शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

राजमाता भुयारी मार्गाचा श्वास गुदमरला; आरएमसी ट्रक अडकल्याने प्रचंड वाहतूककोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 16:22 IST

ट्रक अडकल्याने तासभर वाहनांना ताटकळत राहावे लागले

कात्रज : कात्रज येथील राजमाता भुयारी मार्गात रविवारी दुपारच्या वेळेस RMC ट्रक अडकल्याने प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. ट्रक अडकल्याने तासभर वाहनांना ताटकळत राहावे लागले. अथक प्रयत्ना नंतर हा ट्रक बाहेर काढण्यात आला. याठिकाणी अवजड वाहनांना बंदी असताना अशी मोठी वाहने खुलेआम वाहतूक करतात कशी असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

दक्षिण पुण्यातील अनेक भागांना जोडणारा राजमाता भुयारी मार्ग सध्या वाहतूक कोंडी, सतत साचणारे पाणी यामुळे चर्चीला जात आहे. आंबेगाव बु,भारती विद्यापीठ, जांभुळवाडी, दत्तनगर या भागातील रहिवासी राजमाता भुयारी मार्गाचा वापर करत असतात. राजमाता भुयारी मार्गापासून पुढे निलायम थिएटर पर्यंत पर्यायी रस्ता असल्याने नागरिक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परंतु दररोज सकाळी व संध्याकाळी नागरिकांना या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने नागरिक प्रचंड संतप्त आहेत. त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा फटका भारती विद्यापीठ हॉस्पिटल मध्ये येणारे पेशन्ट त्यांचे नातेवाईक तसेच भारती विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थी यांना देखील होत आहे.

''गेल्या पाच वर्षापासून राजमाता भुयारी मार्गासंदर्भात पाठपुरावा करत आहे. हा मार्ग रुंद होणे तसेच याची उंची वाढवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री अडकल्याने जर चांदणी चौकाचे गांभीर्य लक्षात येत असेल तर हजारो नागरिक रोज वाहतूक कोंडीत अडकतात त्याचे काय? लवकरात लवकर याचा विकास करून नवीन भुयारी मार्ग करून वाहतूक व्यवस्था उपलब्ध करावी. - युवराज बेलदरे माजी नगरसेवक.'' 

टॅग्स :katrajकात्रजTrafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षाSocialसामाजिक