शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पाण्यासाठी पालिकेला पुन्हा इशारा, धरणातील साठा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 02:48 IST

धरणातील साठा कमी : कपात केली नाही तर शेतीचे उन्हाळी आवर्तन रद्द

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे शहराच्या पाणी कोट्याबाबत जलसंपदाचा निर्णय कायम ठेवल्यानंतर जलसंपदाने महापालिकेला पाण्याबाबत पुन्हा इशारा दिला आहे. महापालिकेने पाणी वापर कमी केला नाही, तर दौंड, इंदापूरला शेतीसाठी द्यायचे उन्हाळी आवर्तन देणे शक्य होणार नाही, असे महापालिकेला बजावण्यात आले असल्याचे समजते. पाणी कमी करण्याची ही पूर्वतयारीच असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महापालिका पाणीपुरवठा अधिकाºयांसमवेत जलसंपदाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी मंगळवारी ही बैठक घेतली. त्यात महापालिकेला शहरातील पाणी वितरणातील गळती थांबवण्याची तंबी देण्यात आली. धरणसाखळीत मागील वर्षापेक्षा सव्वापाच टक्के (५.०१ टीएमसी) कमी पाणीसाठा आहे. तो दररोज कमी होत चालला आहे. शेतीसाठी, तसेच वरील दोन तालुक्यांमधील काही गावांना पिण्यासाठीही पाणी देण्याची जबाबदारी जलसंपदाची आहे. महापालिका असेच दररोज १३५० दशलक्ष लिटर पाणी उचलत राहिल्यास या गावांना उन्हाळ्यात पाणी देणे शक्य होणार नाही, असे महापालिकेला सांगण्यात आले असल्याची माहिती मिळाली.

महापालिकेसाठी लोकसंख्येच्या आधारावर ८.१९ टीएमसी वार्षिक कोटा हा जलसंपदाचा निर्णय कायम ठेवतानाच प्राधिकरणाने महापालिकेला ३१ पानांचा एक आदेशही बजावला आहे. त्यात वॉटर आॅडिट करून घेण्याबरोबरच पाण्याच्या काटकसरीचे अनेक उपाय सांगण्यात आले असून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी व त्याचा सविस्तर अहवाल जलसंपदाला सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हे वॉटर आॅडिट त्वरित सुरू करण्याबाबत महापालिकेला मंगळवारी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले.जलसंपदाच्या या भूमिकेमुळे पुण्याच्या पाणीपुरवठ्यावरपरिणाम होण्याची शक्यता असल्याची चर्चा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांमध्ये आहे.१ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणीरोज घेतले जात आहे. तेच संपूर्ण शहराला पुरवताना अधिकारीत्रस्त झाले आहेत. अजूनहीशहराच्या वेगवेगळ्या भागातून पाण्याला प्रेशर नसल्याच्या, पाणी पुरेसा वेळ येत नसल्याच्या तक्रारीयेत आहेत.प्रेशर कमी झाल्यामुळे सर्वाधिक अडचण शहरांमधील सोसायट्यांची झाली असून त्यांना इमारतींवरील टाक्या भरता येणे अशक्य झालेआहे. त्यामुळे सदनिकाधारकांना वेळेवर पाणी मिळत नाही. पाण्याच्या या प्रश्नाने अद्याप जोर धरला नसला तरी पाणी आणखी कमी झाले तर मात्र पुन्हा शहरात रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.पाणी काटकसरीबाबत जागृती करावी1150दशलक्ष लिटर मंजूर कोटा असतानाही महापालिका १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी घेत असल्याचे या बैठकीत महापालिका अधिकाºयांच्या लक्षात आणून देण्यात आले.प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्यास वार्षिक ८.१९ टीएमसी याप्रमाणे दररोज फक्त ६९२ दशलक्ष लिटर पाणीच पुण्याला द्यावे लागेल, असेही बजावण्यात आले.४त्यामुळे १ हजार १५० दशलक्ष लिटरच पाणी घ्यावे, असे महापालिकेला सांगण्यात आले आहे. इतके पाणी पुरेसे होत नसेल तर त्यासाठी महापालिकेनेच शहरात पाणी काटकसरीने वापरण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी, वितरणातील गळती थांबवण्याचे कसोशीने प्रयत्न करावेत, असे बैठकीत बजावण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेDamधरण