शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

एक मोहीम 'आरोग्यदायी' हवेसाठी; राज्यात '#saalbhar60'चळवळीद्वारे अनेकजण एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 17:54 IST

लॉकडाऊनमध्ये हवा प्रदूषणमुक्त; हीच स्थिती कायम ठेवण्याची गरज

ठळक मुद्देदेशातील प्रदूषणामुळे गतवर्षी १ लाख ८५ हजार ४२३ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंदकोविडमुळे सर्व बंद झाले आणि हवा, पाणी, नदीत झाली सुधारणा पुणे, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांचाही समावेश

पुणे : लॉकडाऊनमध्ये निसर्ग प्रदूषणमुक्त झाला आहे. तो तसाच वर्षभर राहावा, यासाठी आता मोहिम सुरू झाली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छ हवेसाठी राबवल्या जाणाऱ्या #saalbhar60 या डिजिटल उपक्रमामध्ये महाराष्ट्राच्या अनेक शहरातील रहिवासी स्वच्छ आणि आरोग्यदायी हवेच्या मागणीसाठी एकत्र आले आहेत. प्रदूषणयुक्त हवेशिवाय आरोग्यदायी श्वास घेता यावा, यासाठी प्रयत्न केला जात आहे. पुणे, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांचाही समावेश सीपीसीबीच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा अंतर्गत १२२ नॉन-अटेनमेंट शहरांमध्ये आहे. म्हणजेच नॅशनल एम्बियंट एअर क्वॉलिटी स्टँडर्ड्सच्या पातळीपर्यंत पोहोचू न शकलेल्या शहरांच्या यादीमध्ये हा समावेश होतो आणि येथील वायू प्रदुषण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी ही मोहिम आवश्यक आहे.  

वायू प्रदुषणावर संशोधन करणाऱ्या अर्बन एमिशन (इंडिया)चे संचालक सरथ गुट्टीकुंडा म्हणाले, आपल्याला वायू प्रदुषणाचे स्रोत ठाऊक आहेत आणि आता आपण ही स्रोते स्वच्छ रहावीत यासाठी अधिक काही करण्याची गरज आहे. हे लक्ष्य गाठणे आपल्याला शक्य आहे. हे कठीण असले तरी शक्य आहे.  #saalbhar60मोहिमेबद्दल....   लॉकडाऊनच्या ६०व्या दिवशी म्हणजेच २३ मे रोजी हरिद्वारमधील १२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ता रिधिमा पांडे हिने या मोहिमेचा व्हिडीओ तयार केला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी 'सर्वांसाठी स्वच्छ हवा' अशी मागणी करणारे फोटोज शेअर करून वर्षभर स्वच्छ आणि आरोग्यदायी हवा मिळावी अशी ती मागणी करीत आहे. संक्षिप्त रूप :

स्रे 2.5 : २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यास असलेले कणस्रे10: १० मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यास असलेले कण==============पुणे        लॉकडाऊनच्या ३० दिवस अगोदर     १       २       ३      ४

स्रे 2.5 : ५४.८                 २३.२     २१.३     २१.२      २१.४  स्रे10:  91.4                     37.2       34.1    33.9    35.8

===============================कोविडमुळे सर्व बंद झाले आणि हवा, पाणी, नदीत सुधारणा झाली. आता सर्व स्वच्छ झालंय, पण त्यावर फक्त चर्चा करून उपयोग नाही. हे स्वच्छ निसर्ग आता जपायला हवा. त्यासाठी काही हालचाल करायला हवी. म्हणून 'हॅशटॅगसालभर६०' ही मोहिम सुरू आहे. शहरी जीवनात वाहनांचे प्रदूषण वाढतेय. सार्वजनिक वाहतूकीचा वापर केला, तर प्रदूषण कमी होईल. रस्त्यांसाठी झाडं कापली जातात. पण रस्ता बांधून वाहतूक सुरळीत होत नाही. यामध्ये मुळात आपणच शाश्वत उपाय करायला हवेत. काही रस्ते मोठे हवेत. कशाला हवेत ? रस्ते मोठे की गाड्या तुंबणार नाहीत का ? याऐवजी सार्वजनिक वाहतुक वापरा आणि वैैयक्तिक वाहने रस्त्यावर कमी आणायला हवीत. सायकल वापरणे खूप चांगला उपाय आहे.  - सुजीत पटवर्धन, विश्वस्त, परिसर===========================देशात दरवर्षी पावणेदोन लाख बालकांचा मृत्यूदेशातील प्रदूषणामुळे गतवर्षी १ लाख ८५ हजार ४२३ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद सेंटर ऑफ सायन्स अ‍ॅँड एन्व्हायरमेंट या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात आहे. हे मृत्यू फुप्फुसात धुलीकणांचे बारीक कण जाऊन झालेल्या संक्रमणामुळे झाले आहेत. पीएम२.५ चे कण म्हणजे आपल्या एका केसाचा जेवढा व्यास असतो, त्याच्या ५० ते ७० मायक्रोनचा कण म्हणजे पीएम२.५ होय. हे कण वाहनातील धूर, धातूचे बारीक कण, जैैविक घटकांतून येतात. हे कण श्वसन संस्थेला नुकसान पोचवतात. म्हणून वाहनांची संख्या कमी झाली तर हे कण कमी होतील. 

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरण