शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

५ लाख कोटी किंमत, ५० हजार कोटी लागणार; महाराष्ट्रात सिंचन प्रकल्पांसाठी कर्ज उभारू-राधाकृष्ण विखे पाटील

By नितीन चौधरी | Updated: January 17, 2025 18:52 IST

राज्यातील सिंचन प्रकल्पांची सध्याची किंमत सुमारे पाच लाख कोटी रुपये असल्याने त्या आधारावर वित्तीय संस्थांकडून सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याचा विचार

पुणे : वर्षानुवर्षे रखडलेल्या सिंचनाच्या प्रकल्पांमुळे सरकारला आर्थिक भार सोसावा लागत आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात आणि पाच वर्षांच्या काळात या प्रकल्पांच्या पू्र्ततेसाठी किती निधी लागेल याचा आराखडा तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई मेट्रो, सिडको, एमएमआरडीए आदी संस्थांना मिळणाऱ्या कर्जाच्या धर्तीवर जलसंपदा विभागही कर्ज उभारण्याचा विचार करत आहे. जागतिक बँक, आशिया विकास बँक यासारख्या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन राज्यातील सर्व छोटे मोठे सिंचन प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्याचा मानस असल्याचे जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

नदीजोड प्रकल्पांबाबत पुण्यात आयोजित कार्यशाळेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतल्यास राज्यातील सर्व सिंचन प्रकल्प मुदतीत पूर्ण होतील. निधी वाचेल आणि परिणामी सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल अशी त्या मागची भूमिका आहे त्याच्यामुळेच या संदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.”

अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला सात कोटी रुपयांचा निधी लागत होता. आता त्याची किंमत साडेपाच हजार कोटी रुपये झाली आहे. अद्यापही हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. राज्यातील सिंचन प्रकल्पांची सध्याची किंमत सुमारे पाच लाख कोटी रुपये आहे. त्या आधारावर वित्तीय संस्थांकडून सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याचा विचार आहे. त्यामुळे हे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन राज्याचा विकास झापाट्याने होईल, असा आशावद त्यांनी बोलून दाखविला. अधिकाऱ्यांनीही विभागाला १० ते २० टक्केच निधी मिळेल ही मानसिकता बदलून मागणीप्रमाणे निधी मिळेल अशी तरतूद करू असेही त्यांनी या वेळी आश्वासित केले.

महसूल विभागामध्ये कालबाह्य झालेले नियम बदलण्यासाठी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांची समिती स्थापन केली होती. त्याच धर्तीवर जलसंपदा विभागातील विकास कामांमध्ये आणि सिंचन प्रकल्पात अडथळे ठरणारे कालबाह्य नियम बदलण्यासाठी व नवीन नियम करण्यासंदर्भात लवकरच एक समिती स्थापन केली जाईल. अहवाल तयार करण्यासाठी समितीला तीन महिन्याची मुदत देण्यात येईल. तसेच पाणी परिषदेच्या काही ज्येष्ठ अनुभवी तज्ज्ञ मंडळींकडून जलसंपदा विभागात सुरू असलेले प्रकल्प आणि होऊ घातलेल्या प्रकल्पाबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी एक सल्लागार मंडळ नियुक्त करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला.

टॅग्स :PuneपुणेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलministerमंत्रीMaharashtraमहाराष्ट्रMONEYपैसाbusinessव्यवसाय