शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो तर महाराष्ट्राचा का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 21:17 IST

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून देशातील पहिल्या पाच मध्ये आले

ठळक मुद्देतीन वर्षे पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असणार

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊतपुणे दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीसाठी गेले आहेत. त्यावरूनच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधी पक्ष नेत्यांकडून तर्क - वितर्क लावले जात आहेत. यावरच संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात शिवसैनिकांच्या आढावा बैठकीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

राऊत म्हणाले,  देशाने शिवसेनेचे ताकद पाहिली आहे. गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का होऊ शकत नाही. तुमच्या नेत्यांसोबत आज जेवायला होते तुम्ही कुठे होता असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मला विचारलं उद्धव ठाकरे दिल्लीला गेले. मी म्हटलं आमची सत्ता येणार म्हणून गेले असही राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे. तर पुण्यात कधी येणार आपली सत्ता? असा प्रश्नही त्यांनी शिवसैनिकांना विचारला आहे.  

''उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून देशातील पहिल्या पाच मध्ये आले. विरोधीपक्ष म्हणायच यांना काय येत, पण आता पाहतोय आपण. मला राहुल गांधी यांनी विचारलं शिवसेनेच्या यशाचा रहस्य काय तर म्हटलं, आमची भाषा टीका नाही, तुम्हाला पण नेता होण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, आम्ही कधीही मागे हटत नाही, फटे लेकिन हाटे नहीं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.'' 

''मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यानं लोक देव पाण्यात घालून बसले आहेत. ते मुंबईत परत आले, अमित शहा ना पण भेटले, शासकीय काम करून परतले, पुढील तीन वर्षे पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील. असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केलाय.''

टॅग्स :PuneपुणेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी