शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणी, बिल्डरांचे लागेबांधे नागरिकांच्या जिवावर : महेश झगडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 14:32 IST

मुसळधार पावसामुळे आंबिल ओढा तसेच शहराच्या इतर भागांतील नाल्यांना पूर येऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ..

ठळक मुद्दे‘पूरस्थिती खूप भयावह आहे. याला कारणीभूत असलेले हितसंबंध जगजाहीर जुलै २०१० मध्ये अशाच प्रकारे मुसळधार पावसाने नाल्यांना पूर

पुणे : शहरातील अनेक नाल्यांचे नैसर्गिक स्रोत बदलण्यात आले आहेत. त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. बांधकाम परवानग्याही चुकीच्या पद्धतीने दिल्या आहेत. अशा सर्वच गोष्टींचा शोध घेण्यासाठी तसेच पूर परिस्थितीवर उपाययोजना सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला होता. पण त्यावर काहीच निर्णय झाला नाही. राजकारणी, विकसक, अधिकारी यांचे लागबांधे असल्याने ही समिती प्रत्यक्षात आली नाही, असा थेट आरोप माजी आयुक्त महेश झगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.मुसळधार पावसामुळे आंबिल ओढा तसेच शहराच्या इतर भागांतील नाल्यांना पूर येऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काहींना आपले जीव गमवावे लागले, तर अनेकांचा संसार पुराच्या पाण्यात वाहून गेला. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या जलतांडवानंतर पुण्याचे माजी आयुक्त राहिलेले झगडे यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. ‘पूरस्थिती खूप भयावह आहे. याला कारणीभूत असलेले हितसंबंध जगजाहीर आहेत. हे तोडण्याचा मी प्रयत्न केला,’ असे सांगत त्यांनी त्यावेळी स्थायी समितीला केलेल्या एका समितीच्या शिफारशीची माहिती दिली आहे. पण समितीने त्याला विरोध केला. आता खूप उशीर झाला असला तरी जागे व्हायला हवे, असे आवाहनही झगडे यांनी केले आहे.याविषयी ‘लोकमत’शी झगडे म्हणाले, २००९ मध्ये आयुक्त म्हणून रुजू झालो. त्यानंतर हळूहळू कामाबाबतची परिस्थिती लक्षात येत होती. जुलै २०१० मध्ये अशाच प्रकारे मुसळधार पावसाने नाल्यांना पूर आला होता. त्या वेळीही भयानक स्थिती होती. मलाही त्याचा फटका बसला. याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांशी बोललो. पण त्यांनी, नेहमीच असा पाऊस येतो, त्यात नवीन काही नाही, असे सांगितले. पण मी अधिकाऱ्यांसह बावधनकडून येणाºया नाल्याची सुरुवात ते नदीपर्यंत पाहणी केली. अनेक ठिकाणी हा नाला वळविण्यात आला होता. त्यावर अनधिकृत बांधकामे झाली होती. मधेच नाला बंद करण्यात आला होता. काही ठिकाणी त्यावर रस्ते करण्यात आले होते. सोयीनुसार त्याचा प्रवाहच बदलण्यात आला होता. त्यामुळेच पूरस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. विकास आराखड्यामध्ये नैसर्गिक नाल्याचा प्रवाहच दाखवायला नाही. आराखडा व प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये फरक होता. प्रशासन, अधिकारीच बांधकामांना परवानगी देते. त्यांच्यावर कुणाचा दबाव असतो हे सर्वांना माहीत आहे. चुकीच्या पद्धतीने परवानग्या देण्याचे प्रकार विकसक, राजकारण्यांच्या दबावाखालीच होतात.......पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी २०१० मध्ये स्थायी समितीकडे उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. निवृत्त न्यायाधीश व सचिव दर्जाचे आयएएस अधिकारी त्यात असतील. ........शहरातील पावसाळी गटारे, नाले, ओढ्यांची स्थिती व भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून करावयाच्या उपायोजना तसेच दोषींना शिक्षा व्हावी हा समितीचा हेतू होता. समितीच्या शिफारशी पालिकेला बंधनकारक ठरल्या असत्या; पण अधिकाºयांच्या दबावाखाली स्थायी समितीने प्रस्ताव फेटाळला. ..........विजय कुंभार, विवेक वेलणकर, निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी नंतर पुढाकार घेतला. पण त्यांची समिती वांझोटी ठरली असती. त्यातील शिफारशींच्या अंमलबजावणीचे बंधन नव्हते, असे झगडे यांनी सांगितले......पूरस्थिती निर्माण होण्यामागची कारणे माहिती आहे. नेमका रोग माहीत असल्याने त्यावर उपचार करणे शक्य आहे. पण उपाययोजना करण्यापूर्वी त्याभोवती केवळ चर्चा सुरू असते. त्यानंतर काही दिवसांत हा विषय दुर्लक्षित होतो. अजूनही उशीर झालेला नाही. उपाययोजना करता येऊ शकतात. आतापासून प्रयत्न सुरू केले तर अशा घटनांची तीव्रता कमी करता येईल. मी आयुक्त असताना तसे प्रयत्न केले. लोकांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार कुणालाही नाही. नागरिकांनी याबाबत पुढे यायला हवे. - महेश झगडे, माजी आयुक्त, पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेfloodपूरPoliticsराजकारणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका