शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

शिव-मनसे युती;थोडा आनंद,थोडे दु:ख अन् बराचसा संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 13:16 IST

पुण्यात काही जणांचा कानोसा घेतला असता हे एकत्रीकरण मुंबई महापालिकेसाठी उपयुक्त ठरू शकणारे असले तरी अन्य शहरांमध्ये मात्र महापालिका निवडणुकीसाठी वेगवेगळा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

- राजू इनामदारपुणे - मोर्चा होणार असल्याने सरकारने हिंदी भाषेची सक्ती रद्द केली. त्यामुळे मोर्चा रद्द झाला, पण मुंबईत विजयी मेळावा घेत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र आले. त्याविषयी येथील शिवसैनिक व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडा आनंद, थोडे दु:ख व बराचसा संभ्रम अशा संमिश्र भावना आहेत.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने या विजय मेळाव्याला हजेरी लावली तरी दुसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र या एकत्रीकरणाविषयी साशंकता आहे. या सर्वच भावनांना महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. पुण्यात काही जणांचा कानोसा घेतला असता हे एकत्रीकरण मुंबई महापालिकेसाठी उपयुक्त ठरू शकणारे असले तरी अन्य शहरांमध्ये मात्र महापालिका निवडणुकीसाठी वेगवेगळा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

शिव-मन सैनिकांमध्ये आनंदाची भावना अशासाठी आहे ही दुरावलेले बंधू एकत्र आले. तब्बल २० वर्षे ते एकमेकांपासून लांबच नव्हे तर टीकेच्या व्यासपीठावर होते. दोन्ही भावांच्या मागे असणारी मराठी मतांची शक्तीही त्यामुळे विभागली गेली. त्यात शिवसेनेचेही नुकसान झाले व मनसेचा तर काहीच फायदा झाला नाही. आता एकत्र आल्यामुळे मराठी माणूस पुन्हा त्यांच्या मागे उभा राहील, असे दोन्हीकडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाटते.

दु:ख अशासाठी की स्वतंत्रपणे काही करून दाखवण्याची धमक दोन्हीकडे संपणार आहे. जे काही करायचे ते एकमेकांमध्ये वाटूनच करावे लागणार आहे. त्यामध्ये कोणाला काही जास्त तर कोणाला काही कमीही सहन करावे लागणार आहे. प्रामुख्याने महापालिकेच्या जागा वाटपात कोणावर तरी कोणाचे तरी वर्चस्व येणारच आहे. पुन्हा ही भांडणे गुलदस्त्यात ठेवावी लागतील. त्याविषयी जाहीरपणे काहीच बोलता व करताही येणार नाही. कारण तसे झाले तर टीकेची वार होण्याची दाट शक्यता आहे.

संभ्रम अशासाठी की शुक्रवारी झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आम्ही यापुढे एकत्रच अशी घोषणा केली असली, तरी राज ठाकरे स्पष्टपणे त्याविषयी काहीच बोललेले नाही. मराठी भाषा, मराठी प्रेम याच मुद्यावर त्यांचा भर होता, तर उद्धव यांनी शिवसेनेत फूट पाडणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता थेट टीका केली व आता आम्ही गद्दारांना पळवून लावू, अशा भाषेत राजकीय प्रहार केले. निवडणूक एकत्र लढणार, असे स्पष्टपणे तेही बोलले नाहीत, मात्र त्यांचा सूर तोच होता. त्याला राज यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही असे दोन्ही पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचे मत आहे.

शिवसेना सध्या महाविकास आघाडीत आहे. याच आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) असे दोन पक्ष आहेत. यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने मेळाव्याला थेट हजेरी लावत आमची या एकत्रीकरणाला काहीच हरकत नाही, असे स्पष्ट केले आहे. मात्र, काँग्रेस पक्ष या मेळाव्यापासून दूरच राहिला आहे. मनसेचे आघाडीत येणे त्यांना मानवणार आहे की नाही याविषयी पक्षाने काहीच भाष्य केलेले नाही. त्यामुळेच काँग्रेस काय निर्णय घेईल याविषयी साशंकता आहे. 

शनिवारचा मेळावा हा मराठी माणसांचा उत्सव होता. राज ठाकरे यांनी आवाज उठवला, त्याला उद्धव ठाकरे यांची साथ मिळाली व सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. राजकीय गोष्टी अजून अस्पष्ट आहेत, भविष्यात त्यामध्ये स्पष्टता येईल.- बाबू वागसकर, संपर्क नेते, मनसे , - हेमंत संभुस, राज्य सरचिटणीस, मनसे 

काँग्रेसची राजकीय भूमिका आमचे नेते एकत्रित बसून चर्चा करून ठरवतील. मनसेला बरोबर घेणे किंवा न घेणे हा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय आहे. महाविकास आघाडीत त्यामुळे बेबनाव होण्याचे काही कारण नाही.  - मोहन जोशी-प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस शिवसेना काय किंवा मनसे काय.. मराठी भाषेसाठी सुरुवातीपासून आवाज उठवत आली आहे. हा आवाज एकत्रित निघाला व त्यामुळे सरकारला हिंदी भाषा सक्ती मागे घ्यावी लागली. आता राजकीय निर्णय काय घ्यायचा हे नेते ठरवतील, व आम्हाला तो मान्य असेल.- संजय मोरे, शहरप्रमुख शिवसेना 

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे