शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

शिवसेनेच्या फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार, 'शिंदेसेना' हीच खरी शिवसेना: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 10:15 IST

आठवले पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी केली नसती तर शिवसेना पक्ष फुटला नसता...

लोणावळा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चुकीमुळेच शिवसेना फुटली असा घणाघाती आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिंदे सेना हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले. आठवले म्हणाले, शिवसेना मोडकळीस आली आहे, तिची अवस्था दयनीय झाली आहे, काँग्रेस पक्ष दुबळा झाला आहे तर राष्ट्रवादी पक्षाची मुंबईत ताकद कमी असल्याने मुंबई महानगरपालिकेवर यावेळी भाजप, आरपीआय व शिंदे गट सत्ता स्थापन करणार यात शंका नाही.

मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेची सत्ता हिसकावून घेण्याचा आमचा प्रयत्न असून उपमहापौर आरपीआयला मिळावे, असा ठराव रविवारी लोणावळ्यात पार पडलेल्या आरपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आठवले पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी केली नसती तर शिवसेना पक्ष फुटला नसता. शिवसेना व शिंदे गटातील वादावर बोलताना आठवले म्हणाले, शिंदे गटाकडे दोन तृतियांश बहुमत आहे. सर्वाधिक आमदार व खासदार त्यांच्यासोबत असल्याने धनुष्यबाण हे चिन्ह देखील त्यांनाच मिळावे, १६ आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा देखील चुकीचा आहे. खंडपीठ याबाबत योग्य निर्णय देईल याची खात्री आहे, असे त्यांनी सांगितले. त्यासोबतच दसरा मेळाव्यासाठी ताकदवार शिवसेना कोणाची हे पाहून परवानगी द्यावी, असा सल्ला मुंबई महापालिकेला दिला.

आठवले म्हणाले, राज्यात फडणवीस व शिंदे सरकार चांगले काम करत आहे. ओला दुष्काळ त्यांनी जाहिर केला असून केंद्राच्या धर्तीवर मुख्यमंत्री किसान योजना जाहिर करत शेतकर्यांना दिलासा देण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, पश्चिम महाराष्ट्र नुतन अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, अशोक गायकवाड, जितेंद्र बनसोडे, गणेश गायकवाड, यमुनाताई साळवे, लक्ष्मण भालेराव, कमलशिल म्हस्के, दिलीप दामोदरे उपस्थित होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRamdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाlonavalaलोणावळा