शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित साेबत येण्याच्या ऑफरबाबत राजू शेट्टी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 16:52 IST

पुण्यात स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुण्यातील पत्रकार संघात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या काैतुक साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यानंतर शेट्टी यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर उत्तरे दिली.

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राजू शेट्टी यांनी विधानसभेला वंचित साेबत यावे असे म्हंटले हाेते, यावर बाेलताना भाजपाला टक्कर देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत शेट्टी यांनी व्यक्त केले. 

पुण्यात स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुण्यातील पत्रकार संघात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या काैतुक साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. प्रकाश आंबेडकर यांंनी राजू शेट्टी यांना वंचित साेबत येण्याची दिलेल्या ऑफर बाबत बाेलताना शेट्टी यांनी वंचित साेबत जाणार का याबाबत स्पष्ट बाेलण्याचे टाळत सत्तासंपत्ती याला टक्कर देण्यासाठी, प्रस्थापित व्यवस्थेला टक्कर देणाऱ्यांनी एकत्र यावे अशी आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले . तसेच विधानसभेला काेणासाेबत जायचं याबाबत स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शेट्टी म्हणाले, एनडीएच्या विराेधातली स्वाभिमानी शेतकरी संघटनेती भूमिका आहे. आत्ताची आघाडी ही लाेकसभेची हाेती. विधानसभेचं काय करायचं याबाबत राज्य कार्यकारणीची बैठक घेऊन ठरवण्यात येईल. परंतु आमची केंद्र आणि राज्य सरकारला विराेध करण्याची भूमिका कायम राहणार. ही दाेन्ही सरकारे शेतकऱ्याला न्याय देण्यात अपयशी ठरल्या आहेत. लाेकसभेच्या निवडणुकीमध्ये 70 हजार रुपये खर्च केले गेले. देशावर सर्वाधिक कर्ज भारतीय जनता पक्षाने केले आहे. सत्तासंपत्ती याला टक्कर देण्यासाठी, प्रस्थापित व्यवस्थेला टक्कर देणाऱ्यांनी एकत्र यावे अशी भूमिका आमची कालही हाेती आणि आजही आहे. जर खराेखरच त्यांना टक्कर द्यायची असेल तर सर्वांनी एकत्र यायची गरज आहे.  

ईव्हीएम बाबत शेट्टी म्हणाले, जगभरातील सर्वच विकसीत राष्ट्रांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका हाेतात. ईव्हीएमवरुन बॅलेटवर आलेले अनेक राष्ट्र आहेत. त्यामुळे जगातील सर्वात माेठी लाेकशाही असलेल्या आपल्या देशात बॅलेटवर मतदान घेण्यास हरकत काय अशी माझी भूमिका आहे. निवडणुक आयाेग लाेकांच्या शंका दूर करण्यात अयशस्वी ठरले आहे. जवळजवळ 250 पेक्षा जास्त मतदारसंघामध्ये झालेले मतदान आणि माेजलेले मतदान यात फरक आहे. ताे फरक कसा आला याबाबत निवडणुक आयाेग स्पष्टीकरण देत नाही. अनेक राजकीय पक्षांनी जामर बसविण्याची मागणी केली हाेती, ती फेटाळण्यात आली. एका विशिष्ट ठिकाणावरुनच इव्हीएम का आणले  जातात अशी अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय निवडणुक आयाेगाला निवडणुका या पारदर्शक वातावरणात घेतल्या आहेत, असा दावा करता येणार नाही. 

दुष्काळ निवारणाच्या अगदी तकलादू उपाययाेजना सरकार करत आहे. त्यातून शेतकऱ्याला न्याय नाही. पाण्याची वणवण आहे. राेजगार हमी याेजनेची कामं सुरु नाहीत. राज्यकर्त्यांना याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही.   हवामान विभागाचे कान उपाटण्याची गरज आहे. दरराेज वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. पाऊस येणार की नाही आला तर जाणार का याबाबत निटसं सांगितलं जात नाही. बियाणे आणि औषध कंपन्यांच्या फायद्यासाठीच हवामानाचे अंदाज व्यक्त केले जातात का असा प्रश्न निर्माण हाेताे. असेही शेट्टी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPuneपुणे