शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

...तरी आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले" RPI ला विधानसभेच्या १२ जागा मिळाव्यात - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 12:27 IST

आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, राज्यस्तरावर आणि जिल्हा, तालुकास्तरावर ज्या समित्या आहेत तिथे आम्हाला संधी मिळावी

पुणे: लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत, तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत किमान १० ते १२ जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.

ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण न होता मराठ्यांना देखील आरक्षणाचा लाभ मिळावा, क्रिमिलेयरची मर्यादा ८ लाखांवरून १२ लाख रुपये करावी, असेही ते म्हणाले. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य संघटक परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे, आयूब शेख, श्रीकांत कदम, सतीश केदारी आदी उपस्थित होते.

आठवले म्हणाले की, लोकसभेत आमच्या पक्षाला दोन जागा मिळणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही. तरीही नाराजी दूर ठेवून आम्ही कामाला लागलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आरपीआयला एक विधान परिषद मिळावी, अशी विनंती केली होती. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आमचा समावेश व्हावा. विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२ जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे.

आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, राज्यस्तरावर आणि जिल्हा, तालुकास्तरावर ज्या समित्या आहेत तिथे आम्हाला संधी मिळावी. महामंडळांच्याही नियुक्त्या कराव्यात, अशी आमची मागणी आहे. विधानसभेत महायुतीला १७० ते २०० जागा मिळतील, असेही आठवले यांनी नमूद केले. संविधानाचा मुद्दा या निवडणुकीत चालणार नाही, लोकसभा निवडणुकीत मोठा गैरसमज निर्माण करून विरोधकांनी दलित आणि अल्पसंख्यांक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून मते घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही, असेही आठवले म्हणाले.

ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, माझं दोन्ही समाजांना आवाहन आहे की, भांडण न करता आपला अधिकार मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, पण मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने पुन्हा विचार करावा. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, पण मराठ्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभाlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणMahayutiमहायुती