शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Raj Thackeray: ...अन्यथा महाराष्ट्र तहानलेलाच राहिल, मनसेच्या 'या' नेत्यानं उचलला पाणीप्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 12:55 IST

देशात महागाईने जनता त्रस्त झाली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबरोबर एलपीजी गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

मुंबई - राज्यात आणि देशात सध्या भोंग्याचे राजकारण सुरू आहे. मनसेने सुरू केलेल्या या आंदोलनावर विविध पक्ष त्यांच्या सोईने प्रतिक्रिया देत आहेत. पण, याच भोंग्याच्या राजकारणात दुसऱ्या बाजूला सामान्यांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. तर, सर्वसामान्यांचे महत्त्वाचे प्रश्नही अडगळीत पडले आहेत. राज्यातील या भोंग्याच्या राजकारणामुळे अनेकांचं त्याकडे लक्ष गेले नाही. विशेष म्हणजे मनसेच्या नेत्यानेही या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. पुण्यातील मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी ट्विट करुन गंभीर प्रश्नावरुन महाराष्ट्राची गरज व्यक्त केली आहे. 

देशात महागाईने जनता त्रस्त झाली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबरोबर एलपीजी गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात एलपीजी गॅसच्या किमतीत 102.50 रुपयांनी वाढ झाली आहे. एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्यांच्या खिशावर प्रत्यक्ष परिणाम पडणार आहे. कोरोनाच्या लाटेनंतर सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडलेले असताना या वाढत्या महागाई तोंड देताना सामान्यांची परवड होत आहे. तर, दुसरीकडे मे महिन्याचा उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. मराठवाडा, विदर्भात भोंग्यापेक्षा पाण्याचा प्रश्न लोकांना महत्त्वाचा वाटतो. 

मनसेचे नेते अनिल शिदोरे नेहमीच सामाजिक विषय घेऊन सोशल मीडियावर सक्रीय असतात. सध्या मनसेकडून राज्यात भोंगावाद, भोंगानाद सुरू असताना त्यांनी पाण्याच्या गंभीर समस्येकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. पाणी समस्येवर महाराष्ट्राने ठोस निर्णय घ्यायला हवा, अन्यथा महाराष्ट्र तहानलेलाच राहिल, असेही त्यांनी म्हटलंय.  ''अगदी उत्तम पाऊस झालेल्या वर्षातही मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात पाणीटंचाई जाणवणं ही काही चांगली गोष्ट नाही.. कल्पना करा, एखाद्या वर्षी पाऊसपाणी अगदी कमी झालं तर काय होईल?. महाराष्ट्रात पाणीवाटप नीट केलं नाही केलं तर भरपूर पाऊस पडूनही टंचाई रहाणार. उदाहरणार्थ, उस… लागवड ४ टक्क्यांहून कमी पण सिंचनासाठी असलेलं ७० टक्के पाणी त्यावर खर्च होतं. महाराष्ट्रानं ह्यावर ठोस निर्णय घेतला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र तहानलेला तो तहानलेलाच राहील.'', असे मत मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी व्यक्त केले आहे. 

दरम्यान, भोंग्यापेक्षा वाढती महागाई, पाणीसमस्या, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी हे महाराष्ट्रासमोर गंभीर प्रश्न आहेत. मात्र, सध्या राज्यासह देशात धार्मिक बाबींवर राजकारण केलं जात असून सर्वसामान्यांना ते आवडताना दिसत नाही. त्यामुळेच, सोशल मीडियातून युवा वर्ग मोठ्या प्रमाणात यावर व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPuneपुणेMNSमनसेMosqueमशिद