शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

किल्ल्यांच्या दुरूस्तीसाठी गडप्रेमींनी पुढे यावे : श्रमिक गोजमगुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:02 IST

किल्ल्यांच्या डागडुजी, दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी स्वयंसेवी संस्था व गडप्रेमींना पुढाकार घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देपुरातत्व खात्याकडून ३५० पैकी केवळ ७८ किल्ले संरक्षित 

पुणे :  महाराष्ट्रात ३५० किल्ले असले तरी पुरातत्व खात्यातर्फे फक्त ७८ किल्ले संरक्षित केले जात असून,उर्वरीत किल्ल्यांच्या डागडुजी व दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी स्वयंसेवी संस्था व गडप्रेमींना पुढाकार घेण्याची गरज असल्याचे गडकिल्ल्यांचे अभ्यासक श्रमिक गोजमगुंडे यांनी सांगितले. लालमहालात झालेल्या शिवधनुष्य पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. शिवधनुष्य प्रतिष्ठान व छत्रपती शिवाजी महाराज पायी पालखी सोहळा समितीतर्फे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवनेरी ते रायगड असा सुमारे २६५ किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. पायी पालखीचे बुधवारी शिवनेरीहून पुण्यात लालमहालात आगमन झाले. यानिमित्त शिवधनुष्य पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी पार पडला. रायगडाची गेली २८ वर्षे सेवा करणारे सुधीर थोरात, जुन्नर तालुक्यातील वृद्धांची सेवा करणारी संस्था राजाराम पाटील वृद्धाश्रम आधार केंद्र व संपूर्ण गावात वृक्षारोपण करून वेगळा संदेश देणारे उरळी कांचन जवळील अष्टापूर गाव , बियॉंंड कॉपोर्रेशन सर्व्हिसेस कंपनीचे संचालक पराग मते आणि शिवशाहीर हेमंत मावळे, कलावंत सचिन गवळी यांचा सन्मान करण्यात आला. कन्याकुमारी ते काश्मीर असा सायकलवरून प्रवास करून वृक्षाचे व पाण्याचे महत्व सांगत प्रसार करणारी सायली महाराव या तरुणीचाही यावेळी खास सन्मान करण्यात आला . याप्रसंगी शिवधनुष्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक कालेकर, भोई समाजाच्या महिला अध्यक्षा भोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना सुधीर राऊत म्हणाले, रायगडाचा विकास आराखडा राज्य शासनाने तयार केला आहे . या विकास आराखड्याची अंमलबजावणी योग्य होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत.------------------------------------------------------------ 

टॅग्स :PuneपुणेFortगड