शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

एक मोहीम 'आरोग्यदायी' हवेसाठी; राज्यात '#saalbhar60'चळवळीद्वारे अनेकजण एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 17:54 IST

लॉकडाऊनमध्ये हवा प्रदूषणमुक्त; हीच स्थिती कायम ठेवण्याची गरज

ठळक मुद्देदेशातील प्रदूषणामुळे गतवर्षी १ लाख ८५ हजार ४२३ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंदकोविडमुळे सर्व बंद झाले आणि हवा, पाणी, नदीत झाली सुधारणा पुणे, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांचाही समावेश

पुणे : लॉकडाऊनमध्ये निसर्ग प्रदूषणमुक्त झाला आहे. तो तसाच वर्षभर राहावा, यासाठी आता मोहिम सुरू झाली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छ हवेसाठी राबवल्या जाणाऱ्या #saalbhar60 या डिजिटल उपक्रमामध्ये महाराष्ट्राच्या अनेक शहरातील रहिवासी स्वच्छ आणि आरोग्यदायी हवेच्या मागणीसाठी एकत्र आले आहेत. प्रदूषणयुक्त हवेशिवाय आरोग्यदायी श्वास घेता यावा, यासाठी प्रयत्न केला जात आहे. पुणे, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांचाही समावेश सीपीसीबीच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा अंतर्गत १२२ नॉन-अटेनमेंट शहरांमध्ये आहे. म्हणजेच नॅशनल एम्बियंट एअर क्वॉलिटी स्टँडर्ड्सच्या पातळीपर्यंत पोहोचू न शकलेल्या शहरांच्या यादीमध्ये हा समावेश होतो आणि येथील वायू प्रदुषण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी ही मोहिम आवश्यक आहे.  

वायू प्रदुषणावर संशोधन करणाऱ्या अर्बन एमिशन (इंडिया)चे संचालक सरथ गुट्टीकुंडा म्हणाले, आपल्याला वायू प्रदुषणाचे स्रोत ठाऊक आहेत आणि आता आपण ही स्रोते स्वच्छ रहावीत यासाठी अधिक काही करण्याची गरज आहे. हे लक्ष्य गाठणे आपल्याला शक्य आहे. हे कठीण असले तरी शक्य आहे.  #saalbhar60मोहिमेबद्दल....   लॉकडाऊनच्या ६०व्या दिवशी म्हणजेच २३ मे रोजी हरिद्वारमधील १२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ता रिधिमा पांडे हिने या मोहिमेचा व्हिडीओ तयार केला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी 'सर्वांसाठी स्वच्छ हवा' अशी मागणी करणारे फोटोज शेअर करून वर्षभर स्वच्छ आणि आरोग्यदायी हवा मिळावी अशी ती मागणी करीत आहे. संक्षिप्त रूप :

स्रे 2.5 : २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यास असलेले कणस्रे10: १० मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यास असलेले कण==============पुणे        लॉकडाऊनच्या ३० दिवस अगोदर     १       २       ३      ४

स्रे 2.5 : ५४.८                 २३.२     २१.३     २१.२      २१.४  स्रे10:  91.4                     37.2       34.1    33.9    35.8

===============================कोविडमुळे सर्व बंद झाले आणि हवा, पाणी, नदीत सुधारणा झाली. आता सर्व स्वच्छ झालंय, पण त्यावर फक्त चर्चा करून उपयोग नाही. हे स्वच्छ निसर्ग आता जपायला हवा. त्यासाठी काही हालचाल करायला हवी. म्हणून 'हॅशटॅगसालभर६०' ही मोहिम सुरू आहे. शहरी जीवनात वाहनांचे प्रदूषण वाढतेय. सार्वजनिक वाहतूकीचा वापर केला, तर प्रदूषण कमी होईल. रस्त्यांसाठी झाडं कापली जातात. पण रस्ता बांधून वाहतूक सुरळीत होत नाही. यामध्ये मुळात आपणच शाश्वत उपाय करायला हवेत. काही रस्ते मोठे हवेत. कशाला हवेत ? रस्ते मोठे की गाड्या तुंबणार नाहीत का ? याऐवजी सार्वजनिक वाहतुक वापरा आणि वैैयक्तिक वाहने रस्त्यावर कमी आणायला हवीत. सायकल वापरणे खूप चांगला उपाय आहे.  - सुजीत पटवर्धन, विश्वस्त, परिसर===========================देशात दरवर्षी पावणेदोन लाख बालकांचा मृत्यूदेशातील प्रदूषणामुळे गतवर्षी १ लाख ८५ हजार ४२३ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद सेंटर ऑफ सायन्स अ‍ॅँड एन्व्हायरमेंट या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात आहे. हे मृत्यू फुप्फुसात धुलीकणांचे बारीक कण जाऊन झालेल्या संक्रमणामुळे झाले आहेत. पीएम२.५ चे कण म्हणजे आपल्या एका केसाचा जेवढा व्यास असतो, त्याच्या ५० ते ७० मायक्रोनचा कण म्हणजे पीएम२.५ होय. हे कण वाहनातील धूर, धातूचे बारीक कण, जैैविक घटकांतून येतात. हे कण श्वसन संस्थेला नुकसान पोचवतात. म्हणून वाहनांची संख्या कमी झाली तर हे कण कमी होतील. 

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरण