शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

मराठा बांधवावरील गुन्हे विनाशर्त मागे घ्या :  मराठा क्रांती मोर्चाची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 17:06 IST

खेड तालुक्यात ३० जुलै २०१८ रोजी मराठा मोर्चाला हिंसक वळण लागल्याने त्यातील काही मराठा समाजातील आंदोलन कर्त्यांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्दे३० जुलै २०१८ रोजी खेड तालुक्यातील मराठा मोर्चाला हिंसक वळण काही मराठा समाजातील आंदोलन कर्त्यांना अटक अद्याप राज्यभर मराठा बांधवांचे अटक सत्र सुरू

पुणे : मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलना दरम्यान राज्यातील मराठा समाज बांधवावरील दाखल गुन्हे विनाशर्त मागे घ्या. अशी मागणी शासनाकडे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. पुढील सात दिवसांच्या आत हे गुन्हे मागे न घेतल्यास १६ डिसेंबर पासून चाकण येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. मराठा मोर्चाचे पदाधिकारी मनोहर वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ३० जुलै २०१८ रोजी खेड तालुक्यातील मराठा मोर्चाला हिंसक वळण लागल्याने त्यातील काही मराठा समाजातील आंदोलन कर्त्यांना अटक करण्यात आली.काही समाजकंटकांनी मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी हिंसाचार घडवून आणला. त्या दंगलीचा ठपका हा मराठा युवकांवर ठेवण्यात आला. यामुळे त्यांना अटक करण्यात आली. अद्याप राज्यभर मराठा बांधवांचे अटक सत्र सुरू आहे. याविषयी अनेकदा शासनाला सातत्याने निवेदन देऊन देखील शासनस्तरावरून कुठल्याही प्रकारचा आदेश आला नसल्याचे वाडेकर यांनी सांगितले. खऱ्या दोषी असलेल्यावर कारवाई करा. मात्र राजकारण करून मराठा युवकांना वेठीस धरू नये. आतापर्यत २०० पेक्षा जास्त मराठा युवकांना अटक करण्यात आली असून दोन दिवसांपूर्वी २३ मराठा युवकांना अटक करण्यात आल्याचे भगवान पाटील यांनी सांगितले. खेड तालुक्याचे आमदार सुरेश गोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. त्यात त्यांनी खेड येथील मराठा मोर्चा प्रकरनाचा तपास एस आयटी मार्फत व्हावी. अशी मागणी केली. यामुळे शांत झालेल्या वातावरण पुन्हा पेटले गेले. याचा त्रास मात्र निष्पाप मराठा युवकांना सहन करावा लागला. स्थानिक आमदार यांच्या अशाप्रकारच्या राजकारणाचा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारयांनी निषेध केला. 

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPoliceपोलिस