शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरी’ची चव ‘कर्नाटक’वर भागवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 12:52 IST

येत्या मंगळवार (दि.७)रोजी अक्षयतृतीया असून, या मुहूर्तावर नागरिकांकडून आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते..

ठळक मुद्दे‘हापूस’ सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचरत्नागिरी हापूसचे दर ५०० ते ७०० रुपये डझन, कर्नाटक तयार हापूस ३०० ते ५०० रुपये डझन

पुणे: अक्षयतृतीच्या मुहूर्तावर रविवारी (दि.५) गुलटेकडी मार्केट यार्डातील फळ विभागामध्ये पुणेकरांनी आंबा खरेदीसाठी गर्दी केली. परंतु रत्नागिरी हापूसचे दर अद्यापही सर्वसामान्य नागरिकांच्या आवक्याबाहेरच असल्याने पुणेकरांनी ‘रत्नागिरी’ ची चव ‘कर्नाटक’ वर भागवली आहे. कर्नाटक तयार हापूस ३०० ते ५०० रुपये डझनने मिळत असून, रत्नागिरी हापूसचे दर ५०० ते ७०० रुपये डझन असल्याचे रत्नागिरी हापूस आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.      येत्या मंगळवार (दि.७)रोजी अक्षयतृतीया असून, या मुहूर्तावर नागरिकांकडून आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. अक्षयतृतीयाला आंब्याची मागणी वाढत असल्याने आंब्याचे दर देखील वाढतात. परंतु यंदा सुरुवातीपासूनच रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याचे दर अधिकच आहेत. अद्यापही हे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेरच आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून मार्केट यार्डामध्ये आंब्याची आवक चांगलीच वाढली आहे. परंतु यामध्ये रत्नागिरी तयार हापूस मात्र मागणीच्या तुलनेत कमी आहे. यामुळे कच्च्या आंब्याची आवक वाढून देखील हापूसचे दर मात्र कमी झाले नसल्याचे व्यापा-यांनी सांगितले. रविवार (दि.५) रोजी रत्नागिरी हापूस कच्च्या आंब्याची सुमारे १० ते १२ हजार पेट्या आवक झाली. गेल्या तीन-चार दिवसांपासून ही आवक कायम असली तरी तयार आंबा तुलनेत कमी आहे. यामुळे होलसेल मार्केटमध्ये रत्नागिरी तयार हापूसच्या ४ ते ८ डझनचे दर १५००-३००० रुपये ऐवढे दर मिळत आहे.     दरम्यान अक्षयतृतीयाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक हापूस आंब्याच्या तब्बल १८ हजार ते २० हजार पेट्यांची आवक झाली. गेल्या तीन-चार दिवसांत ही आवक २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरामध्ये देखील २० ते २५ टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे किरकोळ बाजारामध्ये प्रतवारीनुसार कर्नाटक हापूस आंबा २५० ते ५०० रुपये डझन पर्यंत मिळत आहे. रविवारी मार्केट यार्डात कर्नाटक हापूस कच्चा ४ ते ५ डझनमागे ५०० ते १००० रुपये दर मिळाला असल्याचे कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.-------------------आंब्याचे दर रत्नागिरी हापूस (कच्चा) :  ४-८ डझन १२०० ते २८०० रुपयेरत्नागिरी हापूस (तयार) : ४-८ डझन १५०० ते ३००० रुपयेकर्नाटक हापूस (कच्चा) : ४-५ डझन ५०० ते १००० रुपयेकर्नाटक हापूस (तयार) : ४ -५ डझन  १२०० ते १५०० रुपयेपायरी : ४ डझन ४०० ते ८०० रुपयेलालबाग : २० ते ३०  रुपये किलोबदाम : ३० ते ४० रुपये किलोतोतापूरी : २० ते ३५ रुपये किलोमलिका : ३५ ते ४५ रुपये किलो---------------------------रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्रीअक्षयतृतीच्या पार्श्वभूमीवर आंब्याची मागणी वाढल्याने सध्या शहरामध्ये रस्त्या-रस्त्यावर , गल्ली-बोळांमध्ये आंब्याची विक्री सुरु आहे. परंतु या किरकोळ विक्रेत्यांकडून रत्नागिरी हापूस असल्याचे सांगून कर्नाटक हापूसची विक्री केली जात आहे. रत्नागिरी आणि कर्नाटक हापूस दिसायला सारखेच  असल्याने व्यापा-यांकडून फायदा घेतला जात आहे. परंतु दोन्ही आंब्याच्या चवीमध्ये खूपच फरक आहे.  रत्नागिरी आंबा अधिक मधुर असतो. त्यातुलनेत कर्नाटक हापूसची चव नसते.

टॅग्स :PuneपुणेMangoआंबाAkshaya Tritiyaअक्षय तृतीयाRatnagiriरत्नागिरीKarnatakकर्नाटक