शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

वरंध घाटातील रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:10 IST

भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटातील महाड हद्दीत मागील पावसाळ्यात पडलेले संरक्षक भिंतीचे काम मागील ३५ दिवसांपासून अत्यंत संथगतीने सुरु आहे. ...

भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटातील महाड हद्दीत मागील पावसाळ्यात पडलेले संरक्षक भिंतीचे काम मागील ३५ दिवसांपासून अत्यंत संथगतीने सुरु आहे. अशाच पध्दतीने काम सुरु राहिल्यास ८० दिवसांत म्हणजे ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद आहेत. यामुळे प्रवासी नागरिक नाराजी व्यक्त करीत असून, लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी होत जोर धरत आहे.

भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाटातील महाड तालुक्याच्या हद्दीतील एका तीव्र वळणावरील संरक्षण भिंत १३ ऑगस्ट २०२० रोजी अतिवृष्टीमुळे कोसळली होती. यामुळेेे मागील सात महिन्यांपासून मोठ्या गाड्यांची वाहतूक बंद होती. लहानच गाड्या सुरू होत्या. हा रस्ता व संरक्षक भिंती दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सुमारे ५ कोटी ४० लाख ५५ हजार रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभाग महाडकडून मंजूर झाला आहे. अंदाजपञक तांञिक मान्यता होऊन निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे.सदरच्या कामासाठी १० फेब्रुवारी ते ३० एप्रिलपर्यत ८० दिवस सदर रस्त्यावरील वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात आली आहे.

वरंधा घाटातील सदर रस्त्याचे काम करण्याची जागा दुर्गम आहे. या ठिकाणी एक खाली तीन मोठी तीव्र उताराचे वळण असून जागा अत्यंत अरुंद आहे. संरक्षक भिंतीचे काम करताना खोलवर खोदाई करावी लागणार आहे तसेच कामासाठी लागणारी यंत्रसामग्री इतर सहित्यासाठी जागा बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी जागा अपुरी पडणार आहे. त्यामुळे काम सुरु असताना अपघात होऊ नये म्हणून सदार रस्त्यावरील वाहतूक पूर्ण बंद करण्यात आले आहे.

दरम्यान, मागील ३५ दिवसांपासून रस्त्यावरील वाहतूक बंद असून संबंधित ठेकेदाराने सध्या संरक्षक भिंतीच्या पायाची खोदाई केली असून मातीचे उत्खनन केलेले आहे. मात्र भिंतीच्या काँक्रेटचे काम अद्याप सुरु झालेले नाही.त्यामुळे पुढील ४५ दिवसांत काम पूर्ण होईल का? मे महिना पण काम करण्यासाठी जाणार, अशी भीती प्रवासी नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

वरंध घाट बंद असल्याने हाॅटेलसह अनेक उद्योगांवर परिणाम

भोर महाड रस्त्यावरील वरंध घाटातील महाड हद्दीतील वरंध घाटातील संरक्षक भिंतीचे काम करण्यासाठी घाट बंद असल्यामुळे भोर शहरासह सदर रस्त्यावरील हाॅटेल व्यवसाय बंद असून भाजीपाला वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहतूक गाड्या मालवाहतूक गाड्या बंद असून पर्यटकांना कोकणात जाण्यास जवळचा मार्ग बंद असल्याने मुळशीतील ताम्हणी

किंवा महाबळेश्वरवरुन आबेनळी घाटाचा वापर करुन कोकणात जावे लागते हे परवडणारे नाही. त्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद आहेत.

भोर महाड रस्त्यावरील वरंध घाटातील महाड हद्दीतील सुरु असलेले काम फोटो