शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

"राज ठाकरे दुटप्पी वागत आहेत..." 'त्या’ आरोपाबाबत अजित पवारांचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 14:54 IST

...चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर वरिष्ठांनी ‘अ‍ॅक्शन’ घ्यावी...

बारामती (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीय राजकारण सुरु झाल्याचा राज ठाकरे यांचा आरोप बिनबुडाचा आहे. त्याला काही अर्थ नाही. ‘पवारसाहेबां’चे नाव घेतलं की ती बातमी होते. राज ठाकरे  ज्यावेळी ‘साहेबां’ची मुलाखत घेताना त्यांच्याबद्दल काय बोलत होते, ते सर्वांना माहिती आहे. तरीही ते दुटप्पी वागत आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले, पवार साहेबांना उभा महाराष्ट्र ५५ वर्षे ओळखतो. त्यांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार हाच डोळ्यासमोर ठेऊन सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम केले. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब असल्याचे अजित पवार म्हणाले.

कर्नाटक सरकारने जत तालुक्याला पाणी उपलब्ध करुन दिल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, आपण अनेकदा कर्नाटकमध्ये दूधगंगेच पाणी सोडलेलं आहे. आम्ही सरकारमध्ये असताना आपण एकमेकाला तशा प्रकारची मदत करत असतो. कधीकधी आपण सोलापूरला उजनीतून प्यायला पाणी सोडतो. एका बाजूला महाराष्ट्रीयन दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे. उजनीचं पाणी कर्नाटकवाले तिकडच्या बाजूने नदीची साईड येते, तिकडं उचलत असतात. आपल्या बाजूचे आपल्या बाजूने उचलत असतात त्याच्यात एवढं लगेचच काही त्याला वेगळं स्वरूप देण्याचा काही कारण नसल्याचे पवार म्हणाले.

समान नागरी कायद्याबाबत पवार म्हणाले, आत्ता केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. त्यांनी काही राज्यांमध्ये तशा प्रकारचा सुतोवाच केलेला आहे. स्वत: राजनाथ सिंग याबाबत बोलले. सुतवाच करणे वेगळं आणि अंमलबजावणी करणे वेगळं. कदाचित त्यांचा असा प्रयत्न असेल, अशा प्रकारचा आपण ‘स्टेटमेंट’ केल्यानंतर समाजातुन काय प्रतिक्रिया येते. बऱ्याचदा राज्यकर्ते एखादा निर्णय घ्यायचा असल्यास त्यावेळी एखाद्या स्टेटमेंट असं करतात,असे पवार म्हणाले.

महिलेला  मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे, या प्रश्नावर पवार म्हणाले, कुणाला काय वाटावं, तो त्यांचा त्याचा अधिकार आहे. उद्धवजींच्या मनामध्ये तसा आला असेल म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलेलं असेल. १४५ चा  बहुमत आकडा जो मिळवु शकतो तो मुख्यमंत्री होऊ शकतो,असे पवार म्हणाले.

...चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर वरिष्ठांनी ‘अ‍ॅक्शन’ घ्यावी- राज्यापालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानाचा सगळ्यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केलेला आहे. त्याबद्दल राज्यकर्ते लक्ष देताना दिसत नाही. तेवढ्यापुरते काहीतरी उत्तर देत वेळ मारून नेतात. वास्तविक या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची भावना अतिशय तीव्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहे. जनतेच्या दैवता बद्दल असं कोणी उठसूट वक्तव्य करणं, हे महाराष्ट्रातील जनता कदापि खपवून घेणार नाही. महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर संबंधित वरीष्ठांनी ‘अ‍ॅक्शन’घ्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRaj Thackerayराज ठाकरेAjit Pawarअजित पवार