शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
4
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
5
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
6
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
7
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
8
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
9
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
10
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
11
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
12
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
13
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
14
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
15
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
16
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
17
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
18
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
19
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
20
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेचा पुन्हा आंदोलनाचा इशारा, येत्या १ जून रोजी सरकारी कार्यालयांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 16:24 IST

राज्यातील ऐतिहासिक शेतकरी संपाला येत्या १ जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील समविचारी शेतकरी संघटनांना सोबत घेत सरकारी कार्यालयांना घेराव घालून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे

ठळक मुद्देआंदोलनाची आग पेटली की जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे फायर बिग्रेडच्या भूमिका बजावतात.सध्याच्या सत्ताधा-यांची आंदोलकांना केवळ खोटी आश्वासने द्यायची भूमिका देशभर सह्यांची मोहिम राबवून दहा कोटी सह्या गोळा करून पंतप्रधानांना पाठविण्यात येणार

पुणे: शेतक-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या लाँग मार्चमध्ये शासनाने मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी व उर्वरित प्रश्नांसाठी अखिल भारतीय किसान सभेने पुन्हा एकदा राज्यभर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ऐतिहासिक शेतकरी संपाला येत्या १ जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील समविचारी शेतकरी संघटनांना सोबत घेत सरकारी कार्यालयांना घेराव घालून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले यांनी मंगळवारी दिला.अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत नवले बोलत होते. यावेळी बाबा नवले,डॉ.अमोल वाघमारे,नाथा शिंगाडे, अजित अभ्यंकर,डॉ.महेंद्र डाळे,ज्ञानेश्वर मोटे,सोमनाथ निर्मळ आदी उपस्थित होते. नवले म्हणाले,शेतकरी संपावर गेल्यानंतर नाशिक ते मुंबई शेतक-यांचा पायी लाँग मार्च काढून शेतकरी संघर्ष अधिक व्यापक करण्यात आला. शासनाने या आंदोलनाची दखल घेवून काही मागण्या मान्य केल्या होत्या.त्यात स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, वीजबील माफ करावे,स्वस्त दरात शेती बी-बियाणे उपलब्ध करून द्यावीत. वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी, कष्टकरी शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन द्यावी आदी मागण्यांचा समावेश होता. समिती स्थापन करून दीड महिन्यात या मागण्यांची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन शासनाने दिले होते.परंतु,राज्य कृषीमूल्य आयोगाची स्थापना, नियम, कार्यपध्दती ठरविण्यासाठी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.आंदोलकांना केवळ खोटी आश्वासने द्यायची,अशीच भूमिका सध्याच्या सत्ताधा-यांची आहे. त्यामुळे या सत्ताधा-यांची नियत साफ नाही, असेच दिसून येते. शासनाला त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी येत्या १जून रोजी राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांना घेराव घातला जाणार आहे. तसेच देशभर सह्यांची मोहिम राबवून दहा कोटी सह्या गोळा करून पंतप्रधानांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर देशव्यापी लढ्याची घोषणा करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रातून २० लाख सह्या गोळ्या केल्या जाणार आहेत.

....................आंदोलनाची आग पेटली की जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे फायर बिग्रेडच्या भूमिका बजावतात.आंदोलकांना आश्वासन दिली जातात. मात्र, त्याच्या पूर्ततेबाबत कोणत्याही हालचाली केल्या जात नाही. गेल्या वर्षभरात किसान सभेने केलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून शेतक-यांची प्रचंड उपेक्षा केली आहे.गेल्या महिन्याभरात महाजन यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून दिलेल्या आश्वासनाचे काय झाले याबाबत विचारणा केली. परंतु, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. फायर ब्रिगेडचे काम आग विझविण्याबरोबरच आग लागू नये याची काळजी घेणे हे सुध्दा असते. मात्र,महाजन यांनी त्यादृष्टीने प्रयत्न केले नाही. त्यामुळे फायर बिग्रेड म्हणून महाजनही आता उपयोगी येणार नाहीत,असेही डॉ.अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीGirish Mahajanगिरीश महाजन