शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

लालफितीत अडकला मुस्लिम विद्यार्थ्यांचा निकाल : अल्पसंख्यांक विभागाचे दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 12:20 IST

मुस्लिम विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होवून दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप गुणपत्रक दिले गेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

ठळक मुद्देतंत्र शिक्षण विभागाकडून पाठपुरावा सुरू

पुणे: अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होवून दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप गुणपत्रक दिले गेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.अल्पसंख्यांक विभागाने याबाबत परिपत्रक काढल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा गुणपत्रक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु,तंत्र शिक्षण विभागाने दोन वर्ष पाठपुरावा केल्यानंतरही शासनाकडून परिपत्रक प्रसिध्द झाले नाही.त्यामुळे अनेक मुस्लिम विद्यार्थ्यांचा निकाल लालफितीच्या कारभारात अडकून पडला आहे.

राज्य शासनातर्फे २०१४ मध्ये मुस्लिम व मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्यात आले होते. त्यानुसार मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळाले होते. मुस्लिम गटासाठी विशेष मागास प्रवर्ग -अ अंतर्गत शैक्षणिक प्रवेशासाठी व नोकरभरतीसाठी आरक्षण प्राप्त झाले होते. मात्र, त्यावर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. दरम्यानच्या काळात झालेले शैक्षणिक प्रवेश आबाधित ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार ईएसबीसी मराठा आरक्षणामध्ये झालेले सर्व प्रवेश कायम ठेवण्यात आले. परंतु, मुस्लिम आरक्षणाबाबत कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. आरक्षण लागू न झाल्याने संबंधित विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त होणार नाहीत. जात प्रमाणपत्रा अभावी त्यांचे विद्यापीठाचे निकाल प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. तसेच शैक्षणिक संस्थांकडून त्यावर काय कार्यवाही करावी, याविषयी तंत्रशिक्षण विभागाकडे विचारणा होत आहे. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी तंत्रशिक्षण कार्यालयात व विद्यापीठात गुणपत्रिका मिळण्यासाठी फे-या मारत आहेत.गेल्या दोन वर्षांपासून पुण्यातील सुमारे १०० ते १५० विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. त्यात काही विद्यार्थ्यांना केवळ द्वितीय वर्षांची गुणपत्रिका दिली नाही तर काहींना अंतिम वषार्ची गुणपत्रिका देण्यात आली नाही. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी व पुढील शिक्षणासाठी गुणपत्रिका सादर करता येत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.---------------अभियांत्रिकी प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाले आहेत.संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल प्रलंबित ठेऊन कोणताही हेतू साध्य होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देवून हा प्रश्न निकाल काढणे योग्य होईल. परंतु, त्यासाठी अल्पसंख्यांक विभागाने यासंदर्भात परिपत्रक काढणे गरजेचे आहे, असा पत्रव्यवहार तंत्रशिक्षण संचालक कार्यालयाकडे पुणे विभागातील तंत्र शिक्षण अधिका-यांनी केला आहे........सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत.मी आळंदीच्या एमआयटी महाविद्यालयातून अभियांत्रिकी शाखेची परीक्षा दिली. माझे द्वितीय वषार्चे गुणपत्रक अद्याप दिले गेले नाही. मला महाविद्यालयाकडून विद्यापीठात आणि विद्यापीठातून तंत्र शिक्षण विभागात पाठविले जाते. गेल्या दोन वर्षांपासून गुणपत्रिका मिळाण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.पुणे विद्यापीठ वगळता इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आल्याचे दिसून येत आहे. गुणपत्रिका नसल्याने मला नोकरी व पुढील शिक्षणासाठी अडचण येत आहे. - महिबूब खान,विद्यार्थी 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीMuslimमुस्लीमreservationआरक्षण