शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

"राज ठाकरे दुटप्पी वागत आहेत..." 'त्या’ आरोपाबाबत अजित पवारांचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 14:54 IST

...चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर वरिष्ठांनी ‘अ‍ॅक्शन’ घ्यावी...

बारामती (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीय राजकारण सुरु झाल्याचा राज ठाकरे यांचा आरोप बिनबुडाचा आहे. त्याला काही अर्थ नाही. ‘पवारसाहेबां’चे नाव घेतलं की ती बातमी होते. राज ठाकरे  ज्यावेळी ‘साहेबां’ची मुलाखत घेताना त्यांच्याबद्दल काय बोलत होते, ते सर्वांना माहिती आहे. तरीही ते दुटप्पी वागत आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले, पवार साहेबांना उभा महाराष्ट्र ५५ वर्षे ओळखतो. त्यांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार हाच डोळ्यासमोर ठेऊन सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम केले. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब असल्याचे अजित पवार म्हणाले.

कर्नाटक सरकारने जत तालुक्याला पाणी उपलब्ध करुन दिल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, आपण अनेकदा कर्नाटकमध्ये दूधगंगेच पाणी सोडलेलं आहे. आम्ही सरकारमध्ये असताना आपण एकमेकाला तशा प्रकारची मदत करत असतो. कधीकधी आपण सोलापूरला उजनीतून प्यायला पाणी सोडतो. एका बाजूला महाराष्ट्रीयन दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे. उजनीचं पाणी कर्नाटकवाले तिकडच्या बाजूने नदीची साईड येते, तिकडं उचलत असतात. आपल्या बाजूचे आपल्या बाजूने उचलत असतात त्याच्यात एवढं लगेचच काही त्याला वेगळं स्वरूप देण्याचा काही कारण नसल्याचे पवार म्हणाले.

समान नागरी कायद्याबाबत पवार म्हणाले, आत्ता केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. त्यांनी काही राज्यांमध्ये तशा प्रकारचा सुतोवाच केलेला आहे. स्वत: राजनाथ सिंग याबाबत बोलले. सुतवाच करणे वेगळं आणि अंमलबजावणी करणे वेगळं. कदाचित त्यांचा असा प्रयत्न असेल, अशा प्रकारचा आपण ‘स्टेटमेंट’ केल्यानंतर समाजातुन काय प्रतिक्रिया येते. बऱ्याचदा राज्यकर्ते एखादा निर्णय घ्यायचा असल्यास त्यावेळी एखाद्या स्टेटमेंट असं करतात,असे पवार म्हणाले.

महिलेला  मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे, या प्रश्नावर पवार म्हणाले, कुणाला काय वाटावं, तो त्यांचा त्याचा अधिकार आहे. उद्धवजींच्या मनामध्ये तसा आला असेल म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलेलं असेल. १४५ चा  बहुमत आकडा जो मिळवु शकतो तो मुख्यमंत्री होऊ शकतो,असे पवार म्हणाले.

...चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर वरिष्ठांनी ‘अ‍ॅक्शन’ घ्यावी- राज्यापालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानाचा सगळ्यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केलेला आहे. त्याबद्दल राज्यकर्ते लक्ष देताना दिसत नाही. तेवढ्यापुरते काहीतरी उत्तर देत वेळ मारून नेतात. वास्तविक या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची भावना अतिशय तीव्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहे. जनतेच्या दैवता बद्दल असं कोणी उठसूट वक्तव्य करणं, हे महाराष्ट्रातील जनता कदापि खपवून घेणार नाही. महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर संबंधित वरीष्ठांनी ‘अ‍ॅक्शन’घ्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRaj Thackerayराज ठाकरेAjit Pawarअजित पवार