शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

महिनाभरातच राम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 5:09 PM

महिन्याभरात राम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

बारामती : केंद्रामध्ये मजबूत सराकार आल्यामुळे भाजपच्या बौद्धीक अजेंड्यावरील एकापाठोपाठ एक विषय मागी लावले जात आहेत. महिनाभरात राम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष व महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

बारामती येथे भाजप संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, केंद्रात मजबूत सरकार आल्यामुळे भाजपने आपल्या अजेंड्यावरील अनेक विषय मार्गी लावले आहेत. ७० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या काश्मिर प्रश्नाबाबत पंतप्रधान मोदींनी धडाडीने निर्णय घेतले. काश्मिरमधील कलम ३७० व ३५ ए रद्द करून दाखवले. तसेच तीन तलाक कायदा करून मुस्लिम महिलांच्या पायातील बेडी सोडविली. राज्यामध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करीत आहेत. त्यामुळे पुन्हा राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. हे पवारांना देखील सांगा. त्यांना अजुनही वाटत आहे राज्यात त्यांचे सरकार येईल, असा टोला पाटील यांनी लगवला.

यावेळी जनसंपर्क कार्यालयाचा उपयोग लोकांच्या अडअडचणी सोडवण्यासाठी करा. कोणत्याही कामासाठी एक रूपयाही घेऊ नका, असा सल्लाही भाजप कार्यकर्त्यांना पाटील यांनी दिली.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBaramatiबारामतीRam Mandirराम मंदिर