शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

राज्यपालांना विमान परवानगी नाकारणं हा राज्य सरकारच्या मनाचा कद्रुपणा : चंद्रकांत पाटलांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 14:28 IST

राज्य सरकारकडून सुडाचे, द्वेषाचे राजकारण सुरु आहे. मात्र, सामान्य जनता ही गोष्ट पाहत आहे.

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नियोजित दौऱ्यानुसार आज उत्तराखंडसाठी रवाना होणार होते. पण सरकारी विमानात बसल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप त्यांच्या विमान प्रवासाला परवानगी देण्यात आलेली नसल्याचं कळालं. त्यामुळे त्यांना विमानातून खाली उतरावं लागलं आणि पुन्हा राजभवनात परतावं लागल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर विरोधी पक्षांकडून राज्य सरकारच्या या निर्णयाविरुद्ध टीकेची झोड उठविण्यात येत आहे. आता याच धर्तीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांना हवाई प्रवासाला परवानगी नाकारत विमानातून खाली उतरविणे हा राज्य सरकारच्या मनाचा कद्रूपणा आहे अशा शब्दात ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

पुण्यात चंद्रकांत पाटील एका बैठकीला उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, आधी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली. आता राज्यपालांना विभागले जात आहेत. हे छोट्या मनाचे लक्षण आहे. साधारण राज्यपालांच्या कुठल्याही प्रवासाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठ्वावी लागते. तसेच ही फाईल मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ मार्गी लावली जाते. पण राज्यपालांची ही फाईल क्लिअर केली गेली नाही. त्यामुळे त्यांना शासकीय विमातून उतरावे लागले. आणि व्यावसायिक विमानाने हा प्रवास करावा लागला. हे सर्व सुडाचे द्वेषाचे राजकारण सुरु आहे. सामान्य जनता ही गोष्ट पाहत आहे.

सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचे ट्विट देश अहिताचे आहे का? सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर यांनी केलेले ट्विट हे देश हिताचे होते की अहिताचे ? त्यांनी अन्य देशातल्या लोकांनी आमच्या देशांगांतर्गत प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज नाही यासंबंधी हे ट्विट केले. ते चुकीचे आहे का? त्याची चौकशी करणार आहे का? मुळात ते देश हिताचे बोलले पण त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही असा सवाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. 

मुख्यमंत्र्यांनी एवढा एवढा अहंकार बाळगणे योग्य नाही : देवेंद्र फडणवीस

राज्यातील ठाकरे सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आहे. मात्र याच मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्याच दरम्यान माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना संताप व्यक्त केला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात एवढे अहंकारी इगोइस्टिक सरकार कधी पहिले नाही असा हल्लाबोल केला आहे. 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपाPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार