शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

‘सवाई’मध्ये ‘आनंदवन’ ठरतेय लक्षवेधक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 04:02 IST

पाणीप्रश्नाकडे वेधलं जातंय लक्ष; ‘दालनावर कार्यकर्त्यांचा संवाद

पुणे : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात दरवर्षी रागांवर आधारित अत्तरे, टी-शर्ट आणि कॅसेट्स सीडीज यांचे स्टॉल पाहायला मिळतात. मात्र यंदाच्या वर्षी एक हटके स्टॉल सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तो आहे, ‘आनंदवन’चा! या दालनावरचे कार्यकर्ते संगीतावर नव्हे, तर चक्क ‘पाणी’प्रश्नावर रसिकांशी संवाद साधत आहेत. ‘आनंदवन भूजल-शाश्वत सहयोग’ या हाती घेतलेल्या कार्यक्रमाबद्दल जनजागृती करण्यासाठी ‘सवाई’सारखे अभिजात माध्यम त्यांनी निवडले आहे.‘पाणी’ हा सध्याचा अत्यंत ज्वलंत विषय बनला आहे. पुण्याच्या पाण्यातही ५० टक्के कपात करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. भविष्यात पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. ही सर्व पार्श्वभूमी पाहता पाणी समस्येचे मूळ नक्की कशात दडले आहे, हे जाणून घेऊन पुढील वाटचाल करण्याची गरज आहे. नेमक्या याच मुद्यावर ‘आनंदवन भूजल शाश्वत सहयोग’ची संकल्पना आखण्यात आली आहे. भारताचा वार्षिक भूजल उपसा २५१ अब्ज घनमीटर आहे. जो जागतिक वार्षिक भूजल उपशाच्या २५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.‘भूजल’ ही वैयक्तिक मालमत्ता नसून, सामूहिक संसाधन आहे याबद्दलच्या अज्ञानातून होत असलेला अतिरेकी वापर आणि अनिर्बंध भूजल उपसा आणि भूजलविज्ञानाचा दाखला न देता राबवले जाणारे पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रम या गोष्टींमध्ये पाणी समस्यांचे मूळ आहे, याकडे कार्यकर्ते नागरिकांचे लक्ष वेधत आहेत.त्यासाठी ‘आनंदवन भूजल शाश्वत सहयोग’अंतर्गत प्रत्येक राज्यातल्या किमान एका पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये जलसंसाधनांच्या व्यवस्थापनाबरोबरच ‘लोकेशन स्पेसिफिक’ आणि ‘नीड बेस’ दृष्टिकोनातून पाण्याशी निगडित अशा सार्वजनिक आरोग्य, शेती, रोजगार, ऊर्जा आणि पर्यावरण या अविभाज्य क्षेत्रात कृती कार्यक्रम राबविणे आणि भूजलाच्या शाश्वत आणि समन्यायी व्यवस्थापनाचा सर्वसमावेशी कायदा देशात लागू होण्यासाठी प्रयत्न करणे हा आमचा संकल्प असल्याचे कार्यकर्ते भास्कर अच्युत गोखले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.‘सवाई’मध्ये येणारा वर्ग हा बहुतांश ‘अभिजन’ असतो. त्यांच्यापर्यंत हा प्रश्न पोहोचविण्यासाठी सवाईमध्ये दालन लावण्याची विनंती आम्ही आयोजकांना केली होती आणि त्यांनीही आमचे काम पाहून मान्यता दिली. यापुढे विविध महोत्सवातही आम्ही स्टॉल मांडणार आहोत.- भास्कर अच्युत गोखले,कार्यकर्ते

टॅग्स :Puneपुणेwater shortageपाणीटंचाई