शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

नदीजोड प्रकल्प : कामगारांची सुरक्षा सांभाळावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 1:07 AM

अकोले येथे सुरू असलेल्या नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामातील अपघाती घटना दिवसेंदिवस वाढत असून मागील आठवड्यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याने प्रकल्पाचे काम करणाऱ्या सोमा कंपनीला कामाच्या हिताबरोबरच कामगारांच्या जिवाची सुरक्षा सांभाळावी लागणार आहे

अकोले - येथे सुरू असलेल्या नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामातील अपघाती घटना दिवसेंदिवस वाढत असून मागील आठवड्यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याने प्रकल्पाचे काम करणाऱ्या सोमा कंपनीला कामाच्या हिताबरोबरच कामगारांच्या जिवाची सुरक्षा सांभाळावी लागणार आहे, तरच कामगारांच्या जिवावर प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण होऊ शकणार आहे.गेल्या वर्षी दि. २० नोव्हेंबरला अकोले येथील पाच नंबर शॉप्टच्या ठिकाणी दोनशे फुटांवर क्रेन तुटून आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात चर्चेत आला होता. त्यामुळे अनेक संघटना आणि ग्रामस्थांनी दोन महिने अकोले येथील नदीजोड प्रकल्पाच्या पाच नंबर शॉप्टचे काम बंद पाडले होते. या घटनेनंतर अपघाताच्या घटना थांबल्या नसून अनेक कामगारांनागंभीर दुखापतीच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही कामगारांना जीवही गमवावा लागला आहे.काम करण्यासाठी लागणारा कामगार स्थानिकपेक्षा परप्रांतीय असल्याने घडलेल्या किरकोळ घटना लोकांपर्यंत समजत नसल्याचे येथील काम करणाºया लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. सध्या काझड हद्दीतील चार नंबर शॉप्टच्या ठिकाणी जमिनीपासून २४० फूट खाली खोदकाम सुरू असून या ठिकाणी दक्षिण ते उत्तर दिशेला पाचशे मीटरपर्यंत खोदाई सुरू आहे. याच प्रमाणात भादलवाडी हद्दीतदेखील खोदाई सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या या कामगारांच्या सुरक्षेबरोबरच स्थानिक लोकांनी राहत्या घराला हादरे बसत असल्याच्याही तक्रारी केल्या असून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अनेक समस्यांना काम करणाºया कंपनीला तोंड द्यावे लागणार आहे.डोक्यात दगड पडून मृत्यूमागील आठवड्यात पुरुषोत्तमसिंग राममनोहरसिंग गौड (वय ३३, रा. बमराह वॉर्ड १९ चेनागिडी, जि. देवधरी, मध्य प्रदेश) या व्यक्तीच्या डोक्यात दगड पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चार नंबर ठिकाणी एका कामगाराला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे अजून नदीजोड प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो, तोपर्यंत किती लोकांना जीव गमवावा लागेल, याची पर्वा ठेकेदारांना नाही.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या