शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

'टेमघर'ची दुरुस्ती आता जानेवारीतच सुरू होणार; वर्षात पाचच महिने काम

By नितीन चौधरी | Updated: April 16, 2025 16:33 IST

निविदा प्रसिद्ध होऊन जुलैत ठरणार कंत्राटदार काम पूर्णत्वाला जाण्यास तीन वर्षे लागणार

पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणातून होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामाला आता पुढील वर्षी जानेवारीत मुहूर्त लागणार आहे. अंदाजपत्रक तयार करणे त्याला मंजुरी मिळणे आणि त्यानंतर निविदा प्रसिद्ध होऊन कंत्राटदार निश्चित होणे, यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पावसाळ्यात काम करणे शक्य नसल्याने दुरुस्तीच्या कामासाठी जानेवारीचा वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, जुन्या कंत्राटदाराकडून काम केले असते तर मेअखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करता आली असती. मात्र, आता नवीन कंत्राटदारच काम करेल, हे स्पष्ट झाले आहे.

टेमघर धरणातून पाणीगळती होत असताना दुरुस्तीस २०२० नंतर तब्बल पाच वर्षांनंतर मुहूर्त मिळाला आहे. धरणाच्या मजबुतीकरण व गळती रोखण्याच्या कामासाठी राज्य मंत्रिमंडळाने ७ फेब्रुवारीच्या बैठकीत ३१५ कोटी ५ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली. टेमघर धरणातून पुणे शहराला दरवर्षी ३.७१ टीएमसी पाणी पिण्यासाठी उपलब्ध केले जाते. धरणातून २०१० पासून गळती सुरू असल्याचे निदर्शनास आले. ही गळती २०१६-१७ मध्ये २ हजार ५८७ लिटर प्रतिसेकंद इतकी होती. त्यानंतर गळती रोखण्यासाठी दुरुस्तीच्या कामावर ९१ कोटी ६६ लाख रुपये खर्च झाला. यामुळे गळतीच्या प्रमाणात ९६ टक्के इतकी लक्षणीय घट होऊन गळतीचे प्रमाण १९७ लिटर प्रतिसेकंद एवढे आढळून आले. मात्र, २०२० पासून निधी असूनही मंजुरीअभावी गळती रोखता आली नव्हती. सध्या गळतीचे प्रमाण २३२ लिटर प्रतिसेकंद इतके झाले आहे. त्यामुळे धरणाच्या मजबुतीकरणासाठी तसेच गळती रोखण्यासाठी उपययोजना करणे गरजेचे झाले होते.

सध्या ही गळती रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रसिद्ध केल्या जातील. सर्वात कमी दर लावणाऱ्या संस्थेला हे कंत्राट बहाल करण्यात येईल. यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ही प्रक्रिया जुलैपर्यंत चालेल. त्याकाळात पावसाळा असल्याने धरणात पाणीसाठा असतो. त्यामुळे दुरुस्तीचे काम करता येणार नाही. १५ ऑक्टोबरपर्यंत धरण पूर्ण भरलेले असते. त्यानंतर वीजगृहातून पाणी सोडून साठा कमी करण्यात येणार आहे.

धरणातील पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि शेतीसाठी होत असल्याने त्यावर खडकवासला विभागाचा अधिकार आहे. त्यामुळे त्याबाबतचा निर्णय संबंधित विभाग घेणार आहे. पाणीसाठा कमी करण्यास किमान डिसेंबर उजाडेल. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला जानेवारीचा मुहूर्त लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केेले. राज्य सरकारने मंजुरी दिल्यास १५ ऑक्टोबरपूर्वी काही दिवस लवकर पाणीसाठा कमी करता येऊ शकतो मात्र, त्यात केवळ १५ दिवस आधी धरण कामासाठी उपलब्ध होऊ शकते. मात्र, त्याासाठी पावसाळा कसा राहील, यावर सर्व अवलंबून असेल असेही ते म्हणाले. डिसेंबरच्या मध्यापर्यंत धरण रिकामे झाल्यास कंत्राटदाराला कामगार तसेच मशिनरीची जुळवाजुळव करण्यासाठी किमान दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी द्यावा लागेल. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला जानेवारीतच सुरुवात होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दुरुस्तीचे काम करण्यासाठी जानेवारी ते मे असे एकूण पाच महिनेच हाती असतील. हे काम करण्यासाठी पुढील तीन वर्षांच्या याच पाच महिन्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे निविदेत काम पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीकपात