शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

‘सवाई’मध्ये ‘आनंदवन’ ठरतेय लक्षवेधक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 04:02 IST

पाणीप्रश्नाकडे वेधलं जातंय लक्ष; ‘दालनावर कार्यकर्त्यांचा संवाद

पुणे : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात दरवर्षी रागांवर आधारित अत्तरे, टी-शर्ट आणि कॅसेट्स सीडीज यांचे स्टॉल पाहायला मिळतात. मात्र यंदाच्या वर्षी एक हटके स्टॉल सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तो आहे, ‘आनंदवन’चा! या दालनावरचे कार्यकर्ते संगीतावर नव्हे, तर चक्क ‘पाणी’प्रश्नावर रसिकांशी संवाद साधत आहेत. ‘आनंदवन भूजल-शाश्वत सहयोग’ या हाती घेतलेल्या कार्यक्रमाबद्दल जनजागृती करण्यासाठी ‘सवाई’सारखे अभिजात माध्यम त्यांनी निवडले आहे.‘पाणी’ हा सध्याचा अत्यंत ज्वलंत विषय बनला आहे. पुण्याच्या पाण्यातही ५० टक्के कपात करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. भविष्यात पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. ही सर्व पार्श्वभूमी पाहता पाणी समस्येचे मूळ नक्की कशात दडले आहे, हे जाणून घेऊन पुढील वाटचाल करण्याची गरज आहे. नेमक्या याच मुद्यावर ‘आनंदवन भूजल शाश्वत सहयोग’ची संकल्पना आखण्यात आली आहे. भारताचा वार्षिक भूजल उपसा २५१ अब्ज घनमीटर आहे. जो जागतिक वार्षिक भूजल उपशाच्या २५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.‘भूजल’ ही वैयक्तिक मालमत्ता नसून, सामूहिक संसाधन आहे याबद्दलच्या अज्ञानातून होत असलेला अतिरेकी वापर आणि अनिर्बंध भूजल उपसा आणि भूजलविज्ञानाचा दाखला न देता राबवले जाणारे पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रम या गोष्टींमध्ये पाणी समस्यांचे मूळ आहे, याकडे कार्यकर्ते नागरिकांचे लक्ष वेधत आहेत.त्यासाठी ‘आनंदवन भूजल शाश्वत सहयोग’अंतर्गत प्रत्येक राज्यातल्या किमान एका पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये जलसंसाधनांच्या व्यवस्थापनाबरोबरच ‘लोकेशन स्पेसिफिक’ आणि ‘नीड बेस’ दृष्टिकोनातून पाण्याशी निगडित अशा सार्वजनिक आरोग्य, शेती, रोजगार, ऊर्जा आणि पर्यावरण या अविभाज्य क्षेत्रात कृती कार्यक्रम राबविणे आणि भूजलाच्या शाश्वत आणि समन्यायी व्यवस्थापनाचा सर्वसमावेशी कायदा देशात लागू होण्यासाठी प्रयत्न करणे हा आमचा संकल्प असल्याचे कार्यकर्ते भास्कर अच्युत गोखले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.‘सवाई’मध्ये येणारा वर्ग हा बहुतांश ‘अभिजन’ असतो. त्यांच्यापर्यंत हा प्रश्न पोहोचविण्यासाठी सवाईमध्ये दालन लावण्याची विनंती आम्ही आयोजकांना केली होती आणि त्यांनीही आमचे काम पाहून मान्यता दिली. यापुढे विविध महोत्सवातही आम्ही स्टॉल मांडणार आहोत.- भास्कर अच्युत गोखले,कार्यकर्ते

टॅग्स :Puneपुणेwater shortageपाणीटंचाई