शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात वादापेक्षा 'लवादाची'भूमिका ठरणार महत्वाची; सामंजस्याने मिटवून घेण्यावर राहणार भर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 20:35 IST

परिस्थिती लॉकडाऊन नंतरची.. 

ठळक मुद्देसामंजस्याने एकमेकांमधील वाद मिटवले गेल्यास त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होणार सध्या न्यायालयात येणाऱ्या केसेस या आर्थिक आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या अधिक

पुणे : सगळ्याचे सोंग आणता येते, मात्र पैशाचे नाही. येत्या काळात आपआपसातील वाद मिटविण्यासाठी कोर्टाची  पायरी चढणे निदान सर्वसामान्य पक्षकाराला शक्य होणार नाही. हातावर पोट असणाऱ्याची तर गोष्टच वेगळी. अशातच परिस्थिती लक्षात घेता सामंजस्याने एकमेकांमधील वाद मिटवले गेल्यास त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होणार आहे. लॉकडाऊन नंतरची असणारी आर्थिक परिस्थिती लक्षात घेता असा निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढणारा प्रभाव याचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रावर होताना दिसत आहे. कोरोनामुळे केवळ महत्वाच्या प्रकरणावर सुनावणी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. असे असताना फसवणूक, कौटुंबिक हिंसाचार, मालकी हक्क व ताबा विषयक वाद याप्रकारचे खटले दाखल होत आहेत. महत्वाच्या प्रकरणावर ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरसद्वारे सुनावणी होत आहे. न्यायालयीन बदलत्या परिस्थिती विषयी अधिक माहिती देताना अ‍ॅड. चिन्मय भोसले म्हणाले, नागरिकांनी आपल्याला होणारा त्रास लक्षात घेता शक्यतो ऑनलाइनद्वारे अर्ज करण्यावर अधिक भर द्यावा. मुळात अद्याप आपली ही टेक्नॉलॉजी ग्रामीण भागात देखील तितक्याच प्रभावीपणे पोहचली आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे. ज्यावेळी आपण ऑनलाइनद्वारे न्यायनिवाडा असे म्हणतो त्यावेळी संबंधित त्या वकीलाकडे, पक्षकाराकडे आणि साक्षीदाराकडे ती सुविधा आहे का ? हे पाहावे लागेल. तळागाळापर्यत ती सुविधा पोहचायला हवी. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे, ऑनलाइन माध्यमातून न्याय मिळत नसल्यास पक्षकारांनी सुरुवातीला 'मेडीएशन' साठी जावे. देशातला 70 वर्षांपूवीर्चा ट्रेंड लक्षात घेतला की लक्षात येते, वाद झाल्यास कोर्टात जाणे, पण आताची परिस्थिती पाहता, कोर्टावरील वाढता ताण लक्षात घेतल्यास ( लॉकडाऊनच्या दरम्यानचा कालावधी) न्यायनिवाडासाठी किती वाट पाहावी लागेल याचा विचार करावा. म्हणून वादापेक्षा लवादाची भूमिका महत्त्वाची ठरेल. ......................

* अनेकजण 'सेटलमेंट' च्या दृष्टीने अधिक प्रयत्न करणारसध्या न्यायालयात येणाऱ्या केसेस या आर्थिक आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या अधिक आहेत. लोक घरी बसून असले तरी खर्चात काही कमी नाही. तो वाढतो आहे. बँकेचे हफ्ते पुढे ढकलले असले तरी पगार कपात करण्यात आली आहे. आणि हफ्त्यावरील व्याज भरावे लागणार आहे. ते काही चुकणार नाही. विशेषत: व्यावसायिकांना दोन महिने मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पैसे परत मिळत नसल्याने 'रिकव्हरी' च्या केसेस वाढणार आहेत. मात्र त्यात मोठी अडचण म्हणजे त्याला लागणारी स्टॅम्प ड्युटी. ती देणे, वकिलांची फी देणे, यामुळे कोर्टात जायचे की थोडावेळ थांबायचे असे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही केसेस कमी होतील. बहुतेक करून अनेकजण 'सेटलमेंट' च्या दृष्टीने अधिक प्रयत्न करतील. कौटुंबिक केसेस वाढल्या असे जरी असले तरी महिला पुढे येतील का प्रश्न असून तो आर्थिकतेशी जोडला गेला आहे. - अ‍ॅड. प्रतिभा घोरपडे

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयadvocateवकिलFamilyपरिवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस