शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

भविष्यात वादापेक्षा 'लवादाची'भूमिका ठरणार महत्वाची; सामंजस्याने मिटवून घेण्यावर राहणार भर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 20:35 IST

परिस्थिती लॉकडाऊन नंतरची.. 

ठळक मुद्देसामंजस्याने एकमेकांमधील वाद मिटवले गेल्यास त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होणार सध्या न्यायालयात येणाऱ्या केसेस या आर्थिक आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या अधिक

पुणे : सगळ्याचे सोंग आणता येते, मात्र पैशाचे नाही. येत्या काळात आपआपसातील वाद मिटविण्यासाठी कोर्टाची  पायरी चढणे निदान सर्वसामान्य पक्षकाराला शक्य होणार नाही. हातावर पोट असणाऱ्याची तर गोष्टच वेगळी. अशातच परिस्थिती लक्षात घेता सामंजस्याने एकमेकांमधील वाद मिटवले गेल्यास त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होणार आहे. लॉकडाऊन नंतरची असणारी आर्थिक परिस्थिती लक्षात घेता असा निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढणारा प्रभाव याचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रावर होताना दिसत आहे. कोरोनामुळे केवळ महत्वाच्या प्रकरणावर सुनावणी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. असे असताना फसवणूक, कौटुंबिक हिंसाचार, मालकी हक्क व ताबा विषयक वाद याप्रकारचे खटले दाखल होत आहेत. महत्वाच्या प्रकरणावर ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरसद्वारे सुनावणी होत आहे. न्यायालयीन बदलत्या परिस्थिती विषयी अधिक माहिती देताना अ‍ॅड. चिन्मय भोसले म्हणाले, नागरिकांनी आपल्याला होणारा त्रास लक्षात घेता शक्यतो ऑनलाइनद्वारे अर्ज करण्यावर अधिक भर द्यावा. मुळात अद्याप आपली ही टेक्नॉलॉजी ग्रामीण भागात देखील तितक्याच प्रभावीपणे पोहचली आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे. ज्यावेळी आपण ऑनलाइनद्वारे न्यायनिवाडा असे म्हणतो त्यावेळी संबंधित त्या वकीलाकडे, पक्षकाराकडे आणि साक्षीदाराकडे ती सुविधा आहे का ? हे पाहावे लागेल. तळागाळापर्यत ती सुविधा पोहचायला हवी. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे, ऑनलाइन माध्यमातून न्याय मिळत नसल्यास पक्षकारांनी सुरुवातीला 'मेडीएशन' साठी जावे. देशातला 70 वर्षांपूवीर्चा ट्रेंड लक्षात घेतला की लक्षात येते, वाद झाल्यास कोर्टात जाणे, पण आताची परिस्थिती पाहता, कोर्टावरील वाढता ताण लक्षात घेतल्यास ( लॉकडाऊनच्या दरम्यानचा कालावधी) न्यायनिवाडासाठी किती वाट पाहावी लागेल याचा विचार करावा. म्हणून वादापेक्षा लवादाची भूमिका महत्त्वाची ठरेल. ......................

* अनेकजण 'सेटलमेंट' च्या दृष्टीने अधिक प्रयत्न करणारसध्या न्यायालयात येणाऱ्या केसेस या आर्थिक आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या अधिक आहेत. लोक घरी बसून असले तरी खर्चात काही कमी नाही. तो वाढतो आहे. बँकेचे हफ्ते पुढे ढकलले असले तरी पगार कपात करण्यात आली आहे. आणि हफ्त्यावरील व्याज भरावे लागणार आहे. ते काही चुकणार नाही. विशेषत: व्यावसायिकांना दोन महिने मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पैसे परत मिळत नसल्याने 'रिकव्हरी' च्या केसेस वाढणार आहेत. मात्र त्यात मोठी अडचण म्हणजे त्याला लागणारी स्टॅम्प ड्युटी. ती देणे, वकिलांची फी देणे, यामुळे कोर्टात जायचे की थोडावेळ थांबायचे असे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही केसेस कमी होतील. बहुतेक करून अनेकजण 'सेटलमेंट' च्या दृष्टीने अधिक प्रयत्न करतील. कौटुंबिक केसेस वाढल्या असे जरी असले तरी महिला पुढे येतील का प्रश्न असून तो आर्थिकतेशी जोडला गेला आहे. - अ‍ॅड. प्रतिभा घोरपडे

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयadvocateवकिलFamilyपरिवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस