गॅसवाहिनीसाठी रस्ताच कापला
By Admin | Updated: September 15, 2014 23:23 IST2014-09-15T23:23:04+5:302014-09-15T23:23:04+5:30
शासनाचे रस्ता सुरक्षाविषयी असणारे सर्व नियम धाब्यावर बसवत गॅसवाहिनीसाठी रस्ताच कापला जात आहे. बिरदवडी (ता. खेड) येथे हा प्रकार सुरू आहे.

गॅसवाहिनीसाठी रस्ताच कापला
आंबेठाण : शासनाचे रस्ता सुरक्षाविषयी असणारे सर्व नियम धाब्यावर बसवत गॅसवाहिनीसाठी रस्ताच कापला जात आहे. बिरदवडी (ता. खेड) येथे हा प्रकार सुरू आहे. यामुळे अपघात वाढले असून, रविवारी भाम बाजूकडून बिरदवडीकडे जाणारी कार साईडपट्टीचा अंदाज न आल्याने या खोदकामात जाऊन पलटी झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
चाकण ते उरण असे गॅसवाहिनीचे काम सध्या सुरू आहे. त्या कामाची सुरुवात चाकणजवळील रोहकल फाटा येथून करण्यात आली. तसेच, या कामाचा काही भाग आंबेठाण आणि वराळे येथे सुरू आहे.
उरण येथून गॅस आणून तो चाकण आणि शिक्रापूर येथे वितरीत केला जाणार असल्याचे येथील कर्मचारीवर्गाने सांगितले. एचपीसीएल या कंपनीकडून हे काम
कल्पतरू ट्रान्समिशन पॉवर लिमिटेड या कंपनीने घेतले आहे.
बिरदवडी परिसरात काम सुरू असताना वाहतूककोंडी होत आहे. नागरिकांना याचा त्नास करावा लागत आहे. बिरदवडी ते भाम हा राजगुरुनगरला जाण्यासाठी जवळचा आणि पर्यायी मार्ग आहे.
परंतु, या ठिकाणी हे काम सुरू असल्याने अनेक अडचणी येत आहेत. या मार्गावर पाईप खाली करणारे ट्रक, खोदकाम करणारे जेसीबी, वेल्डिंग करणारे मशीन आणि इतर साहित्य असल्याने वाहतूककोंडी होत असून, रस्त्याचे नुकसान होत आहे.
मागील 4 ते 5 महिन्यांत वराळे गावाकडे जाणारा रस्ता जवळपास तीन वेळा खोदण्यात आला.
वारंवार रस्ता आणि साईडपट्ट्या खोदल्या जात असल्याने त्यांची चाळण होत आहे.
अधिकारी मात्न डोळे उघडे ठेवून हे सर्व पाहत आहे. या दोन्ही ठिकाणी म्हणजे आंबेठाण आणि बिरदवडी परिसरात रस्ता अतिशय खराब आहे आणि त्यात तो अजून खराब होत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवासी कात्नीत सापडला आहे. (वार्ताहर)
अपघाताला निमंत्नण
रविवारी या ठिकाणी भाम बाजूकडून बिरदवडीकडे जाणारी मारुती कार रस्त्याच्या साईडपट्टीचा अंदाज न आल्याने ओढय़ात जाऊन पलटी झाली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नसून गाडीचे मात्न नुकसान झाले आहे. रोहकल ग्रामस्थांनी हे काम बंद केले आहे. हे काम असेच सुरू राहिले तर आंदोलनाची भाषा ग्रामस्थ करीत आहेत.
अधिका:यांचा अंकुश नाही
रस्ता खोदाई करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर हे काम नियमानुसार सुरू आहे की नाही, हे पाहण्याचे कामदेखील अधिकारी करीत नाही, असे चित्न आहे. वराळे आणि आंबेठाण परिसरात काही सूचना देऊनही येथे काम करणा:या कर्मचा:यांनी त्या धुडकावून लावल्या. त्यामुळे या नियमबाह्य कामावर अधिकारीवर्गाचा अंकुश नसल्याचे स्पष्ट होते.
4अगदी डांबरी रस्त्यालगत खोदकाम केले जात आहे. अनेक ठिकाणी तर मुख्य साईडपट्टय़ा खोदून पाईप गाडले जात आहेत. या ठिकाणी काही रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या ताब्यात आहे. परंतु, आधीच खराब असणारा हा रस्ता पुन्हा खोदकाम केले जात असल्याने जास्तच खराब होत आहे.
4या रस्त्याला साईडपट्टी आणि गटारे तर राहिलेलीच नाहीत. खोदकाम करताना निघालेला राडारोडा तसाच पडत असून, त्यामुळे गटाराच्या पाण्याची दिशा बदलत आहे. काही ठिकाणी तर पाणी शेतक:यांच्या शेतातून जाते.
4अनेक ठिकाणी तर रस्ता उकरल्यानंतर तो पुन्हा गाडल्यानंतर अनेक ठिकाणी खचत असून, या ठिकाणी मोठय़ा चिरा पडल्या आहेत. या ठिकाणी पुन्हा भरावासाठी मुरूम न टाकता त्या ठिकाणी माती टाकली जात असल्याने वाहने खचण्याचे प्रमाण वाढत आहेत.