शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Maharashtra Rain: ऐन गुलाबी थंडीत राज्यात पावसाचा अंदाज! येत्या २ दिवसात हजेरी लावण्याची शक्यता

By श्रीकिशन काळे | Updated: November 12, 2024 13:58 IST

सद्यस्थितीत गारठा जाणवत असला तरी राज्यातील तापमानात चढ उतार होत असून, गुरुवारपासून काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

पुणे : सध्या राज्यामध्ये आता बहुतांश भागामध्ये थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. दुपारी ऊन पडत असले तरी हवेत गारठा आहे. राज्यातील तापमानात चढ उतार होत असून, गुरुवारपासून काही भागात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. पुण्यात किमान तापमान १५ अंशावर असून, थंडीने पुणेकरांना आल्हाददायक वाटत आहे.

राज्यातील हवामान कोरडे आहे, पण गुरूवारपासून (दि.१४) पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.१५) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. 

राज्यात नाशिकमध्ये सर्वात कमी किमान तापमान १४ अंशावर नोंदवले गेले आहे. त्यानंतर पुण्यातच सर्वात कमी तापमान आहे. त्यामुळे उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढलेला जाणवत आहे. उर्वरित राज्यात मात्र अद्याप कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. मराठवाड्यात किमान तापमान १७ अंशांवर तर कोकणात १९ अंशांवर नोंदवले जात आहे. विदर्भात १६ ते २० अंशाच्या दरम्यान किमान तापमान आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी अजून तरी पडलेली नाही.

दरम्यान, पुढील चोवीस तासात नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची दाट शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कमी दाब क्षेत्र तामिळनाडूकडे सरकण्याची शक्यता आहे. परिणामी केरळ, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्रात गुरुवारपासून पावसाची हजेरी लागेल, अशी शक्यता वर्तविली आहे. 

येत्या गुरूवारी आणि शुक्रवारी पुण्यासह काही जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या दक्षिण-पश्चिम उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आणि त्याच्या पश्चिमेकडे हालचालीमुळे ओलावा निर्माण होत आहे. ओलावा आणि ढगाळ वातावरण वाढल्यामुळे किमान तापमान/रात्रीचे तापमान थोडेफार वाढण्याची शक्यता आहे. - अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, पुणे

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानRainपाऊसenvironmentपर्यावरणNatureनिसर्गWaterपाणी