शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरी’ची चव ‘कर्नाटक’वर भागवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 12:52 IST

येत्या मंगळवार (दि.७)रोजी अक्षयतृतीया असून, या मुहूर्तावर नागरिकांकडून आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते..

ठळक मुद्दे‘हापूस’ सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचरत्नागिरी हापूसचे दर ५०० ते ७०० रुपये डझन, कर्नाटक तयार हापूस ३०० ते ५०० रुपये डझन

पुणे: अक्षयतृतीच्या मुहूर्तावर रविवारी (दि.५) गुलटेकडी मार्केट यार्डातील फळ विभागामध्ये पुणेकरांनी आंबा खरेदीसाठी गर्दी केली. परंतु रत्नागिरी हापूसचे दर अद्यापही सर्वसामान्य नागरिकांच्या आवक्याबाहेरच असल्याने पुणेकरांनी ‘रत्नागिरी’ ची चव ‘कर्नाटक’ वर भागवली आहे. कर्नाटक तयार हापूस ३०० ते ५०० रुपये डझनने मिळत असून, रत्नागिरी हापूसचे दर ५०० ते ७०० रुपये डझन असल्याचे रत्नागिरी हापूस आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.      येत्या मंगळवार (दि.७)रोजी अक्षयतृतीया असून, या मुहूर्तावर नागरिकांकडून आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. अक्षयतृतीयाला आंब्याची मागणी वाढत असल्याने आंब्याचे दर देखील वाढतात. परंतु यंदा सुरुवातीपासूनच रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याचे दर अधिकच आहेत. अद्यापही हे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेरच आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून मार्केट यार्डामध्ये आंब्याची आवक चांगलीच वाढली आहे. परंतु यामध्ये रत्नागिरी तयार हापूस मात्र मागणीच्या तुलनेत कमी आहे. यामुळे कच्च्या आंब्याची आवक वाढून देखील हापूसचे दर मात्र कमी झाले नसल्याचे व्यापा-यांनी सांगितले. रविवार (दि.५) रोजी रत्नागिरी हापूस कच्च्या आंब्याची सुमारे १० ते १२ हजार पेट्या आवक झाली. गेल्या तीन-चार दिवसांपासून ही आवक कायम असली तरी तयार आंबा तुलनेत कमी आहे. यामुळे होलसेल मार्केटमध्ये रत्नागिरी तयार हापूसच्या ४ ते ८ डझनचे दर १५००-३००० रुपये ऐवढे दर मिळत आहे.     दरम्यान अक्षयतृतीयाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक हापूस आंब्याच्या तब्बल १८ हजार ते २० हजार पेट्यांची आवक झाली. गेल्या तीन-चार दिवसांत ही आवक २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरामध्ये देखील २० ते २५ टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे किरकोळ बाजारामध्ये प्रतवारीनुसार कर्नाटक हापूस आंबा २५० ते ५०० रुपये डझन पर्यंत मिळत आहे. रविवारी मार्केट यार्डात कर्नाटक हापूस कच्चा ४ ते ५ डझनमागे ५०० ते १००० रुपये दर मिळाला असल्याचे कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.-------------------आंब्याचे दर रत्नागिरी हापूस (कच्चा) :  ४-८ डझन १२०० ते २८०० रुपयेरत्नागिरी हापूस (तयार) : ४-८ डझन १५०० ते ३००० रुपयेकर्नाटक हापूस (कच्चा) : ४-५ डझन ५०० ते १००० रुपयेकर्नाटक हापूस (तयार) : ४ -५ डझन  १२०० ते १५०० रुपयेपायरी : ४ डझन ४०० ते ८०० रुपयेलालबाग : २० ते ३०  रुपये किलोबदाम : ३० ते ४० रुपये किलोतोतापूरी : २० ते ३५ रुपये किलोमलिका : ३५ ते ४५ रुपये किलो---------------------------रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्रीअक्षयतृतीच्या पार्श्वभूमीवर आंब्याची मागणी वाढल्याने सध्या शहरामध्ये रस्त्या-रस्त्यावर , गल्ली-बोळांमध्ये आंब्याची विक्री सुरु आहे. परंतु या किरकोळ विक्रेत्यांकडून रत्नागिरी हापूस असल्याचे सांगून कर्नाटक हापूसची विक्री केली जात आहे. रत्नागिरी आणि कर्नाटक हापूस दिसायला सारखेच  असल्याने व्यापा-यांकडून फायदा घेतला जात आहे. परंतु दोन्ही आंब्याच्या चवीमध्ये खूपच फरक आहे.  रत्नागिरी आंबा अधिक मधुर असतो. त्यातुलनेत कर्नाटक हापूसची चव नसते.

टॅग्स :PuneपुणेMangoआंबाAkshaya Tritiyaअक्षय तृतीयाRatnagiriरत्नागिरीKarnatakकर्नाटक