शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

काळ आला होता पण..!ओढ्याच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या १८ महिन्यांच्या बाळाला वडिलांनी वाचवले,कात्रज येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 16:00 IST

बाळाची भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज सुरू

अभिजीत डुंगरवालकात्रज: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. कात्रज भागात हे प्रमाण अधिक आहे शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने कात्रज तलाव काल भरून वाहू लागला. यामुळे कात्रज तळ्या शेजारी असलेल्या शेलारमळ्यात नाल्याचे पाणी घुसले. त्यात एक १८ महिन्यांचे बाळ पाण्यात वाहून चालले होते. परंतु, वडिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहून जात असलेल्या बाळाला वाचवले. सध्या भारती विद्यापीठ येथील दवाखान्यात या बाळाची जीवन- मरणाची लढाई सुरु आहे.याविषयी अधिक माहिती अशी की, शेलार मळ्यातून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणे,तसेच नाले सफाई न झाल्यामुळे नाल्याची रुंदी व खोली कमी झाली असल्यामुळे थोडाही पाऊस झाला की पाणी या भागात घुसते. गँबेल वाँल मुळे हा १२ मीटरचा ओढा जागेवर फक्त ४ मीटर राहिलेला आहे. कालच्या झालेल्या पावसाने सुमारे ४ फुट पाणी या भागात घुसले असल्याचे प्रत्यक्षदर्शी संदीप कोष्टी यांनी सांगितले.या पाण्यामध्ये संदेश भोरे हे १८ महिन्यांचे बाळ वाहून चाललेे होते. सतीश भोरे यांच्या बंगल्यामध्ये पाणी घुसल्यामुळे भोरे हे बाहेर असलेली आपली दुचाकी वाहुन जाऊ नये यासाठी पाण्यात उतरले,त्यांच्यापाठोपाठ संदेश देखील बाहेर आला आहे हे त्यांना माहीत नव्हते.रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली.संदेश वाहून जाऊ लागल्यामुळे तो ओरडला तेव्हा सतीश भोरे यांच्या लक्षात हा प्रकार आला.त्यांनी गाडी सोडुन आपल्या बाळाला वाचवण्यासाठी धाव घेतली.सुमारे १५ ते २० फुट हे बाळ वाहून गेले होते.नंतर त्याला तातडीने भारती विद्यापीठ येथे दाखल करण्यात आले आहे.नाका-तोंडात पाणी गेल्याने हा चिमुरडा जीवन-मरणाची लढाई लढत आहे.

 नाले सफाईच्या नावाखाली कोटी  रुपये उचलणारे ठेकेदार व त्यांच्यावर निरीक्षक म्हणून काम करणारे अधिकारी यांच्या अक्षम्य चुकीमुळे अनेकांना आपले प्राण धोक्यात घालावे लागत आहेत.

            याविषयी ड्रेनेज विभागाच्या कनिष्ठ अभियंता स्वाती बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नाले सफाई झालेली आहे.गार्डन विभागाच्या अंतर्गत या नाल्यावर जेएन.आर.यु.योजनेमध्ये दोन्ही बाजूनी गँबेन वाॅल केल्यामुळे ओढ्याची लांबी कमी झालेली आहे.त्यामुळे नेहमीच पाणी शेलार मेळ्यात घुसत आहे.वॉलवर असलेल्या जाळीमुळे सर्व भिंत काढणे शक्य नाही.पुढील काळात शेलार मळ्यात पाणी जाऊ नये यासाठी उपाय योजना सुरु केल्या आहेत.

टॅग्स :katrajकात्रजWaterपाणीRainपाऊसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका