शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव व जुन्नर भागात भात लावणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 15:56 IST

पाऊस लांबल्यास भात उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता 

पुणे: जिल्ह्यातील पावसाने दडी मारली असली तरी जुन्नर,  खेड आणि आंबेगाव तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम पट्ट्यातील भात खाचरांमध्ये पाणी आलेल्या व पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मोटारी लावून भात शेतीत पाणी घेऊन भात लावणीला सुरुवात केली आहे. पण पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास हे सर्व भात उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ शकतात. 

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या सहा तालुक्यात प्रामुख्याने भात लागवड केली जाते. जुन महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या चांगल्या पावसानंतर भाताची रोप टाकण्यात आली. त्या नंतर अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरीमुळे खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात भात रोपाची चांगली वाढ झाली. त्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या चांगल्या पावसाने भात खाचरामध्ये चांगले पाणी देखील आले. यामुळेच चांगले भात पिक येण्याच्या उद्दिष्टाने पाण्याची सोय झालेल्या शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात देखील केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी विहिरी, नदी अथवा ओढ्यामध्ये मोटार टाकून भात खाचरांमध्ये पाणी घेऊन भात लावणी उरकली आहे. पण आता गेल्या चार -पाच दिवसांत पावसाने पूर्णपणे दडी दिली असून कडक ऊन पडत आहे. हे वातावरण पुढील एक-दोन दिवस असेच राहिल्यास सर्वच भात उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊस