शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

मला देश ओळखतो, प्रकाश आंबेडकरांनी ओळखण्याची गरज नाही, रामदास आठवलेंचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 5:17 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर, ज्यांना मी ऐक्यासाठी बोलावूनही ते आले नाहीत ते प्रकाश आंबेडकर, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.

पुणे - 'प्रकाश आंबेडकर यांनी कोण रामदास आठवले म्हटले तरी मी कोण प्रकाश आंबेडकर', असे विचारणार नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर, ज्यांना मी ऐक्यासाठी बोलावूनही ते आले नाहीत ते प्रकाश आंबेडकर, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाचे) राज्यव्यापी अधिवेशन उद्या पुण्यात होत आहे.त्याआधी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नुकताच कोपरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी कोण रामदास आठवले, अशा शब्दांत त्यांना झिडकारले होते. त्यांच्या या प्रश्नाला आठवले यांनी खास शैलीत उत्तर दिले. मला सारा महाराष्ट्र आणि देश ओळखतो,त्यांनी मला ओळखण्याची गरज नाही असे त्यांनी आंबेडकर यांना ठणकावले.

आगामी निवडणूक काळात शिवसेना आणि भाजपाने युती केली दोन्ही पक्षांचा फायदा होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. पालघर आणि भंडारा - गोंदिया येथे भाजप आणि शिवसेनेची भाषा ही निवडणुकीची आहे. मात्र शिवसेनेने युती केली नाही तर त्यांचे काही नेते फुटू शकतात असे भाकितही त्यांनी वर्तवले. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करायचे तर युती करायलाच हवी असेही ते म्हणाले.

या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरे यांना भेटण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शापाठविधीला एकत्र आलेल्या मोदी विरोधकांवर त्यांनी भाष्य केले.जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढे मोदींना विजय मिळवण्यास सोपे जाईल असेही ते म्हणाले.  भाजपाच्या नव्या धोरणाला अनुसरून त्यांनी नियत साफ, विकास साफ आणि 2019साली कॉँग्रेसही देशातून साफ होईल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर