शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

५ लाख कोटी किंमत, ५० हजार कोटी लागणार; महाराष्ट्रात सिंचन प्रकल्पांसाठी कर्ज उभारू-राधाकृष्ण विखे पाटील

By नितीन चौधरी | Updated: January 17, 2025 18:52 IST

राज्यातील सिंचन प्रकल्पांची सध्याची किंमत सुमारे पाच लाख कोटी रुपये असल्याने त्या आधारावर वित्तीय संस्थांकडून सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याचा विचार

पुणे : वर्षानुवर्षे रखडलेल्या सिंचनाच्या प्रकल्पांमुळे सरकारला आर्थिक भार सोसावा लागत आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात आणि पाच वर्षांच्या काळात या प्रकल्पांच्या पू्र्ततेसाठी किती निधी लागेल याचा आराखडा तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई मेट्रो, सिडको, एमएमआरडीए आदी संस्थांना मिळणाऱ्या कर्जाच्या धर्तीवर जलसंपदा विभागही कर्ज उभारण्याचा विचार करत आहे. जागतिक बँक, आशिया विकास बँक यासारख्या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन राज्यातील सर्व छोटे मोठे सिंचन प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्याचा मानस असल्याचे जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

नदीजोड प्रकल्पांबाबत पुण्यात आयोजित कार्यशाळेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतल्यास राज्यातील सर्व सिंचन प्रकल्प मुदतीत पूर्ण होतील. निधी वाचेल आणि परिणामी सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल अशी त्या मागची भूमिका आहे त्याच्यामुळेच या संदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.”

अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला सात कोटी रुपयांचा निधी लागत होता. आता त्याची किंमत साडेपाच हजार कोटी रुपये झाली आहे. अद्यापही हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. राज्यातील सिंचन प्रकल्पांची सध्याची किंमत सुमारे पाच लाख कोटी रुपये आहे. त्या आधारावर वित्तीय संस्थांकडून सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याचा विचार आहे. त्यामुळे हे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन राज्याचा विकास झापाट्याने होईल, असा आशावद त्यांनी बोलून दाखविला. अधिकाऱ्यांनीही विभागाला १० ते २० टक्केच निधी मिळेल ही मानसिकता बदलून मागणीप्रमाणे निधी मिळेल अशी तरतूद करू असेही त्यांनी या वेळी आश्वासित केले.

महसूल विभागामध्ये कालबाह्य झालेले नियम बदलण्यासाठी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांची समिती स्थापन केली होती. त्याच धर्तीवर जलसंपदा विभागातील विकास कामांमध्ये आणि सिंचन प्रकल्पात अडथळे ठरणारे कालबाह्य नियम बदलण्यासाठी व नवीन नियम करण्यासंदर्भात लवकरच एक समिती स्थापन केली जाईल. अहवाल तयार करण्यासाठी समितीला तीन महिन्याची मुदत देण्यात येईल. तसेच पाणी परिषदेच्या काही ज्येष्ठ अनुभवी तज्ज्ञ मंडळींकडून जलसंपदा विभागात सुरू असलेले प्रकल्प आणि होऊ घातलेल्या प्रकल्पाबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी एक सल्लागार मंडळ नियुक्त करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला.

टॅग्स :PuneपुणेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलministerमंत्रीMaharashtraमहाराष्ट्रMONEYपैसाbusinessव्यवसाय