शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

पाण्यासाठी पालिकेला पुन्हा इशारा, धरणातील साठा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 02:48 IST

धरणातील साठा कमी : कपात केली नाही तर शेतीचे उन्हाळी आवर्तन रद्द

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे शहराच्या पाणी कोट्याबाबत जलसंपदाचा निर्णय कायम ठेवल्यानंतर जलसंपदाने महापालिकेला पाण्याबाबत पुन्हा इशारा दिला आहे. महापालिकेने पाणी वापर कमी केला नाही, तर दौंड, इंदापूरला शेतीसाठी द्यायचे उन्हाळी आवर्तन देणे शक्य होणार नाही, असे महापालिकेला बजावण्यात आले असल्याचे समजते. पाणी कमी करण्याची ही पूर्वतयारीच असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महापालिका पाणीपुरवठा अधिकाºयांसमवेत जलसंपदाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी मंगळवारी ही बैठक घेतली. त्यात महापालिकेला शहरातील पाणी वितरणातील गळती थांबवण्याची तंबी देण्यात आली. धरणसाखळीत मागील वर्षापेक्षा सव्वापाच टक्के (५.०१ टीएमसी) कमी पाणीसाठा आहे. तो दररोज कमी होत चालला आहे. शेतीसाठी, तसेच वरील दोन तालुक्यांमधील काही गावांना पिण्यासाठीही पाणी देण्याची जबाबदारी जलसंपदाची आहे. महापालिका असेच दररोज १३५० दशलक्ष लिटर पाणी उचलत राहिल्यास या गावांना उन्हाळ्यात पाणी देणे शक्य होणार नाही, असे महापालिकेला सांगण्यात आले असल्याची माहिती मिळाली.

महापालिकेसाठी लोकसंख्येच्या आधारावर ८.१९ टीएमसी वार्षिक कोटा हा जलसंपदाचा निर्णय कायम ठेवतानाच प्राधिकरणाने महापालिकेला ३१ पानांचा एक आदेशही बजावला आहे. त्यात वॉटर आॅडिट करून घेण्याबरोबरच पाण्याच्या काटकसरीचे अनेक उपाय सांगण्यात आले असून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी व त्याचा सविस्तर अहवाल जलसंपदाला सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हे वॉटर आॅडिट त्वरित सुरू करण्याबाबत महापालिकेला मंगळवारी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले.जलसंपदाच्या या भूमिकेमुळे पुण्याच्या पाणीपुरवठ्यावरपरिणाम होण्याची शक्यता असल्याची चर्चा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांमध्ये आहे.१ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणीरोज घेतले जात आहे. तेच संपूर्ण शहराला पुरवताना अधिकारीत्रस्त झाले आहेत. अजूनहीशहराच्या वेगवेगळ्या भागातून पाण्याला प्रेशर नसल्याच्या, पाणी पुरेसा वेळ येत नसल्याच्या तक्रारीयेत आहेत.प्रेशर कमी झाल्यामुळे सर्वाधिक अडचण शहरांमधील सोसायट्यांची झाली असून त्यांना इमारतींवरील टाक्या भरता येणे अशक्य झालेआहे. त्यामुळे सदनिकाधारकांना वेळेवर पाणी मिळत नाही. पाण्याच्या या प्रश्नाने अद्याप जोर धरला नसला तरी पाणी आणखी कमी झाले तर मात्र पुन्हा शहरात रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.पाणी काटकसरीबाबत जागृती करावी1150दशलक्ष लिटर मंजूर कोटा असतानाही महापालिका १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी घेत असल्याचे या बैठकीत महापालिका अधिकाºयांच्या लक्षात आणून देण्यात आले.प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्यास वार्षिक ८.१९ टीएमसी याप्रमाणे दररोज फक्त ६९२ दशलक्ष लिटर पाणीच पुण्याला द्यावे लागेल, असेही बजावण्यात आले.४त्यामुळे १ हजार १५० दशलक्ष लिटरच पाणी घ्यावे, असे महापालिकेला सांगण्यात आले आहे. इतके पाणी पुरेसे होत नसेल तर त्यासाठी महापालिकेनेच शहरात पाणी काटकसरीने वापरण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी, वितरणातील गळती थांबवण्याचे कसोशीने प्रयत्न करावेत, असे बैठकीत बजावण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेDamधरण