शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

वडारवाडीतील जळीतग्रस्तांना सरकारची ५ हजार रुपये व कोरड्या शिध्याची तातडीची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 18:56 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

ठळक मुद्देबँकेचे कामकाज सुरू असल्याने हे धनादेश त्यांना लगेच खात्यात जमा करता येतील

पुणे: वडारवाडी येथे काही दिवसांपूर्वी मोठी आग लागली होती. त्यात ५६ जणांच्या झोपड्या जळून खाक झाल्या होत्या.त्यात नुकसान झालेल्या जळीतग्रस्तांना तहसील कार्यालयाकडून ५ हजार रूपयांचा धनादेश व डाळ, तांदुळ देण्यात आले. पोलिसांच्या साह्याने ही मदत करण्यात आली. या महिन्यातील १९ तारखेला वडारवाडी येथे मोठी आग लागली होती. त्यात ५६ जणांच्या झोपड्या जळून खाक झाल्या. त्या सर्व कुटुंबांची व्यवस्था गोखलेनगरमधील शाळेत करण्यात आली आहे. जवळचे सर्व काही जळून गेल्याने या कुटुंबांसमोर जगण्याचा काही पर्यायच शिल्लक नव्हता. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या मदतीवरच त्यांचे सगळे सुरू होते. कोरोना विषाणू आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जाहीर झाल्याने त्यांची मदतही थांबलीतहसीलदार तृप्ती कोलते यांनी त्यांची ही अडचण ओळखून नायब तहसीलदार व अन्य अधिकार्यांच्या मदतीने या सर्वांच्या जळीत झोपड्यांचे तातडीने पंचनामे केले. त्याचा प्रस्ताव तातडीने तयार करून तो मंजूर करून घेतला. या सर्व जळीतग्रस्तांना आज पोलिसांच्या मदतीने प्रत्येक कुटुंबाला ५ हजार रूपयांचा धनादेश तसेच डाळ, तांदुळ असा कोरडा शिधा ते राहत असलेल्या शाळेत जाऊन देण्यात आला.कोलते म्हणाल्या, सर्व धनादेश स्टेट बँकेचे आहेत. बँकेचे कामकाज सुरू असल्याने हे धनादेश त्यांना लगेच खात्यात जमा करता येतील. त्यांना अन्य काय मदत करता येईल यावर विचार सुरू आहे, मात्र तातडीची मदत म्हणून हे करण्यात आले. सहकारी अधिकाऱ्यांनी त्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही वेळ न दवडता केली, त्यामुळे हे शक्य झाले. 

टॅग्स :PuneपुणेfireआगFamilyपरिवार