शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

...तरी आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले" RPI ला विधानसभेच्या १२ जागा मिळाव्यात - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 12:27 IST

आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, राज्यस्तरावर आणि जिल्हा, तालुकास्तरावर ज्या समित्या आहेत तिथे आम्हाला संधी मिळावी

पुणे: लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत, तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत किमान १० ते १२ जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.

ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण न होता मराठ्यांना देखील आरक्षणाचा लाभ मिळावा, क्रिमिलेयरची मर्यादा ८ लाखांवरून १२ लाख रुपये करावी, असेही ते म्हणाले. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य संघटक परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे, आयूब शेख, श्रीकांत कदम, सतीश केदारी आदी उपस्थित होते.

आठवले म्हणाले की, लोकसभेत आमच्या पक्षाला दोन जागा मिळणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही. तरीही नाराजी दूर ठेवून आम्ही कामाला लागलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आरपीआयला एक विधान परिषद मिळावी, अशी विनंती केली होती. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आमचा समावेश व्हावा. विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२ जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे.

आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, राज्यस्तरावर आणि जिल्हा, तालुकास्तरावर ज्या समित्या आहेत तिथे आम्हाला संधी मिळावी. महामंडळांच्याही नियुक्त्या कराव्यात, अशी आमची मागणी आहे. विधानसभेत महायुतीला १७० ते २०० जागा मिळतील, असेही आठवले यांनी नमूद केले. संविधानाचा मुद्दा या निवडणुकीत चालणार नाही, लोकसभा निवडणुकीत मोठा गैरसमज निर्माण करून विरोधकांनी दलित आणि अल्पसंख्यांक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून मते घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही, असेही आठवले म्हणाले.

ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, माझं दोन्ही समाजांना आवाहन आहे की, भांडण न करता आपला अधिकार मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, पण मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने पुन्हा विचार करावा. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, पण मराठ्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभाlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणMahayutiमहायुती