शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावर रास्ता रोको; शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला नाही तर मंत्रालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 18:36 IST

'सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण', 'सरकारची दिवाळी मात्र शेतकऱ्यांचा शिमगा' अशा विविध घोषणा देत शेतकऱ्यांनी शासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला

शेलपिंपळगाव : चाकण - शिक्रापूर राज्यमहामार्गावर खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. 'जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची', 'लढा ना राजकारणासाठी ना स्वार्थासाठी, लढा आमच्या हक्कासाठी', 'पाणी नाही तर जमीन नाही', 'सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण', 'सरकारची दिवाळी मात्र शेतकऱ्यांचा शिमगा' अशा विविध घोषणा देत शेतकऱ्यांनी शासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला. दरम्यान रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. तर आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.            खेड तालुक्यातील चासकमान, भामा आसखेड धरण अंतर्गत खेड तालुक्यातील काळूस भागातील २५ पेक्षा अधिक गावातील शेतजमिनीवर ४० वर्षापासून पुनर्वसनाचे शिक्के टाकले आहेत. प्रत्यक्षात कालव्याद्वारे येणारे पाणी या भागाला येत नाही. कालवे रद्द झाले आहे. लाभ क्षेत्रात ही गावे येत नसताना अन्यायकारक पद्धतीने हे शिक्के तसेच ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन विकणे, कर्ज काढणे, जमिनीचे कुटुंबातवाटप करणे, दलालान मार्फत जमिनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणे यासारख्या अनेक प्रश्नांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.          यापार्श्वभूमीवर काळूस येथे मागील काही दिवसांपासून साखळी उपोषणाद्वारे आंदोलनही सुरू आहे. मात्र शासन आपल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत नसल्याने माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली भोसे येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. शेतकऱ्यांनी बैलगाड्या व जनावरे घेऊन रस्त्यावर तासभर ठिय्या मांडला. आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य रयत क्रांती युवा आघाडीचे अध्यक्ष सागर खोत, महाराष्ट्र राज्य रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक भोसले, माजी उपसभापती ज्योती आरगडे, मनोहर वाडेकर, डॉ. बाळासाहेब माशेरे, सुभाषराव पोटवडे, नवनाथ आरगडे, बाजीराव लोखंडे, मोहन पवळे यांनी मनोगते व्यक्त करून तीव्र भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला नाही तर मंत्रालयाला घेराव घालण्याचे आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय देखील घेण्यात येणार असल्याचे इशारा देण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीagitationआंदोलनFarmerशेतकरीGovernmentसरकार