शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

राज्यपालांना विमान परवानगी नाकारणं हा राज्य सरकारच्या मनाचा कद्रुपणा : चंद्रकांत पाटलांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 14:28 IST

राज्य सरकारकडून सुडाचे, द्वेषाचे राजकारण सुरु आहे. मात्र, सामान्य जनता ही गोष्ट पाहत आहे.

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नियोजित दौऱ्यानुसार आज उत्तराखंडसाठी रवाना होणार होते. पण सरकारी विमानात बसल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप त्यांच्या विमान प्रवासाला परवानगी देण्यात आलेली नसल्याचं कळालं. त्यामुळे त्यांना विमानातून खाली उतरावं लागलं आणि पुन्हा राजभवनात परतावं लागल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर विरोधी पक्षांकडून राज्य सरकारच्या या निर्णयाविरुद्ध टीकेची झोड उठविण्यात येत आहे. आता याच धर्तीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांना हवाई प्रवासाला परवानगी नाकारत विमानातून खाली उतरविणे हा राज्य सरकारच्या मनाचा कद्रूपणा आहे अशा शब्दात ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

पुण्यात चंद्रकांत पाटील एका बैठकीला उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, आधी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली. आता राज्यपालांना विभागले जात आहेत. हे छोट्या मनाचे लक्षण आहे. साधारण राज्यपालांच्या कुठल्याही प्रवासाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठ्वावी लागते. तसेच ही फाईल मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ मार्गी लावली जाते. पण राज्यपालांची ही फाईल क्लिअर केली गेली नाही. त्यामुळे त्यांना शासकीय विमातून उतरावे लागले. आणि व्यावसायिक विमानाने हा प्रवास करावा लागला. हे सर्व सुडाचे द्वेषाचे राजकारण सुरु आहे. सामान्य जनता ही गोष्ट पाहत आहे.

सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचे ट्विट देश अहिताचे आहे का? सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर यांनी केलेले ट्विट हे देश हिताचे होते की अहिताचे ? त्यांनी अन्य देशातल्या लोकांनी आमच्या देशांगांतर्गत प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज नाही यासंबंधी हे ट्विट केले. ते चुकीचे आहे का? त्याची चौकशी करणार आहे का? मुळात ते देश हिताचे बोलले पण त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही असा सवाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. 

मुख्यमंत्र्यांनी एवढा एवढा अहंकार बाळगणे योग्य नाही : देवेंद्र फडणवीस

राज्यातील ठाकरे सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आहे. मात्र याच मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्याच दरम्यान माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना संताप व्यक्त केला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात एवढे अहंकारी इगोइस्टिक सरकार कधी पहिले नाही असा हल्लाबोल केला आहे. 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपाPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार