शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

काळ आला होता पण..!ओढ्याच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या १८ महिन्यांच्या बाळाला वडिलांनी वाचवले,कात्रज येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 16:00 IST

बाळाची भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज सुरू

अभिजीत डुंगरवालकात्रज: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. कात्रज भागात हे प्रमाण अधिक आहे शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने कात्रज तलाव काल भरून वाहू लागला. यामुळे कात्रज तळ्या शेजारी असलेल्या शेलारमळ्यात नाल्याचे पाणी घुसले. त्यात एक १८ महिन्यांचे बाळ पाण्यात वाहून चालले होते. परंतु, वडिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहून जात असलेल्या बाळाला वाचवले. सध्या भारती विद्यापीठ येथील दवाखान्यात या बाळाची जीवन- मरणाची लढाई सुरु आहे.याविषयी अधिक माहिती अशी की, शेलार मळ्यातून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणे,तसेच नाले सफाई न झाल्यामुळे नाल्याची रुंदी व खोली कमी झाली असल्यामुळे थोडाही पाऊस झाला की पाणी या भागात घुसते. गँबेल वाँल मुळे हा १२ मीटरचा ओढा जागेवर फक्त ४ मीटर राहिलेला आहे. कालच्या झालेल्या पावसाने सुमारे ४ फुट पाणी या भागात घुसले असल्याचे प्रत्यक्षदर्शी संदीप कोष्टी यांनी सांगितले.या पाण्यामध्ये संदेश भोरे हे १८ महिन्यांचे बाळ वाहून चाललेे होते. सतीश भोरे यांच्या बंगल्यामध्ये पाणी घुसल्यामुळे भोरे हे बाहेर असलेली आपली दुचाकी वाहुन जाऊ नये यासाठी पाण्यात उतरले,त्यांच्यापाठोपाठ संदेश देखील बाहेर आला आहे हे त्यांना माहीत नव्हते.रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली.संदेश वाहून जाऊ लागल्यामुळे तो ओरडला तेव्हा सतीश भोरे यांच्या लक्षात हा प्रकार आला.त्यांनी गाडी सोडुन आपल्या बाळाला वाचवण्यासाठी धाव घेतली.सुमारे १५ ते २० फुट हे बाळ वाहून गेले होते.नंतर त्याला तातडीने भारती विद्यापीठ येथे दाखल करण्यात आले आहे.नाका-तोंडात पाणी गेल्याने हा चिमुरडा जीवन-मरणाची लढाई लढत आहे.

 नाले सफाईच्या नावाखाली कोटी  रुपये उचलणारे ठेकेदार व त्यांच्यावर निरीक्षक म्हणून काम करणारे अधिकारी यांच्या अक्षम्य चुकीमुळे अनेकांना आपले प्राण धोक्यात घालावे लागत आहेत.

            याविषयी ड्रेनेज विभागाच्या कनिष्ठ अभियंता स्वाती बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नाले सफाई झालेली आहे.गार्डन विभागाच्या अंतर्गत या नाल्यावर जेएन.आर.यु.योजनेमध्ये दोन्ही बाजूनी गँबेन वाॅल केल्यामुळे ओढ्याची लांबी कमी झालेली आहे.त्यामुळे नेहमीच पाणी शेलार मेळ्यात घुसत आहे.वॉलवर असलेल्या जाळीमुळे सर्व भिंत काढणे शक्य नाही.पुढील काळात शेलार मळ्यात पाणी जाऊ नये यासाठी उपाय योजना सुरु केल्या आहेत.

टॅग्स :katrajकात्रजWaterपाणीRainपाऊसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका