शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Pune| घरगुती सामान मुंबईला पोहचविण्यासाठी घेऊन गेले अन् मागितली खंडणी; सनलाईफ पॅकर्सवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:18 IST

याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...

पुणे : पुण्यातून मुंबईच्या घरी पोहचविण्यासाठी घरगुती सामान टेम्पोतून घेऊन जाऊन ते घरी पोहचविले नाही. टेम्पोचे लोकेशन हवे असेल तर ५ हजार रुपयांची अधिकची मागणी करुन पैसे दिले नाही तर सामानाचे नुकसान करुन अशी धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी सनलाईफ पॅकर्स अँड मुव्हर्स व धारेश्वर पॅकर्स अँड मुव्हर्सचे मालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अभिनव अविनाश वर्मा (वय ३०, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक रामदास शेलार, विजय पाटील, अश्विन रघुनाथ रायकर (वय २७, रा. धायरीगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अश्विन रायकर याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनव वर्मा यांनी त्यांचे घरगुती सामान मुंबईतील घरी हलविण्यासाठी सनलाईफ पॅकर्स अँड मुव्हर्स, धारेश्वर कार्गो पॅकर्स अँड मुव्हर्स यांना दिले दिले. त्यांनी २९ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता केशवनगर येथील घरातून ९ लाख १० हजार रुपयांचे घरगुती साहित्य व दुचाकी टेम्पोत भरून घेऊन गेले़ दुसर्या दिवशी त्यांच्या मुंबईतील घरी साहित्य पोहचले नाही. तेव्हा त्यांनी चौकशी करुन टेम्पो कोठे आहे, याची विचारणा केली. तेव्हा टेम्पोचे लोकेशन पाहिजे असल्यास आणखी ५ हजार रुपये द्यावे लागेल. पैसे दिले नाही तर सामानाचे नुकसान करु व तुमचे सामान विसरुन जा, अशी धमकी दिली.

त्यानंतर वर्मा यांनी मुंढवा पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अश्विनी भोसले यांनी सांगितले की, त्यांनी मुंबईला सामान न पोेहचवता तो वाटेतच रस्ता कडेला लावून अधिक पैसे मागत होते. अश्विन रायकर याला पकडल्यानंतर टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई