ओळख या दोघांची होती. मात्र, त्यांच्या मैत्रीमध्ये  मध्ये काही वैचारिक मतभेद झाल्याने ही जोडगोळी साधारण तीन वर्षांपासून वेगळी झाली. त्यांच्यात मतभेद झाल्यानंतर गावातील अनेक मित्रांनी, गावपुढाऱ्यांनी यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला.परंतु दुर्दैवाने एकत्र येऊ शकले नाहीत. त्यांच्यात मतभेद झाल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. कालांतराने या दोघांमध्ये दरी वाढतच गेली. परंतु, रविराज यांच्यावर हल्ला झाल्यानंतर येथे बघ्यांचीच गर्दी होती.पुढे येण्याचे धाडस करण्यास कोणी धजावत नव्हते,याचवेळी  दादा जराड व त्याच्या मित्रांनीच सर्वप्रथम रविराज यांना दवाखान्यात दाखल केले. त्यामुळे तावरे यांना तत्परतेने वेळेवर उपचार मिळाले. या दोन मित्रांमध्ये अनेक गैरसमज झाल्याने हे वेगळे झाले. या दोघांमधील दुरावा नियतीलाही मान्य नसावा. त्याचमुळे यांना एकत्र येण्यास रविराज यांच्यावरील गोळीबाराने यांना पुन्हा एकदा एकत्र आणले.

दादा जराड यांनी जखमी अवस्थेतील रविराज तावरे यांना पाहिले.त्यानंतर  एकमेकांचे तोंडही न पाहण्याची घेतलेली शपथ विसर पडला. गोळीबार झाल्यानंतर सर्वप्रथम मित्राच्या मदतीला दादा धावून गेला व मित्राला दवाखान्यात दाखल केले.

...माझे आयुष्य सार्थकी लागले‘लोकमत’शी बोलताना दादा जराड म्हणाले, ज्यावेळी रविराज (चिकू पाटील) यांच्यावर हल्ला झाला .त्याक्षणी माझ्यातील मित्र जागा झाला. मी आणि माझ्या मित्र परिवाराने कसलाही वेळ न दवडता सर्वप्रथम दवाखान्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला, जीवघेणा हल्ला झाल्यानंतर आज माझ्या मित्राचा पुनर्जन्म झाला आहे. माझे आयुष्य सार्थकी लागल्याने मी परमेश्वराचे आभारी आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबार