शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

'आधी सुरक्षा मग परीक्षा' ; विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 00:02 IST

विद्यापीठाच्या काही अधिसभा सदस्यांचा परीक्षेला विरोध

ठळक मुद्देअंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सध्या दोन मत प्रवाह निर्माण  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची तयारी केली सुरू

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यापीठाच्या काही अधिसभा सदस्यांचा परीक्षेला विरोध आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये ‘आधी विद्यार्थ्यांची सुरक्षा मग परीक्षा’अशी भूमिका काही अधिसभा सदस्यांनी घेतली आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.परंतु,ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावयाची आहे,त्यांना परीक्षेचा पर्याय उपलब्ध असणार आहे. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा होणार,असे पत्र राज्य शासनाला पाठविले.त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सध्या दोन मत प्रवाह निर्माण झाले आहेत.

परंतु,विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या लेखी निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सुध्दा शासनाच्या लेखी आदेशानुसारच कार्यवाही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळापैकी अधिसभेत विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक यांच्यातील प्रतिनिधी निवडून जातात. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला अधिसभेची मान्यता असणे गरजेची असते.त्यामुळेच परीक्षेबाबत अधिसभा सदस्यांची मते जाणून घेतली असता काही सदस्यांनी परीक्षेला स्पष्टपणे विरोध दर्शविला.सध्या विद्यार्थी आपापल्या गावी गेले असून त्यांची कौटुंबिक ,मानसिक परिस्थितीचा विचार केला पाहिजे.तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत सुमारे 3 हजार 500 गुणांची परीक्षा दिली आहे.त्यामुळे केवळ 500 गुणांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणे योग्य आहे का? असा सवालही अधिसभा सदस्यांनी उपस्थित केला.

-------------------प्रथम विद्यार्थ्यांची सुरक्षा मगच परीक्षेचा विचार केला पाहिजे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये,विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करावा. सध्या विद्यार्थ्यांच्या आजू-बाजूला कोरोना रूग्ण अढळून येत आहेत.तसेच पहिल्या वषार्पासून शेवटच्या वर्षापर्यंत मिळविलेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना पदवी दिली जाते.पदवी मिळाल्यानंतर नोकरी मिळेलच याची कोणीही खात्री देत नाही.त्यामुळे विद्यापीठाने परीक्षा घेऊ नये.- अमित पाटील,अधिसभा सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ--------------परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील असून सध्या आपल्या गावी गेले आहेत. या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शहरात बोलवल्यास त्यांचा राहण्याचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे.त्यामुळे विद्यापीठाने अंतिम वषार्ची परीक्षा घेऊ नये.

- अभिषेख बोके,अधिसभा सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ------------विद्यापीठाच्या पुणे,अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील किती विद्यार्थी इतर जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर आहेत.याबाबतची माहिती विद्यापीठाकडे उपलब्ध नाही.तसेच ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे सुमारे 90 टक्के विद्यार्थी हे प्रवास करतात. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बोलवून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परीक्षेचा अट्टहास धरू नये.

- प्रा. के.एल.गिरमकर ,अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयPune universityपुणे विद्यापीठ