शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

वरंध घाटातील रस्ता अवजड वाहनांसाठी तीन महिने बंद; रायगड जिल्हा प्रशासनाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 20:41 IST

सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. वरंध घाटातील रस्त्यावर दरडी पडत आहेत...

भोर (पुणे) : पावसामुळे दरड पडत असून, महाडमार्गे वरंध घाटातून भोरला येणे धोकादायक झाले आहे. यामुळे १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत तीन महिने रायगड प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव महाड - भोर रस्ता अवजड वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असून, सूचना फलक लावण्यात आले आहेत.

सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. वरंध घाटातील रस्त्यावर दरडी पडत आहेत. यामुळे रस्त्यावरील वाहतूक धोकादायक असल्यामुळे जिल्हा वाहतूक शाखा रायगड अलिबाग यांनी महाड औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशन यांना पत्र दिले आहे. वरंध घाट रस्ता जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयाकडून १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्याचे नियोजन करावयास सांगितले आहे. याबाबत सूचना फलक, महाड हद्दीतील राजेवाडी, ता. महाड येथे लावण्यात आले आहे.

भोर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भोर तालुक्यात भोर-महाड रस्त्यावरील डोंगरातून पाण्याचे धबधबे बाहेर पडत आहेत. यामुळे पर्यटक घाट माथ्यावर आणि घाटात येऊ लागले आहेत. भोर - महाड रस्ताही नवीन झाला आहे. यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे.

दरम्यान, भोर येथून महाडला मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे मागील वर्षी भोर प्रशासनाकडून भोर - महाड रस्ता सुरक्षिततेच्या कारणास्तव तीन महिने बंद ठेवला होता. यावर्षी रस्ता आणि रस्त्यावरील मोऱ्यांची कामे झाली असून, वाहतुकीस रस्ता योग्य आहे. थोड्या फार प्रमाणात दरडी, झाडे पडत आहेत. भोर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना अद्याप दिलेल्या नाहीत. मात्र महाड हद्दीतील वाहतूक बंद केल्याने भोर येथून अवजड वाहनांना महाडला जाता येणार नाही आणि जाणाऱ्या अवजड वाहनांची अडचण होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेRaigadरायगड